शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीची हत्या होताना मूक साक्षीदार बनू शकत नाही...

By admin | Updated: February 5, 2016 03:12 IST

लोकशाहीची हत्या होत असताना सर्वोच्च न्यायालय मूक प्रेक्षक बनू शकत नाही, या शब्दांत घटनापीठाने गुरुवारी भाजपच्या आमदाराला खडसावले आहे. हे न्यायालय राज्यपालांच्या अधिकारांच्या मुद्यावर विचार करीत आहे

नवी दिल्ली : लोकशाहीची हत्या होत असताना सर्वोच्च न्यायालय मूक प्रेक्षक बनू शकत नाही, या शब्दांत घटनापीठाने गुरुवारी भाजपच्या आमदाराला खडसावले आहे. हे न्यायालय राज्यपालांच्या अधिकारांच्या मुद्यावर विचार करीत आहे. राज्यपालांचे सर्व निर्णय न्यायालयीन समीक्षेच्या अखत्यारीत येऊ शकत नाहीत, असा युक्तिवाद भाजपचे आमदार टी. ताकी यांनी केला होता.लोकशाहीची हत्या होत असेल, तर न्यायालय शांत कसे बसणार? असा सवाल त्यावर न्या. जे.एस. खेहार यांच्या नेतृत्वातील पाच सदस्यीय घटनापीठाने केला. दीपक मिश्रा, एम.बी. लोकूर, पी.सी. घोसे आणि एन.व्ही. रामण हे न्यायाधीश घटनापीठाचे अन्य सदस्यआहेत. राष्ट्रपती राजवटीमुळे घटनात्मक पेच निर्माण झालेल्या अरुणाचल प्रदेशातील भाजपच्या आमदाराने राज्यपालांच्या निर्णयावर विचार करण्यास आक्षेप घेतला. दरम्यान, न्यायालयाने आॅक्टोबरपासून ८ फेब्रुवारीपर्यंतचा अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या पत्रव्यवहाराचा सर्व तपशील मागितला आहे. विधानसभेच्या अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या दस्तऐवजांवर घटनापीठाने नाराजी व्यक्त केली.आजही चालणार सुनावणीविधानसभेचे अध्यक्ष रेबिया आणि अन्य काँग्रेस आमदारांनी गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले असून, अशा याचिकांवर घटनापीठ शुक्रवारीही सुनावणी करणार आहे. भाजपचे आमदार टी. ताकी यांनी राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देण्यात काँग्रेसने विलंब का लावला, असा प्रश्न उपस्थित करीत हरकत घेतली होती.बंडखोर आमदारांचेकाँग्रेससमोर आव्हानगेल्या वर्षभरापासून अरुणाचलचे मुख्यमंत्री नबाम तुकी यांना काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी जेरीस आणले आहे. अखेर निम्म्या आमदारांनी विरोधी भाजपशी हातमिळवणी करीत तुकी यांचे सरकार उलथवण्याचा चंग बांधला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एका हॉटेलमध्ये विधिमंडळाचे अधिवेशन घेत तुकी सरकारच्या हकालपट्टीवर शिक्कामोर्तब केले होते. विधिमंडळाला मुख्यमंत्र्यांच्या गटाने टाळे लावल्यानंतर वेळेवर अधिवेशन बोलाविण्याच्या घटनात्मक तरतुदीनुसार राज्यपालांनी आमदारांना हॉटेलमध्ये बैठक घ्यायला मोकळीक दिली, असा युक्तिवाद केंद्राने केला होता. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा सहभाग असल्याखेरीज विधानसभेचे अधिवेशन बोलावले जाऊ शकत नाही, असे काँग्रेसने याचिकेत म्हटले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)विधानसभेचे अध्यक्ष नबाम रेबिया आणि राज्यपाल जे.पी. राजखोवा यांनी विधानसभेचे अधिवेशन नियोजित वेळेआधी बोलाविण्याबाबत कोणता पत्रव्यवहार केला. काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत कशा प्रकारे संपर्क साधला गेला, याची माहिती घटनापीठाला हवी आहे.विधानसभेचे अधिवेशन बोलाविण्याचा राज्यपालांचा निर्णय लोकशाहीविरोधी ठरविता येत नाही. कारण त्यातून लोकशाही प्रक्रिया निष्फळ ठरविल्याचे निष्पन्न होत नाही. याउलट विधानसभा इमारतीला टाळे लावणे हे लोकशाहीविरोधी कृत्य ठरते, असा युक्तिवाद बंडखोर आमदारांचे वकील राकेश द्विवेदी यांनी केला. काही घटनात्मक योजनांनुसार राज्यपालांना विशेष अपवादात्मक परिस्थितीत स्वत:हून निर्णय घेता येतात.