शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

लोकशाहीची हत्या होताना मूक साक्षीदार बनू शकत नाही...

By admin | Updated: February 5, 2016 03:12 IST

लोकशाहीची हत्या होत असताना सर्वोच्च न्यायालय मूक प्रेक्षक बनू शकत नाही, या शब्दांत घटनापीठाने गुरुवारी भाजपच्या आमदाराला खडसावले आहे. हे न्यायालय राज्यपालांच्या अधिकारांच्या मुद्यावर विचार करीत आहे

नवी दिल्ली : लोकशाहीची हत्या होत असताना सर्वोच्च न्यायालय मूक प्रेक्षक बनू शकत नाही, या शब्दांत घटनापीठाने गुरुवारी भाजपच्या आमदाराला खडसावले आहे. हे न्यायालय राज्यपालांच्या अधिकारांच्या मुद्यावर विचार करीत आहे. राज्यपालांचे सर्व निर्णय न्यायालयीन समीक्षेच्या अखत्यारीत येऊ शकत नाहीत, असा युक्तिवाद भाजपचे आमदार टी. ताकी यांनी केला होता.लोकशाहीची हत्या होत असेल, तर न्यायालय शांत कसे बसणार? असा सवाल त्यावर न्या. जे.एस. खेहार यांच्या नेतृत्वातील पाच सदस्यीय घटनापीठाने केला. दीपक मिश्रा, एम.बी. लोकूर, पी.सी. घोसे आणि एन.व्ही. रामण हे न्यायाधीश घटनापीठाचे अन्य सदस्यआहेत. राष्ट्रपती राजवटीमुळे घटनात्मक पेच निर्माण झालेल्या अरुणाचल प्रदेशातील भाजपच्या आमदाराने राज्यपालांच्या निर्णयावर विचार करण्यास आक्षेप घेतला. दरम्यान, न्यायालयाने आॅक्टोबरपासून ८ फेब्रुवारीपर्यंतचा अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या पत्रव्यवहाराचा सर्व तपशील मागितला आहे. विधानसभेच्या अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या दस्तऐवजांवर घटनापीठाने नाराजी व्यक्त केली.आजही चालणार सुनावणीविधानसभेचे अध्यक्ष रेबिया आणि अन्य काँग्रेस आमदारांनी गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले असून, अशा याचिकांवर घटनापीठ शुक्रवारीही सुनावणी करणार आहे. भाजपचे आमदार टी. ताकी यांनी राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देण्यात काँग्रेसने विलंब का लावला, असा प्रश्न उपस्थित करीत हरकत घेतली होती.बंडखोर आमदारांचेकाँग्रेससमोर आव्हानगेल्या वर्षभरापासून अरुणाचलचे मुख्यमंत्री नबाम तुकी यांना काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी जेरीस आणले आहे. अखेर निम्म्या आमदारांनी विरोधी भाजपशी हातमिळवणी करीत तुकी यांचे सरकार उलथवण्याचा चंग बांधला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एका हॉटेलमध्ये विधिमंडळाचे अधिवेशन घेत तुकी सरकारच्या हकालपट्टीवर शिक्कामोर्तब केले होते. विधिमंडळाला मुख्यमंत्र्यांच्या गटाने टाळे लावल्यानंतर वेळेवर अधिवेशन बोलाविण्याच्या घटनात्मक तरतुदीनुसार राज्यपालांनी आमदारांना हॉटेलमध्ये बैठक घ्यायला मोकळीक दिली, असा युक्तिवाद केंद्राने केला होता. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा सहभाग असल्याखेरीज विधानसभेचे अधिवेशन बोलावले जाऊ शकत नाही, असे काँग्रेसने याचिकेत म्हटले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)विधानसभेचे अध्यक्ष नबाम रेबिया आणि राज्यपाल जे.पी. राजखोवा यांनी विधानसभेचे अधिवेशन नियोजित वेळेआधी बोलाविण्याबाबत कोणता पत्रव्यवहार केला. काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत कशा प्रकारे संपर्क साधला गेला, याची माहिती घटनापीठाला हवी आहे.विधानसभेचे अधिवेशन बोलाविण्याचा राज्यपालांचा निर्णय लोकशाहीविरोधी ठरविता येत नाही. कारण त्यातून लोकशाही प्रक्रिया निष्फळ ठरविल्याचे निष्पन्न होत नाही. याउलट विधानसभा इमारतीला टाळे लावणे हे लोकशाहीविरोधी कृत्य ठरते, असा युक्तिवाद बंडखोर आमदारांचे वकील राकेश द्विवेदी यांनी केला. काही घटनात्मक योजनांनुसार राज्यपालांना विशेष अपवादात्मक परिस्थितीत स्वत:हून निर्णय घेता येतात.