शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
2
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर होतील हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या; ८ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरवात
3
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
4
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
5
IND VS SA 3rd ODI : कुलदीप यादवसह प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! दक्षिण आफ्रिकेचा संघ २७० धावांत आटोपला
6
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
7
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
8
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
9
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
10
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
11
Video - "मी नवरदेव आहे, पण स्वतःच्या लग्नालाच..."; इंडिगोमुळे अडकले प्रवासी, मांडली व्यथा
12
"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
13
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
14
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
15
'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
17
हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये केली बाबरी मशिदीची पायाभरणी, भाजपा-तृणमूलचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप  
18
IND vs SA : जड्डूच्या गोलंदाजीवर फसला बावुमा! कॅच घेतल्यावर कोहलीनं अशी घेतली मजा (VIDEO)
19
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; कॅन्सरसह 'या' आजारांचा धोका, आताच बदला सवय
20
अमेरिका सोडून भारतात परत का आली माधुरी दीक्षित? म्हणाली, "बऱ्याच गोष्टी घडल्या..."
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत कायद्याचे १३३ पदवीधर उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 05:16 IST

किती येणार निवडून?; वकिलांची कामगिरी आतापर्यंत उत्तमच; ६१ भाजपचे, ७२ काँग्रेसचे

नवी दिल्ली: आताच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या दोन प्रमुख राजकीय पक्षांनी मिळून कायद्याचे पदवीधर असलेले एकूण १३३ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. यापैकी ६१ कायदा पदवीधर भाजपचे तर ७२ काँग्रेसचे आहेत.

स्वातंत्र्य लढ्यात व त्यानंतरच्या सरकारांमध्ये वकील असलेल्या राजकारणांनी महत्वाची पदे भूषवून मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळे कायद्याचे ज्ञान असलेले किती प्रतिनिधी १७ व्या लोकसभेवर निवडून येतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. अर्थात या उमेदवारांमध्ये मुरब्बी राजकारण्यासोबतच मातब्बर वकील म्हणूनही ज्यांनी नाव कमावले आहे, असे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच आहे. इतर बहुसंख्यांनी कायद्याची पदवी घेतल्यानंतर अत्यल्प वकिली केलेली आहे किंवा अनेकांनी तर वकिलाचा काळा झगाही कधी परिधान केलेला नाही.

काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये सलमान खुर्शीद, वीरप्पा मोईली, विवेक तनखा, मल्लिकार्जु खरगे, शशी थरूर, सुश्मिता देव व कार्ति चिदम्बरम हे प्रमुख आहेत. यापैकी खुर्शीद, मोईली, तनखा व खरगे यांना वकिलीचा प्रदीर्घ अनुभव आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्रातील उमेदवारांमध्ये के. सी. पाडवी (नंदूरबार) व चारुलता टोकस (वर्धा) हे दोनच कायद्याचे पदवीधर आहेत.अनेकांनी कधीच वकिली केली नाहीकायद्याचे पदवीधर असलेल्या भाजपच्या उमेदवारांमध्ये रविशंकर प्रसाद, डी. व्ही. सदानंद गौडा, एन. रामचंद्र राव, नितीन गडकरी आणि मीनाक्षी लेखी हे प्रमुख आहेत. प्रसाद विद्यमान तर गौडा माजी केंद्रीय कायदामंत्री आहेत, तर राव ज्येष्ठ व्यावसायी वकील आहेत. गडकरी हे भाजपच्या महाराष्ट्रातील उमेदवारांमध्ये एकमेव कायद्याचे पदवीधर आहेत. मात्र त्यांनी वकिली कधी केलेली नाही.