शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

आडनाव उघड करण्याची सक्ती करता येते का?

By admin | Updated: September 26, 2015 23:59 IST

नागरिकाने त्याच्या नावात आडनाव वापरलेच पाहिजे अथवा ते उघड करायलाच हवे, अशी सक्ती सरकार करू शकते का? तसेच अशी सक्ती राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्कांची पायमल्ली करणारी आहे

नवी दिल्ली: नागरिकाने त्याच्या नावात आडनाव वापरलेच पाहिजे अथवा ते उघड करायलाच हवे, अशी सक्ती सरकार करू शकते का? तसेच अशी सक्ती राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्कांची पायमल्ली करणारी आहे का, हा मुद्दा तपासून पाहण्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे.निशांत एवढेच नाव लावणाऱ्या व्यक्तीने केलेल्या अपिलाच्या निमित्ताने हा विषय न्यायालयापुढे आला आहे. खंडपीठाने या प्रकरणी केंद्र सरकारला नोटीस काढली असून सहा आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे.केंद्र सरकारच्या कंपनी व्यवहार मंत्रालयाने गेल्या वर्षी काढलेल्या परिपत्रकास निशांत यांनी आव्हान दिले आहे. ज्या नागरिकांना कंपनी स्थापन करून व्यापार करायचा असेल त्याने आपल्या अर्जात आडनावासह संपूर्ण नाव देण्याची सक्ती या परिपत्रकात करण्यात आली आहे. निशांत यांनी याआधी दिल्ली उच्च न्यायालयात रिट याचिका केली होती. ती फेटाळल्यानंतर आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे.निशांत यांचे वकील अ‍ॅड. गौरांग कांत यांनी असा युक्तिवाद केला की, कंपनी व्यवहार मंत्रालयाचे हे परिपत्रक राज्यघटनेच्या अनुच्छेद १९(१)(जी) अन्वये नागरिकांना दिलेल्या कोणताही व्यवसाय, व्यापार अथवा पेशा करण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे. शिवाय ते समानता व मनाप्रमाणे जीवन जगण्याच्या (अनुच्छेद १४ व २१) मूलभूत हक्काचीही गळचेपी करणारे आहे. न्यायालच्या असेही निदर्शनास आणून दिले गेले की, निशांत यांना परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या पासपोर्टवर व प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या पॅनकार्डावरही त्यांचे आडनाव नाही. शिवाय खुद्द कंपनी व्यवहार मंत्रालयानेही त्यांना आडनावाचा उल्लेख न करता ‘डायरेक्ट आयडेन्टीटी नंबर’ जारी केला आहे. निशांत जी कंपनी सुरु करू इच्छितात त्यासाठी आवश्यक असलेली अर्हता त्यांच्याकडे आहे. मात्र तरीही आडनाव उघड करण्याच्या या सक्तीमुळे त्यांना आपल्या पसंतीचा व्यवसाय करण्यासाठी कंपनीची नोंदणी करता येत नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)निशांत यांच्या या अपिलावर सर्वोच्च न्यायालय जो काही निकाल देईल त्याचा केवळ कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या या परिपत्रकावरच नव्हे तर अनेक प्रकारचे व्यवहार करताना आडनावासह संपूर्ण नावाची सर्रासपणे सक्ती करणाऱ्या सरकारच्या इतर विभागांवर व कंपन्यांवरही परिणाम होईल. विशेषत: उपखंडीय भारतात आडनावे जात व सामाजिक दर्जा यांची निदर्शक अशी असतात. याविरुद्ध गेल्या शतकात एक आंदोलनही झाले होते. परिणामी अनेकांनी आडनावांचा त्याग केला. बिहारचे लालू प्रसाद हेही त्यापैकीच एक. २००२ ते २००४ या काळात भारताचे परराष्ट्र सचिवही ‘शशांक’ एवढेच नाव लावणारे अधिकारी होते.