शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

चीनची पुन्हा युद्धाची भाषा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 02:15 IST

भारत-चीनमध्ये तणावाची स्थिती असताना चीनकडून सातत्याने युद्धाची भाषा बोलली जात आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही चीनच्या सैन्यात सर्व शत्रूंना मात देण्याची क्षमता असल्याचे म्हटले

बीजिंग : भारत-चीनमध्ये तणावाची स्थिती असताना चीनकडून सातत्याने युद्धाची भाषा बोलली जात आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही चीनच्या सैन्यात सर्व शत्रूंना मात देण्याची क्षमता असल्याचे म्हटले आहे. एका अर्थाने भारताला ही चेतावनी असल्याचे मानले जात आहे.पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ९० व्या स्थापना दिवसानिमित्त मंगोलियात झालेल्या आजवरच्या सर्वात मोठ्या लष्करी संचलनानंतर ते बोलत होते. सैन्याच्या ड्रेस परिधान केलेल्या शी जिनपिंग यांनी खुल्या जीपमधून आशियातील सर्वात मोठे सैन्य प्रशिक्षण केंद्र झुरिहे येथे १२ हजार सैन्याच्या परेडचे निरीक्षण केले. चीनच्या मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, १०० पेक्षा अधिक लढाऊ विमानांनी यावेळी उड्डाण केले. यावेळी ६०० प्रकारच्या हत्यारांचे प्रदर्शन करण्यात आले. सैनिकांना संबोधित करताना शी जिनपिंग म्हणाले की, मला विश्वास आहे की, आमच्या सैन्यात सर्व शत्रूंना मात देण्याची क्षमता आणि साहस आहे. तथापि, डोकलामवरून भारत आणि चीन यांच्यात सुरूअसलेल्या तणावाचा त्यांच्या भाषणात कुठे उल्लेख आला नाही.चीनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, हे प्रशिक्षण पूर्वनियोजित होते. आपल्या दहा मिनिटांच्या भाषणात शी जिनपिंग म्हणाले की, आमचे सैन्य एका मजबूत सैन्याच्या निर्मितीत नवा अध्याय लिहिण्यासाठी तयार आहे. विश्व शांती आणि सुरक्षा यात योगदान देण्यासाठी सैन्य तयार आहे. या कार्यक्रमाचे सरकारी टीव्ही आणि रेडिओवर प्रसारण करण्यात आले. भारतीय सीमेजवळ चीनने अलीकडेच ज्या रणगाड्यांचा सराव केला होता त्या रणगाड्यांचा आज संचलनात सहभाग करण्यात आला होता. अमेरिकी सैन्यानंतर चीनच्या सैन्याचा जगात दुसरा क्रमांक आहे. त्यांचे संरक्षण बजेट १५२ अमेरिकी डॉलर आहे. पीएलएची स्थापना १९२७ मध्ये झालेली आहे. (वृत्तसंस्था)१२००० जवान, १२९ विमाने -या संचलनात १२ हजार जवानांनी सहभाग घेतला होता. १२९ विमाने आणि ५७१ उपकरणांचा यात समावेश होता. डोंगफेंग मिसाईल (यात छोटे, मोठे आणि मध्यम क्षमतेचे रॉकेट आहेत) आणि रणगाडे व ड्रोन यांच्यासह विविध हत्यारांचे यावेळी प्रदर्शन करण्यात आले.युद्धाच्या काळात हेलिकॉप्टरद्वारे गतीने उतरणे आदी कसरती यावेळी सादर करण्यात आल्या. डोकलाम भागात भारत आणि चीन यांच्यात संघर्ष सुरू असताना हे संचलन आयोजित करण्यात आलेले आहे हे विशेष.