शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

मला कुत्रा म्हणा, परंतु पाकिस्तानी म्हणू नका; बलोची तरुणाचे उद्गार

By admin | Updated: August 21, 2016 03:50 IST

पाकिस्तानच्या बलुचिस्तानातील अत्याचारामुळे देश सोडाव्या लागलेल्या मजदकने दिल्ली विमानतळावर ‘तुम्ही मला कुत्रा म्हणा; परंतु पाकिस्तानी म्हणू नका,’ अशा शब्दांत आपला संताप

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या बलुचिस्तानातील अत्याचारामुळे देश सोडाव्या लागलेल्या मजदकने दिल्ली विमानतळावर ‘तुम्ही मला कुत्रा म्हणा; परंतु पाकिस्तानी म्हणू नका,’ अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला होता. पाककडून बलुचिस्तान, तसेच गिलगिट भागातील लोकांवर अत्याचार करण्यात येत असल्याची चर्चा अनेकदा होते. तथापि, पाक नेहमीच हा आरोप फेटाळत आला आहे. मजदकच्या तीव्र भावनांमुळे पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा जगासमोर आला आहे. काही बलोच स्थलांतरित नवी दिल्लीत राहतात. मजदक त्यापैकी एक. काही महिन्यांपूर्वी तो भारतात आला. त्याच्याकडे कॅनेडियन पासपोर्ट होता. तथापि, त्यावरील जन्मस्थानाच्या रकान्यात पाकमधील क्वेटा शहराचे नाव होते. त्यामुळे विमानतळावरील स्थलांतर अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या. त्या वेळचा अनुभव कथन करताना मजदक म्हणाला की, ‘मी पाकिस्तानी नाही, हे स्थलांतर अधिकाऱ्यांना समजावून सांगताना मला प्रचंड वेदना होत होत्या. मी संतापून म्हणालो, मला कुत्रा म्हणा, काय वाटेल ते म्हणा, परंतु पाकिस्तानी म्हणू नको. मी बलोच आहे. माझ्या जन्मस्थळामुळे मला खूप अडचणी सहन कराव्या लागल्या.’ ही कहाणी एकट्या मजदकची नाही, तर पाक लष्कराने पिच्छा पुरविल्याने जगाच्या विविध भागांत आश्रय घेतलेल्या हजारो बलुच लोकांचीही हीच अवस्था आहे. मजदकच्या वडिलांचे अपहरण करण्यात आले होते. लष्कराने त्याच्या आईचा छळ करण्यासह संपत्तीचेही नुकसान केले. या कुटुंबाला कॅनडात आश्रय घ्यावा लागला. मजदक व त्याची पत्नी बलोच स्वातंत्र्य चळवळीबाबत जागृती घडवून आणण्यासाठी भारतात वास्तव्याला आहे. बलोच लोकांच्या ७० वर्षांपासूनच्या संघर्षाला भारताने पहिल्यांदाच उघडपणे पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. बलुचिस्तान, गिलगिट आणि पाकव्याप्त काश्मिरातील जनतेने माझ्याप्रती व्यक्त केलेल्या आपुलकीबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात म्हटले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)मजदकचे वडील गुलाम मुस्तफा रायसानी चित्रपट दिग्दर्शक होते. पाकिस्तानी लष्कराने त्यांचे अपहरण करून २००६ ते २००८ दरम्यान त्यांना क्वेट्टा येथे बंदीवासात ठेवले. त्याची आई राजकीय कार्यकर्ती आहे.मकजद महणाला की, वडिलांची सुटका झाल्यानंतर माझे कुटुंबीय कॅनडाला स्थलांतरित झाले. बलुच लोकांनी पाकचा देश म्हणून स्वीकार करावा, असे त्यांना वाटते. तसे न केल्यास त्यांना आमच्या देशांत वंशसंहार घडवायचा आहे. मी २०१० मध्ये अफगाणिस्तानला पळून गेला होता. नंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थलांतरित विभागाच्या उच्चायुक्तांमार्फत पुनर्वसन कार्यक्रमांतर्गत मी कॅनडाला निघून गेलो.बलुचिस्तानातील संघर्षामुळे माझ्या भावा-बहिणींना योग्य शिक्षण मिळाले नाही. मी क्वेट्टातील शाळेत शिक्षण घेतले. तथापि, आता परिस्थिती बिकट झाली आहे. पाकने दर दहा कि.मी.वर मदरसे उघडले असून, निरपराध बलोच तरुणांना बहकवण्यात येत आहे. बलोच लोकांना शिक्षण मिळत नसल्यामुळे त्यांना चांगल्या नोकऱ्या नाहीत. इस्लामाबादने बलुचिस्तानातील सर्व कार्यालयांत पाकिस्तानी मुस्लिमांना नेमले आहे, तर त्याच्या लष्कराने संपूर्ण क्षेत्राला रणभूमी बनविले असून, तेथील नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट केली जात आहे, असेही तो म्हणाला. पाकचे ढोंग उघडआपल्याशी भारत किंवा बलुचिस्तानातील कोणत्याही भारतीय एजन्सीने संपर्क साधलेला नाही. बलुचिस्तान आंदोलनात भारतीय गुप्तचर संघटना रॉ चा हात असल्याचा आरोप पाककडून केला जातो. त्याबाबत तुला काय वाटते, या प्रश्नावर मजदक म्हणाला की, ‘मी बलुचिस्तानचा असून, तेथे दीर्घकाळ राहिलेलो आहे. मी एकाही भारतीय एजंटला पाहिले नाही किंवा कोणी माझ्याशी किंवा माझ्या कुटुंबाशी संपर्कही साधलेला नाही.’