शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

मनमोहनसिंग यांना न्यायालयात बोलवा

By admin | Updated: September 21, 2015 23:27 IST

तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यालयाने प्रकरणाची तपासणी आणि पुनर्तपासणी केल्यानंतरच जिंदल समूहाला कोळसा खाणपट्टा वाटप करण्याचा निर्णय घेतला होता

नवी दिल्ली : तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यालयाने प्रकरणाची तपासणी आणि पुनर्तपासणी केल्यानंतरच जिंदल समूहाला कोळसा खाणपट्टा वाटप करण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा माजी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री दासरी नारायण राव यांनी सोमवारी विशेष न्यायालयात केला. डॉ. मनमोहनसिंग यांना अतिरिक्त आरोपी म्हणून न्यायालयात बोलावण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकेला आपला पाठिंबा आहे, असे राव यावेळी म्हणाले.कोळसा खाणपट्टे वाटप प्रकरणात अतिरिक्त आरोपी म्हणून मनमोहनसिंग यांच्यासह अन्य दोघांनाही न्यायालयात बोलावण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांनी दाखल केली आहे. ‘झारखंडमधील मुर्गादंगल कोळसा खाणपट्टा नवीन जिंदल समूहाच्या कंपनीला वाटप करण्यात आला होता आणि त्यावेळी कोळसामंत्री असलेले मनमोहनसिंग यांनीच हा निर्णय घेतला होता’, असे या मागणीला पाठिंबा देताना राव यांच्या वकिलाने विशेष सीबीआय न्यायालयात सांगितले. ‘मी कोडा यांच्या मागणीचे समर्थन करीत आहे,’ असे राव यांच्या वतीने त्यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी न्यायालयात सांगितले. तथापि या मागणीला आपला पाठिंबाही नाही आणि त्याचा विरोधही करीत नाही, असे उद्योगपती नवीन जिंदल यांची वकील एस.व्ही. राजू म्हणाले. या प्रकरणातील १५ आरोपींमध्ये कोडा यांचाही समावेश आहे. मनमोहनसिंग यांच्यासह तत्कालीन ऊर्जा सचिव आनंद स्वरूप आणि तत्कालीन खाण सचिव जयशंकर तिवारी यांनाही अतिरिक्त आरोपी म्हणून समन्स बजावण्याची मागणी कोडा यांनी केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)