शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाराचा पैसा अतिरेक्यांना?

By admin | Updated: January 24, 2017 01:03 IST

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दोन व्यापार केंद्रे हवाला व्यवहारातून दहशतवादी गटांना पैसा पुरवत आहेत का याची चौकशी एनआयए करीत आहे.

हरिष गुप्ता / नवी दिल्लीभारत आणि पाकिस्तान यांच्यातील दोन व्यापार केंद्रे हवाला व्यवहारातून दहशतवादी गटांना पैसा पुरवत आहेत का याची चौकशी एनआयए करीत आहे. एनआयएने नुकतेच काश्मीर आणि दिल्लीतून ३५० पेक्षा जास्त व्यापाऱ्यांकडील दप्तर (रेकॉर्डस) जप्त केले. मालाच्या अदलाबदलीच्या नावाखाली काश्मीरमधील तसेच इतर भागांतील दहशतवादी आणि फुटीरवाद्यांच्या कारवायांना पैसा पुरविण्यासाठी वापरण्यात आला आहे का या चौकशीसाठी हे दप्तर जप्त करण्यात आले.एनआयएच्या गुप्त शाखेने गोपनीय माहितीनंतर उरी आणि पूंछमध्ये या महिन्याच्या सुरवातीला मालाच्या अदलाबदली केंद्रांवर छापे मारले. या अदलाबदलीच्या व्यापारात मालाची किमत प्रत्यक्षापेक्षा वेगळी दाखवली गेली. उरी आणि पूंछ केंद्रांतील व्यापाऱ्यांनी ३०० कोटी रुपयांचा बेसुमार नफा कमावला आणि तो दहशतवादी आणि फुटीरवाद्यांना दिला गेला, असा एनआयएचा अंदाज आहे.पाकिस्तानी व्यापाऱ्यांनी त्यांच्या भारतीय भागीदार व्यापाऱ्यांना माल स्वस्तात विकला. हा व्यापार रोखविरहीत असून मालाच्या बदल्यात मालच दिला व घेतला जातो. त्यामुळे एकमेकांत ठरवून किमत ठरवली जाते. जम्मू आणि काश्मीरमध्ये व्यापाऱ्यांना एकदा माल मिळाला की ते तो माल दिल्ली, जम्मू आणि पंजाबमधील घाऊक व्यापाऱ्यांना विकला जातो. हा माल व्यापाऱ्यांना त्याच्या किमतीच्या ४० टक्क्यांनी विकला जातो तर उर्वरीत रक्कम रोखीने दिली जाते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अदलाबदलीचा हा व्यापार डॉ. मनमोहनसिंग यांच्या राजवटीत आॅक्टोबर २००८ मध्ये विशेष कराराने सुरू झाला. उरी आणि पूंछ येथे नियंत्रण रेषेवर या दोन भागातील व्यापाऱ्यांसाठी दोन केंद्रे उघडण्यात आली. करारानुसार या व्यापारात रोख असणार नाही व दोन देशांतील व्यापार आणि मालाच्या अदलाबदलीसाठी फक्त २१ वस्तूच निश्चित करण्यात आल्या होत्या. मालाचा भाव व्यापाऱ्यांकडून ठरवला जाणार होता.उरी आणि पूंछ, दिल्ली आणि इतर भागांतील घाऊक बाजारांतून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची आणि छाननी एनआयएची गुप्त शाखा आता करीत आहे. उरी आणि पूंछ येथील व्यापाऱ्यांनी व्यवहारांतून अतिरिक्त ३०० कोटी रुपये कमावले असून हा पैसा फुटीरवाद्यांपर्यंत पोहोचला आहे, असे एनआयएने लक्षात आणून दिले आहे. जम्मू आणि काश्मीर सरकारमधील काही नोकरशहा आणि खोऱ्यातील राजकीय नेते या व्यवहारांमागे आहेत का आणि त्या पैशांचे लाभार्थी बनले आहेत का याचाही एनआयए शोध घेत आहे.