शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

पैसे काढण्यावरील निर्बंध रद्दच करावेत

By admin | Updated: January 1, 2017 01:19 IST

बाद झालेल्या नोटा बँकेत भरण्याची मुदत संपून ५० दिवस झाल्यावरही बँकेतून एका दिवशी साडेचार हजार रुपयेच काढण्याच्या मर्यादेवरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी

नवी दिल्ली : बाद झालेल्या नोटा बँकेत भरण्याची मुदत संपून ५० दिवस झाल्यावरही बँकेतून एका दिवशी साडेचार हजार रुपयेच काढण्याच्या मर्यादेवरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले की,‘‘गेल्या ५० दिवसांत उद्धवस्त झाल्यानंतरही पंतप्रधानांवर विश्वास ठेवा. एका आठवड्यात बँकेतून पैसे काढण्यावरील निर्बंध रद्द झालेच पाहिजेत.’’ आणखी एका टिष्ट्वटमध्ये राहुल गांधींनी मोदी यांचे छायाचित्र टाकून नोटाबंदीमुळे झालेल्या नुकसानीची मोदी यांनी भरपाई केली पाहिजे अशी मागणी केली. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना केंद्र सरकारने २५ हजार रुपयांची भरपाई दिली पाहिजे, असेही गांधी म्हणाले. छोटे दुकानदार व व्यावसायिकांना प्राप्तिकर आणि विक्रीकरामध्ये ५० टक्के सूट दिली जावी, असे ते म्हणाले. चिदंबरम यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे की, ३० डिसेंबरपर्यंत संयम ठेवा, असे मोदी म्हणाले होते मग पैसे काढण्यावरील निर्बंध का सुरूच आहेत? दोन जानेवारीपासून सगळ््या एटीएममध्ये पुरेसा पैसा असेल का? येथून पुढे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी काळ््या पैशांत कॅपिटेशन फीची मागणी होणार नाही का? दोन जानेवारीनंतर लाच दिली वा घेतली जाणार नाही का? असा प्रश्नही चिदंबरम यांनी टिष्ट्वटरवर विचारला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)