शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

मला कुत्रा म्हणा, परंतु पाकिस्तानी म्हणू नका; बलोची तरुणाचे उद्गार

By admin | Updated: August 21, 2016 03:50 IST

पाकिस्तानच्या बलुचिस्तानातील अत्याचारामुळे देश सोडाव्या लागलेल्या मजदकने दिल्ली विमानतळावर ‘तुम्ही मला कुत्रा म्हणा; परंतु पाकिस्तानी म्हणू नका,’ अशा शब्दांत आपला संताप

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या बलुचिस्तानातील अत्याचारामुळे देश सोडाव्या लागलेल्या मजदकने दिल्ली विमानतळावर ‘तुम्ही मला कुत्रा म्हणा; परंतु पाकिस्तानी म्हणू नका,’ अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला होता. पाककडून बलुचिस्तान, तसेच गिलगिट भागातील लोकांवर अत्याचार करण्यात येत असल्याची चर्चा अनेकदा होते. तथापि, पाक नेहमीच हा आरोप फेटाळत आला आहे. मजदकच्या तीव्र भावनांमुळे पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा जगासमोर आला आहे. काही बलोच स्थलांतरित नवी दिल्लीत राहतात. मजदक त्यापैकी एक. काही महिन्यांपूर्वी तो भारतात आला. त्याच्याकडे कॅनेडियन पासपोर्ट होता. तथापि, त्यावरील जन्मस्थानाच्या रकान्यात पाकमधील क्वेटा शहराचे नाव होते. त्यामुळे विमानतळावरील स्थलांतर अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या. त्या वेळचा अनुभव कथन करताना मजदक म्हणाला की, ‘मी पाकिस्तानी नाही, हे स्थलांतर अधिकाऱ्यांना समजावून सांगताना मला प्रचंड वेदना होत होत्या. मी संतापून म्हणालो, मला कुत्रा म्हणा, काय वाटेल ते म्हणा, परंतु पाकिस्तानी म्हणू नको. मी बलोच आहे. माझ्या जन्मस्थळामुळे मला खूप अडचणी सहन कराव्या लागल्या.’ ही कहाणी एकट्या मजदकची नाही, तर पाक लष्कराने पिच्छा पुरविल्याने जगाच्या विविध भागांत आश्रय घेतलेल्या हजारो बलुच लोकांचीही हीच अवस्था आहे. मजदकच्या वडिलांचे अपहरण करण्यात आले होते. लष्कराने त्याच्या आईचा छळ करण्यासह संपत्तीचेही नुकसान केले. या कुटुंबाला कॅनडात आश्रय घ्यावा लागला. मजदक व त्याची पत्नी बलोच स्वातंत्र्य चळवळीबाबत जागृती घडवून आणण्यासाठी भारतात वास्तव्याला आहे. बलोच लोकांच्या ७० वर्षांपासूनच्या संघर्षाला भारताने पहिल्यांदाच उघडपणे पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. बलुचिस्तान, गिलगिट आणि पाकव्याप्त काश्मिरातील जनतेने माझ्याप्रती व्यक्त केलेल्या आपुलकीबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात म्हटले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)मजदकचे वडील गुलाम मुस्तफा रायसानी चित्रपट दिग्दर्शक होते. पाकिस्तानी लष्कराने त्यांचे अपहरण करून २००६ ते २००८ दरम्यान त्यांना क्वेट्टा येथे बंदीवासात ठेवले. त्याची आई राजकीय कार्यकर्ती आहे.मकजद महणाला की, वडिलांची सुटका झाल्यानंतर माझे कुटुंबीय कॅनडाला स्थलांतरित झाले. बलुच लोकांनी पाकचा देश म्हणून स्वीकार करावा, असे त्यांना वाटते. तसे न केल्यास त्यांना आमच्या देशांत वंशसंहार घडवायचा आहे. मी २०१० मध्ये अफगाणिस्तानला पळून गेला होता. नंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थलांतरित विभागाच्या उच्चायुक्तांमार्फत पुनर्वसन कार्यक्रमांतर्गत मी कॅनडाला निघून गेलो.बलुचिस्तानातील संघर्षामुळे माझ्या भावा-बहिणींना योग्य शिक्षण मिळाले नाही. मी क्वेट्टातील शाळेत शिक्षण घेतले. तथापि, आता परिस्थिती बिकट झाली आहे. पाकने दर दहा कि.मी.वर मदरसे उघडले असून, निरपराध बलोच तरुणांना बहकवण्यात येत आहे. बलोच लोकांना शिक्षण मिळत नसल्यामुळे त्यांना चांगल्या नोकऱ्या नाहीत. इस्लामाबादने बलुचिस्तानातील सर्व कार्यालयांत पाकिस्तानी मुस्लिमांना नेमले आहे, तर त्याच्या लष्कराने संपूर्ण क्षेत्राला रणभूमी बनविले असून, तेथील नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट केली जात आहे, असेही तो म्हणाला. पाकचे ढोंग उघडआपल्याशी भारत किंवा बलुचिस्तानातील कोणत्याही भारतीय एजन्सीने संपर्क साधलेला नाही. बलुचिस्तान आंदोलनात भारतीय गुप्तचर संघटना रॉ चा हात असल्याचा आरोप पाककडून केला जातो. त्याबाबत तुला काय वाटते, या प्रश्नावर मजदक म्हणाला की, ‘मी बलुचिस्तानचा असून, तेथे दीर्घकाळ राहिलेलो आहे. मी एकाही भारतीय एजंटला पाहिले नाही किंवा कोणी माझ्याशी किंवा माझ्या कुटुंबाशी संपर्कही साधलेला नाही.’