शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बुलेट ट्रेनचे भूमिपूजन १४ सप्टेंबर रोजी ! १२ ते १५ लाख लोकांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 05:16 IST

पितृपक्ष सुरू असतानाच १४ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व जपानचे पंतप्रधान आबे शिंजो यांच्या हस्ते साबरमतीजवळ मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा पायाभरणी समारंभ होणार आहे. मुंबईहून अहमदाबाद समुद्रमार्गे जाणारा हा प्रकल्प २0२३ पर्यंत पूर्ण करण्याचे रेल्वेने ठरविले असले तरी २0२२ मध्येच हायस्पीड ट्रेन धावू लागेल, असा दावा नवे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केला.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : पितृपक्ष सुरू असतानाच १४ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व जपानचे पंतप्रधान आबे शिंजो यांच्या हस्ते साबरमतीजवळ मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा पायाभरणी समारंभ होणार आहे. मुंबईहून अहमदाबाद समुद्रमार्गे जाणारा हा प्रकल्प २0२३ पर्यंत पूर्ण करण्याचे रेल्वेने ठरविले असले तरी २0२२ मध्येच हायस्पीड ट्रेन धावू लागेल, असा दावा नवे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केला.या प्रकल्पामुळे १२ ते १५ लाख लोकांना रोजगार मिळेल, असे सांगून पीयूष गोयल म्हणाले की, ही बुलेट ट्रन जपानी तंत्रज्ञान व सहकार्य यांच्या आधारे धावणार असली तरी काही वर्षांतच भारत बुलेट ट्रेनचे स्वत:चे तंत्रज्ञान तयार करेल आणि ते अन्य देशांत निर्यातही करू शकेल.या प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ १४ सप्टेंबर रोजी होणार असला तरी या रेल्वेसाठी अद्याप भूसंपादन सुरूच झालेले नाही. त्याविषयी विचारता रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा म्हणाले की, या प्रकल्पासाठी फारशी जमीन लागणारच नाही. पीयूष गोयल म्हणाले की, बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद अंतर दोन तासांत गाठता येईल.रेल्वेमंत्र्यांनी १२ ते १५ लाख लोकांना रोजगार मिळेल, असे म्हटले असले तरी रेल्वे मंत्रालयाच्या मते २0 हजार लोकांना तो मिळू शकेल. रेल्वेच्या म्हणण्यानुसार ४ हजार लोकांना थेट तर २0 हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. स्पीड ट्रेनची कल्पना स्व. माधवराव शिंदे यांनी १९८0 च्या दरम्यान मांडली होती आणि २00९ साली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अशा ट्रेनचा उल्लेख श्वेतपत्रात केला होता. तिचे काम आता सुरू होत आहे.मारुती कारची कल्पना संजय गांधी यांनी मांडली तेव्हा सर्वांनीच त्यांच्यावर टीका केली होती. पण या कारने भारतातील आॅटो इंडस्ट्रीमध्ये चमत्कार घडवून आणला, हे गोयल यांनी मान्य करतानाच, बुलेट ट्रेनचा निर्णयही असाच भारताचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.१.८ लाख हजार कोटी रुपये या प्रकल्पाला खर्च अपेक्षित असला तरी पंतप्रधान मोदी यांच्यामुळे जपानकडून एक टक्क्याने दीर्घ मुदतीचे तब्बल ८0 हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळणार आहे. दरमहा ७ ते ८ कोटी रुपये इतकाच हप्ता त्यामुळे भरावा लागेल. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे