शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणाची भीती मनात बसू नये म्हणून मी चौथ्या दिवशी विमान उडवले- कॅप्टन देवी शरण

By मनोज गडनीस | Updated: January 7, 2025 05:57 IST

कंदाहार अपहरणातील आयसी-८१४ चे कॅप्टन देवी शरण निवृत्त

मनोज गडनीस, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कंदाहार अपहरणानंतर वैमानिक म्हणून माझ्या मनात भीती बसू नये म्हणून भीती व तत्सम भावना मनातून झटकून टाकल्या आणि त्या घटनेच्या चौथ्याच दिवशी मी मुंबई ते कोझीकोडे (तत्कालीन कालिकत) आणि कोझीकडे ते शारजा असे विमानाचे उड्डाण केले. आज ४० वर्षे वैमानिक म्हणून काम केल्यावर माझ्या मनात केवळ उत्तम सेवा देऊ शकलो ही कृतज्ञता आहे, अशी भावना आयसी-८१४ विमानाचे उड्डाण केलेल्या कॅप्टन देवी शरण यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. 

भारतीय हवाई उद्योगाच्या इतिहासातील सर्वाधिक भयावह घटना म्हणून नोंद झालेली कंदाहार अपहरणाची घटना २४ डिसेंबर १९९९ या दिवशी घडली होती. एअर इंडियाच्या आयसी-८१४ या विमानाने नेपाळमधील काठमांडू येथून दिल्लीसाठी उड्डाण केले आणि त्यानंतर अवघ्या ४० मिनिटांत विमानात प्रवासी म्हणून बसलेल्या पाच अतिरेक्यांनी शस्त्रे हातात घेत विमानाचे अपहरण केले.

 त्यावेळी विमानामध्ये १७९ प्रवासी आणि ११ केबिन कर्मचारी होते. अपहरण केलेले हे विमान अमृतसर, लाहोर आणि दुबई येथे फिरविण्यात आले. यादरम्यान अतिरेक्यांनी काही प्रवाशांची हत्यादेखील केली. त्यानंतर २५ डिसेंबर रोजी हे विमान अफगाणिस्तानातील कंदाहार येथे नेण्यात आले. 

अतिरेक्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर ३१ डिसेंबर रोजी या अपहृत प्रवाशांना सोडण्यात आले. अपहरणाच्या या काळात कॅप्टन देवी शरण यांनी अत्यंत संयत भूमिका पाळली आणि अतिरेक्यांशी संवाद साधतानाच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रचंड प्रयत्न केले. वैमानिक म्हणून ४० वर्षे कामगिरी केलेले कॅप्टन देवी प्रसाद शनिवारी निवृत्त झाले. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न या शहरातून दिल्लीसाठी त्यांनी अखेरचे विमान उडवले. आपल्या कारकिर्दीमध्ये २५ हजार तास विमान उड्डाण केलेल्या कॅप्टन देवी प्रसाद यांना एअर इंडिया कंपनीने अत्यंत सन्मानाने निरोप दिला.

 

टॅग्स :pilotवैमानिकairplaneविमान