शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

काँग्रेस संघाविरुद्ध उघडणार मोहीम

By admin | Updated: September 6, 2016 03:57 IST

महात्मा गांधीजींच्या हत्येसंदर्भातील विधानावरून भिवंडी कोर्टातील दाव्याप्रकरणी काँग्रेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध जोरदार मोहीम चालविण्याची तयारी करीत आहे.

शीलेश शर्मा,

नवी दिल्ली- महात्मा गांधीजींच्या हत्येसंदर्भातील विधानावरून भिवंडी कोर्टातील दाव्याप्रकरणी काँग्रेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध जोरदार मोहीम चालविण्याची तयारी करीत आहे. जेणेकरून संघाचा खरा चेहरा उघडा करता येईल. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कपिल सिब्बल यांची भेट घेऊन दीर्घ चर्चा केल्यानंतर कठोर भूमिका घेत आपले वकील कपिल सिब्बल यांना सांगितले की, नथुराम गोडसे संघ आणि हिंदू महासभा यांच्यातील महत्त्वपूर्ण दुवा होता, हे ऐतिहासिक तथ्य खरे नाही, हे सरसंघचालकांना कोर्टात येऊन सिद्ध करावे, यासाठी जोरदार आग्रह धरण्यात येईल. कपिल सिब्बल यांनी याच आधारावर हा मुद्दा कोर्टात मांडण्याची तयारी सुरू केली आहे. राहुल यांच्या विशेष चमूने ऐतिहासिक तथ्य शोधून याची माहिती राहुल यांना दिली. त्यानंतर काँग्रेस या प्रकरणात संघाविरुद्ध जोरदार मोहीम उघडणार असल्याचे संकेत मिळाले. दुसरीकडे, राहुल यांनी काँग्रेस पक्षाच्या सर्व प्रदेश शाखांनाही संघाविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले. जेणेकरून संघाविरुद्ध लोकांना जागृत करून संघाचा असली चेहरा जनतेसमोर उघडा पाडता येईल. हा अब्रुनुकसानीचा दावा राजकीय मार्गाने लढण्याची काँग्रेसची इच्छा आहे. जेणेकरून उत्तर प्रदेश आणि पंजाबात होणाऱ्या निवडणुकीत फायदा होईल.सत्य काय आहे, हे सिद्ध करण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांची उलटतपासणी करण्याची परवानगी मिळावी,अशी मागणी कपिल सिब्बल पुढच्या सुनावणीच्या वेळी कोर्टाकडे करतील, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. गांधीजींच्या हत्येतील संघाची भूमिका न्यायालयात आणि जनतेत उघड करण्यासाठी राजेश कुंटे यांनाही उलटतपासणीसाठी बोलावण्याची सिब्बल मागणी करतील.आपण कोर्टात उपरोक्त मागणी करणार आहोत. प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांनुसार गांधीजींच्या हत्येत संघाची भूमिका होती; परंतु संघ आणि कोणाकडूनही आजवर सवाल उपस्थित का करण्यात आला नाही, असा सवाल करून, या पुस्तकातील उतारे पुरावे म्हणून कोर्टात सादर करणार असल्याचे अ‍ॅड. सिब्बल यांंनी सांगितले.>‘तो’ पत्रव्यवहारही सादर करणार सिब्बल हे जवळपास बारा पुस्तकांतील या मुद्द्याांशी संबंधित उतारे कोर्टात सादर करण्याच्या तयारीत आहेत, तसेच गांधीजींच्या हत्येनंतर नेहरू आणि सरदार पटेल यांच्यात संघाबाबत झालेला पत्रव्यवहारही सादर करणार आहेत, असे सिब्बल यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले. गांधी हत्येनंतर संघाने मिठाई वाटली, असा उल्लेख असलेले पत्र सरदार पटेल यांनी तत्कालीन सरसंघचालक गोळवळकर यांना लिहिले होते, त्याबाबतही कोर्टाला माहिती दिली जाईल.