शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर व पाकिस्तानातून ४७ अब्ज डॉलर्स एवढ्या प्रचंड खर्चाने एक आर्थिक कॉरिडॉर उभारणं भारतासाठी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 04:05 IST

काश्मीर व पाकिस्तानातून ४७ अब्ज डॉलर्स एवढ्या प्रचंड खर्चाने एक आर्थिक कॉरिडॉर उभे करण्याचे चीनचे राजकारण आपल्या उत्पादनासाठी अरबी समुद्रावर एका मोठ्या बंदराची उभारणी करण्याचे व त्याद्वारे जागतिक बाजारपेठेत लवकर उतरण्याचे आहे.

काश्मीर व पाकिस्तानातून ४७ अब्ज डॉलर्स एवढ्या प्रचंड खर्चाने एक आर्थिक कॉरिडॉर उभे करण्याचे चीनचे राजकारण आपल्या उत्पादनासाठी अरबी समुद्रावर एका मोठ्या बंदराची उभारणी करण्याचे व त्याद्वारे जागतिक बाजारपेठेत लवकर उतरण्याचे आहे. हा कॉरिडॉर काश्मिरातून जात असतानाही भारताचे त्याविषयीचे आक्षेप चीनने अत्यंत उद्दामपणे फेटाळून लावले आहेत आणि जगाचे राजकारणही त्याविषयी मूग गिळून राहिले आहे.ट्रम्प, अ‍ॅबे किंवा मेर्केल यासारखे वजनदार राजकारणीही याबाबत चीनला काही ऐकवू शकले नाही हे येथे महत्त्वाचे व त्याचे जागतिक क्षेत्रातील दुबळेपण भारताच्या लक्षात आणून देणारे आहे. हे वास्तव डोळ््यासमोर असतानाच चीनने आता भारताच्या पूर्वेला असाच एक मोठा कॉरिडॉर म्यानमारच्या प्रदेशातून बंगालच्या उपसागरापर्यंत उभारण्याचा संकल्प जाहीर केला आहे. कित्येक अब्ज डॉलर्स खर्च करून उभारला जाणारा हा कॉरिडॉर भारताची पूर्व बाजूलाही पुरती नाकेबंदी करणारा आहे. या कॉरिडॉरचा वापर दक्षिण चीन व तिबेट येथे तयार होणारा माल अल्पावधीत बंगालच्या उपसागरात व त्यामार्गे हिंदी महासागरात पोहचविण्याचा चीनचा प्रयत्न आहे. हा कॉरिडॉर नसल्यामुळे चीनला आपली उत्पादने दक्षिण चीनचा समुद्र व पॅसिफिक महासागरातून हिंदी महासागरात आणावी लागतात.म्यानमारमधील कॉरिडॉरमुळे त्याचा हा समुद्री फेरा हजारो किलोमीटर्सने कमी होणार आहे. मात्र याचवेळी चीनकडून, काश्मिरातील कॉरिडॉरमुळे भारताची पश्चिमेकडे व म्यानमारमधील कॉरिडॉरमुळे पूर्वेकडे पुरती नाकेबंदी होणार आहे. आर्थिक कॉरिडॉरचे क्षेत्र आर्थिकच नव्हे तर सर्वार्थाने चीनच्या नियंत्रणात राहणार आहे. या आधी असा कॉरिडॉर नेपाळ व बांगलादेश यातून बंगालच्या उपसागरापर्यंत पोहचविण्याचा चीनचा मानस होता. मात्र या दोन देशांच्या दरम्यान भारताचा भूप्रदेश येत असल्यामुळे त्याने ती योजना मागे घेतली आहे. तथापि भारताची पूर्व व पश्चिम या दोन्ही दिशांनी नाकेबंदी करणा-या चीनला भारतावर आपल्या दहशतीची मोठी छाया उभी करता येणार आहे. चीनचे भारताशी असलेले वैर जुने आहे.१९६२ पासूनच चीनने भारताच्या उत्तर सीमेवरील अनेक प्रदेशांवर त्याचा हक्क सांगितला आहे. काश्मीरचा एक तुकडा त्याच्या ताब्यात आजच आहे. अरुणाचलचाही काही भाग चीनच्या नियंत्रणात आहे आणि आता तर चीनने सबंध अरुणाचल हे राज्यच त्याचे असल्याचे जगाला सांगितले आहे. चीनने प्रकाशित केलेल्या नकाशात अरुणाचलचा प्रदेश चीनचा म्हणून दाखविला जातो. त्याचवेळी काश्मीरच्या पूर्वेचे काही भागही चिनी क्षेत्रात हे नकाशे दाखवीत असतात. चीनशी वाटाघाटी करण्याचा व सीमाप्रश्नावर कायम स्वरूपाचा तोडगा काढण्याचा भारताचा प्रयत्न थेट पं. नेहरूंच्या काळापासून सुरू आहे. मात्र चीनचे राज्यकर्ते त्या प्रयत्नांना दाद देताना अद्याप दिसले नाहीत. कोणते तरी निमित्त पुढे करून वाटाघाटी लांबवीत नेणे आणि सीमा प्रश्न जिवंत राहील असेच राजकारण करणे हा त्याच्या आंतरराष्ट्रीय भूमिकेचा एक भाग आहे. आपली लष्करी व आर्थिक दहशत सा-या जगाच्या कायम लक्षात राहावी हा चीनचा प्रयत्न आहे. ती तशी ठेवायची तर त्याला सभोवतालच्या देशांवर आपले लष्करी वर्चस्व असल्याचे दाखविणे गरजेचे आहे. यासाठी तो देश भारताचा गेली पाच दशके सातत्याने वापर करीत आला आहे. आता भारताच्या पूर्व व पश्चिम या दोन्ही दिशांना आपला आर्थिक (व लष्करीही) कॉरिडॉर उभा करण्याचे त्याचे राजकारण केवळ अर्थकारणाएवढे मर्यादित आहे असे समजण्याचे कारण नाही. त्याचे एक उद्दिष्ट लष्करीही आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिर