शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

चीनची पुन्हा युद्धाची भाषा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 02:15 IST

भारत-चीनमध्ये तणावाची स्थिती असताना चीनकडून सातत्याने युद्धाची भाषा बोलली जात आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही चीनच्या सैन्यात सर्व शत्रूंना मात देण्याची क्षमता असल्याचे म्हटले

बीजिंग : भारत-चीनमध्ये तणावाची स्थिती असताना चीनकडून सातत्याने युद्धाची भाषा बोलली जात आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही चीनच्या सैन्यात सर्व शत्रूंना मात देण्याची क्षमता असल्याचे म्हटले आहे. एका अर्थाने भारताला ही चेतावनी असल्याचे मानले जात आहे.पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ९० व्या स्थापना दिवसानिमित्त मंगोलियात झालेल्या आजवरच्या सर्वात मोठ्या लष्करी संचलनानंतर ते बोलत होते. सैन्याच्या ड्रेस परिधान केलेल्या शी जिनपिंग यांनी खुल्या जीपमधून आशियातील सर्वात मोठे सैन्य प्रशिक्षण केंद्र झुरिहे येथे १२ हजार सैन्याच्या परेडचे निरीक्षण केले. चीनच्या मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, १०० पेक्षा अधिक लढाऊ विमानांनी यावेळी उड्डाण केले. यावेळी ६०० प्रकारच्या हत्यारांचे प्रदर्शन करण्यात आले. सैनिकांना संबोधित करताना शी जिनपिंग म्हणाले की, मला विश्वास आहे की, आमच्या सैन्यात सर्व शत्रूंना मात देण्याची क्षमता आणि साहस आहे. तथापि, डोकलामवरून भारत आणि चीन यांच्यात सुरूअसलेल्या तणावाचा त्यांच्या भाषणात कुठे उल्लेख आला नाही.चीनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, हे प्रशिक्षण पूर्वनियोजित होते. आपल्या दहा मिनिटांच्या भाषणात शी जिनपिंग म्हणाले की, आमचे सैन्य एका मजबूत सैन्याच्या निर्मितीत नवा अध्याय लिहिण्यासाठी तयार आहे. विश्व शांती आणि सुरक्षा यात योगदान देण्यासाठी सैन्य तयार आहे. या कार्यक्रमाचे सरकारी टीव्ही आणि रेडिओवर प्रसारण करण्यात आले. भारतीय सीमेजवळ चीनने अलीकडेच ज्या रणगाड्यांचा सराव केला होता त्या रणगाड्यांचा आज संचलनात सहभाग करण्यात आला होता. अमेरिकी सैन्यानंतर चीनच्या सैन्याचा जगात दुसरा क्रमांक आहे. त्यांचे संरक्षण बजेट १५२ अमेरिकी डॉलर आहे. पीएलएची स्थापना १९२७ मध्ये झालेली आहे. (वृत्तसंस्था)१२००० जवान, १२९ विमाने -या संचलनात १२ हजार जवानांनी सहभाग घेतला होता. १२९ विमाने आणि ५७१ उपकरणांचा यात समावेश होता. डोंगफेंग मिसाईल (यात छोटे, मोठे आणि मध्यम क्षमतेचे रॉकेट आहेत) आणि रणगाडे व ड्रोन यांच्यासह विविध हत्यारांचे यावेळी प्रदर्शन करण्यात आले.युद्धाच्या काळात हेलिकॉप्टरद्वारे गतीने उतरणे आदी कसरती यावेळी सादर करण्यात आल्या. डोकलाम भागात भारत आणि चीन यांच्यात संघर्ष सुरू असताना हे संचलन आयोजित करण्यात आलेले आहे हे विशेष.