शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

विकतचे पाणी घेऊन मोफत पुरवठा भारतभूमी संस्थेचा उपक्रम : नागरिकांची भटकंती थांबली

By admin | Updated: July 13, 2015 16:07 IST

एस.आर. मुळे, शिरूर अनंतपाळ : पावसाने दडी मारल्याने सध्या शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ घागरभर पाण्यासाठी नागरिकांना रात्री-अपरात्री भटकंती करावी लागत असल्याचे पाहून येथील भारतभूमी सेवाभावी संस्थेच्या वतीने पाणी विकत घेऊन टँकरद्वारे मोफत पुरवठा सुरु केला आहे़ या उपक्रमामुळे नागरिकांची सोय झाली आहे.

एस.आर. मुळे, शिरूर अनंतपाळ : पावसाने दडी मारल्याने सध्या शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ घागरभर पाण्यासाठी नागरिकांना रात्री-अपरात्री भटकंती करावी लागत असल्याचे पाहून येथील भारतभूमी सेवाभावी संस्थेच्या वतीने पाणी विकत घेऊन टँकरद्वारे मोफत पुरवठा सुरु केला आहे़ या उपक्रमामुळे नागरिकांची सोय झाली आहे.
शिरूर अनंतपाळ शहरास घरणी मध्यम प्रकल्पाच्या शिवपूर जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणीपुरवठा केला जातो. परंतु, सध्या घरणी मध्यम प्रकल्पात अत्यल्प जलसाठा शिल्लक असून, गाळमिश्रित पाणी आहे. त्यामुळे हा पाणीपुरवठा नियमित नाही. त्याचबरोबर शहरातील अनेक हातपंप, विद्युतपंप बंद पडले आहेत. परिणामी, तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यातच पावसाने दडी मारली आहे़ पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ नागरिकांचा हा त्रास कमी व्हावा, यासाठी येथील भारतभूमी सेवाभावी संस्थेच्या वतीने डॉ. अरविंद भातांब्रे यांनी गेल्या १५ दिवसांपासून पाणी विकत घेऊन टँकरने गल्लोगल्ली मोफत पुरवठा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
या सेवाभावी संस्थेने पाणी वाटपासाठी चौघांची नियुक्ती केली असून, यात हमीद तांबोळी, नागेश भातांब्रे, श्रीराम गुराळे, शिवकांत संभाळे यांचा समावेश आहे़ ज्या गल्लीत तीव्र पाणीटंचाई आहे, त्यास प्रथम प्राधान्य देऊन पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ दिवसभरात टँकरच्या चार ते पाच खेपा विविध गल्लीत होतात़
चाळीस हजार खर्च...
दरम्यान, जून अखेरपासून सुरू झालेल्या या टँकरवर आजतागायत ४० हजार रुपयांचा खर्च झाला असून, प्रति टँकरला साधारणपणे ८०० रुपये खर्च येत असल्याचे डॉ. भातांब्रे यांनी सांगितले. दरम्यान, दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून, पाणीटंचाईच्या झळा वाढत आहेत. त्यामुळे पाऊस पडेपर्यंत मोफत पाणीपुरवठा करण्याचा संकल्प सेवाभावी संस्थेने केला आहे़