शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विकतचे पाणी घेऊन मोफत पुरवठा भारतभूमी संस्थेचा उपक्रम : नागरिकांची भटकंती थांबली

By admin | Updated: July 13, 2015 16:07 IST

एस.आर. मुळे, शिरूर अनंतपाळ : पावसाने दडी मारल्याने सध्या शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ घागरभर पाण्यासाठी नागरिकांना रात्री-अपरात्री भटकंती करावी लागत असल्याचे पाहून येथील भारतभूमी सेवाभावी संस्थेच्या वतीने पाणी विकत घेऊन टँकरद्वारे मोफत पुरवठा सुरु केला आहे़ या उपक्रमामुळे नागरिकांची सोय झाली आहे.

एस.आर. मुळे, शिरूर अनंतपाळ : पावसाने दडी मारल्याने सध्या शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ घागरभर पाण्यासाठी नागरिकांना रात्री-अपरात्री भटकंती करावी लागत असल्याचे पाहून येथील भारतभूमी सेवाभावी संस्थेच्या वतीने पाणी विकत घेऊन टँकरद्वारे मोफत पुरवठा सुरु केला आहे़ या उपक्रमामुळे नागरिकांची सोय झाली आहे.
शिरूर अनंतपाळ शहरास घरणी मध्यम प्रकल्पाच्या शिवपूर जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणीपुरवठा केला जातो. परंतु, सध्या घरणी मध्यम प्रकल्पात अत्यल्प जलसाठा शिल्लक असून, गाळमिश्रित पाणी आहे. त्यामुळे हा पाणीपुरवठा नियमित नाही. त्याचबरोबर शहरातील अनेक हातपंप, विद्युतपंप बंद पडले आहेत. परिणामी, तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यातच पावसाने दडी मारली आहे़ पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ नागरिकांचा हा त्रास कमी व्हावा, यासाठी येथील भारतभूमी सेवाभावी संस्थेच्या वतीने डॉ. अरविंद भातांब्रे यांनी गेल्या १५ दिवसांपासून पाणी विकत घेऊन टँकरने गल्लोगल्ली मोफत पुरवठा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
या सेवाभावी संस्थेने पाणी वाटपासाठी चौघांची नियुक्ती केली असून, यात हमीद तांबोळी, नागेश भातांब्रे, श्रीराम गुराळे, शिवकांत संभाळे यांचा समावेश आहे़ ज्या गल्लीत तीव्र पाणीटंचाई आहे, त्यास प्रथम प्राधान्य देऊन पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ दिवसभरात टँकरच्या चार ते पाच खेपा विविध गल्लीत होतात़
चाळीस हजार खर्च...
दरम्यान, जून अखेरपासून सुरू झालेल्या या टँकरवर आजतागायत ४० हजार रुपयांचा खर्च झाला असून, प्रति टँकरला साधारणपणे ८०० रुपये खर्च येत असल्याचे डॉ. भातांब्रे यांनी सांगितले. दरम्यान, दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून, पाणीटंचाईच्या झळा वाढत आहेत. त्यामुळे पाऊस पडेपर्यंत मोफत पाणीपुरवठा करण्याचा संकल्प सेवाभावी संस्थेने केला आहे़