शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

बुलेट ट्रेनच्या रोज होणार ७० फेऱ्या, दर २0 मिनिटांनी एक ट्रेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 06:20 IST

सरासरी प्रवासीक्षमता एक हजार धरल्यास जाणारे ३५ हजार व येणारे ३५ हजार प्रवासी मिळणे आवश्यक आहे

नवी दिल्ली : बुलेट ट्रेनचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. त्यानंतर मुंबई ते अहमदाबादचा प्रवास दोन तासांत पूर्ण होईल. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसी) रेल्वेसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.बुलेट ट्रेन स्टेशन जुन्या आणि नव्या साबरमती स्टेशनच्या मध्ये होणार आहे. साबरमतीहून बुलेट ट्रेन निघून अहमदाबादेतीलकालूपूरला येईल. मुंबई (वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स) ते साबरमती हे अंतर फास्ट ट्रेन २.०७ तासांत पूर्ण करेल. सर्व १२ स्टेशनवर थांबणारी रेल्वे हे अंतर २.५८ तासांत पूर्ण करेल.अधिका-यांनी सांगितले की, सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ५ ते ९ या काळात दर तासाला तीन रेल्वे धावतील. म्हणजेच दर २० मिनिटाला एक रेल्वे धावणार आहे. उर्वरित वेळेत एका तासात दोन रेल्वे धावणार आहेत. बुलेट ट्रेनमध्ये सुरुवातीला प्रवाशांची क्षमता प्रति ट्रेन ७५० एवढी असेल. ही क्षमता वाढवून नंतर ती १२५० प्रवासी करण्यात येईल. यासाठी ३५ बुलेट ट्रेन विकत घेतल्या जाणार आहेत.बुलेट ट्रेनचा अधिकाधिक स्पीड ३५० किमी प्रतितास व सरासरी स्पीड ३२० किमी प्रतितास असेल. अहमदाबाद ते मुंबई रेल्वे प्रवासाला ७ तास लागतात. विमानाने एक तास लागतो. या दोन्ही शहरांतून रोज २० रेल्वे धावतात व १० विमानेही निघतात. आता बुलेट ट्रेनही १५ आॅगस्ट २०२२ पासून धावू लागेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.रोज एवढे प्रवासी मिळतील?मुंबई व अहमदाबाद येथून रोज ३५ बुलेट ट्रेन निघतील. त्यांची सरासरी प्रवासीक्षमता एक हजार धरल्यास जाणारे ३५ हजार व येणारे ३५ हजार प्रवासी मिळणे आवश्यक आहे. इतके प्रवासी रोज बुलेट ट्रेनने प्रवास करतील का, त्यांना तिचे भाडे परवडेल का, हा प्रश्नच आहे