शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
4
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
5
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
7
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
8
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
9
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
10
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
11
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
12
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
13
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
14
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
15
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
16
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
17
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
18
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
19
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
20
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक

आडनाव उघड करण्याची सक्ती करता येते का?

By admin | Updated: September 26, 2015 23:59 IST

नागरिकाने त्याच्या नावात आडनाव वापरलेच पाहिजे अथवा ते उघड करायलाच हवे, अशी सक्ती सरकार करू शकते का? तसेच अशी सक्ती राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्कांची पायमल्ली करणारी आहे

नवी दिल्ली: नागरिकाने त्याच्या नावात आडनाव वापरलेच पाहिजे अथवा ते उघड करायलाच हवे, अशी सक्ती सरकार करू शकते का? तसेच अशी सक्ती राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्कांची पायमल्ली करणारी आहे का, हा मुद्दा तपासून पाहण्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे.निशांत एवढेच नाव लावणाऱ्या व्यक्तीने केलेल्या अपिलाच्या निमित्ताने हा विषय न्यायालयापुढे आला आहे. खंडपीठाने या प्रकरणी केंद्र सरकारला नोटीस काढली असून सहा आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे.केंद्र सरकारच्या कंपनी व्यवहार मंत्रालयाने गेल्या वर्षी काढलेल्या परिपत्रकास निशांत यांनी आव्हान दिले आहे. ज्या नागरिकांना कंपनी स्थापन करून व्यापार करायचा असेल त्याने आपल्या अर्जात आडनावासह संपूर्ण नाव देण्याची सक्ती या परिपत्रकात करण्यात आली आहे. निशांत यांनी याआधी दिल्ली उच्च न्यायालयात रिट याचिका केली होती. ती फेटाळल्यानंतर आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे.निशांत यांचे वकील अ‍ॅड. गौरांग कांत यांनी असा युक्तिवाद केला की, कंपनी व्यवहार मंत्रालयाचे हे परिपत्रक राज्यघटनेच्या अनुच्छेद १९(१)(जी) अन्वये नागरिकांना दिलेल्या कोणताही व्यवसाय, व्यापार अथवा पेशा करण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे. शिवाय ते समानता व मनाप्रमाणे जीवन जगण्याच्या (अनुच्छेद १४ व २१) मूलभूत हक्काचीही गळचेपी करणारे आहे. न्यायालच्या असेही निदर्शनास आणून दिले गेले की, निशांत यांना परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या पासपोर्टवर व प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या पॅनकार्डावरही त्यांचे आडनाव नाही. शिवाय खुद्द कंपनी व्यवहार मंत्रालयानेही त्यांना आडनावाचा उल्लेख न करता ‘डायरेक्ट आयडेन्टीटी नंबर’ जारी केला आहे. निशांत जी कंपनी सुरु करू इच्छितात त्यासाठी आवश्यक असलेली अर्हता त्यांच्याकडे आहे. मात्र तरीही आडनाव उघड करण्याच्या या सक्तीमुळे त्यांना आपल्या पसंतीचा व्यवसाय करण्यासाठी कंपनीची नोंदणी करता येत नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)निशांत यांच्या या अपिलावर सर्वोच्च न्यायालय जो काही निकाल देईल त्याचा केवळ कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या या परिपत्रकावरच नव्हे तर अनेक प्रकारचे व्यवहार करताना आडनावासह संपूर्ण नावाची सर्रासपणे सक्ती करणाऱ्या सरकारच्या इतर विभागांवर व कंपन्यांवरही परिणाम होईल. विशेषत: उपखंडीय भारतात आडनावे जात व सामाजिक दर्जा यांची निदर्शक अशी असतात. याविरुद्ध गेल्या शतकात एक आंदोलनही झाले होते. परिणामी अनेकांनी आडनावांचा त्याग केला. बिहारचे लालू प्रसाद हेही त्यापैकीच एक. २००२ ते २००४ या काळात भारताचे परराष्ट्र सचिवही ‘शशांक’ एवढेच नाव लावणारे अधिकारी होते.