शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

अपहरणाची भीती मनात बसू नये म्हणून मी चौथ्या दिवशी विमान उडवले- कॅप्टन देवी शरण

By मनोज गडनीस | Updated: January 7, 2025 05:57 IST

कंदाहार अपहरणातील आयसी-८१४ चे कॅप्टन देवी शरण निवृत्त

मनोज गडनीस, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कंदाहार अपहरणानंतर वैमानिक म्हणून माझ्या मनात भीती बसू नये म्हणून भीती व तत्सम भावना मनातून झटकून टाकल्या आणि त्या घटनेच्या चौथ्याच दिवशी मी मुंबई ते कोझीकोडे (तत्कालीन कालिकत) आणि कोझीकडे ते शारजा असे विमानाचे उड्डाण केले. आज ४० वर्षे वैमानिक म्हणून काम केल्यावर माझ्या मनात केवळ उत्तम सेवा देऊ शकलो ही कृतज्ञता आहे, अशी भावना आयसी-८१४ विमानाचे उड्डाण केलेल्या कॅप्टन देवी शरण यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. 

भारतीय हवाई उद्योगाच्या इतिहासातील सर्वाधिक भयावह घटना म्हणून नोंद झालेली कंदाहार अपहरणाची घटना २४ डिसेंबर १९९९ या दिवशी घडली होती. एअर इंडियाच्या आयसी-८१४ या विमानाने नेपाळमधील काठमांडू येथून दिल्लीसाठी उड्डाण केले आणि त्यानंतर अवघ्या ४० मिनिटांत विमानात प्रवासी म्हणून बसलेल्या पाच अतिरेक्यांनी शस्त्रे हातात घेत विमानाचे अपहरण केले.

 त्यावेळी विमानामध्ये १७९ प्रवासी आणि ११ केबिन कर्मचारी होते. अपहरण केलेले हे विमान अमृतसर, लाहोर आणि दुबई येथे फिरविण्यात आले. यादरम्यान अतिरेक्यांनी काही प्रवाशांची हत्यादेखील केली. त्यानंतर २५ डिसेंबर रोजी हे विमान अफगाणिस्तानातील कंदाहार येथे नेण्यात आले. 

अतिरेक्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर ३१ डिसेंबर रोजी या अपहृत प्रवाशांना सोडण्यात आले. अपहरणाच्या या काळात कॅप्टन देवी शरण यांनी अत्यंत संयत भूमिका पाळली आणि अतिरेक्यांशी संवाद साधतानाच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रचंड प्रयत्न केले. वैमानिक म्हणून ४० वर्षे कामगिरी केलेले कॅप्टन देवी प्रसाद शनिवारी निवृत्त झाले. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न या शहरातून दिल्लीसाठी त्यांनी अखेरचे विमान उडवले. आपल्या कारकिर्दीमध्ये २५ हजार तास विमान उड्डाण केलेल्या कॅप्टन देवी प्रसाद यांना एअर इंडिया कंपनीने अत्यंत सन्मानाने निरोप दिला.

 

टॅग्स :pilotवैमानिकairplaneविमान