गांधीनगर : गुजरात विधानसभेतील विरोधी पक्षनेते शंकरसिंग वाघेला यांनी नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे घटनेच्या चौकटीत राहून अयोध्येत राममंदिर बांधण्याची मागणी बुधवारी केली. त्यांचे हे वक्तव्य काँग्रेसला अडचणीत आणणारे ठरू शकते. येथे विधानसभेच्या विशेष सत्रात बोलताना ते म्हणाले, लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढली तेव्हा भाजपाकडे मताधिक्य होते. परंतु राष्टÑीय लोकशाही आघाडीमुळे वाजपेयींना समझोता करावा लागला. आता भाजपाला स्वबळावर बहुमत मिळाले आहे. रालोआसोबत असली तर ठीक पण नसली तरी राज्यघटनेच्या चौकटीत राहून अयोध्येत राममंदिराची निर्मिती करा. मोदी यांना निरोप देण्यासाठी या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. (प्रतिनिधी) वाघेला हे काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी राष्टÑीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाशी जुळलेले होते. यावेळी त्यांनी समान नागरी कायदा लागू करणे आणि काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासंबंधी भाजपाच्या आश्वासनाचाही उल्लेख केला. भाजपाशी नाते तोडल्यानंतर वाघेला यांनी १९९६ साली राष्टÑीय जनता पार्टी नामक पक्ष स्थापन केला होता आणि मुख्यमंत्रीही झाले. नंतर ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले. आपल्या भाषणात त्यांनी विविध वादग्रस्त मुद्यांसोबतच गोधराकांडाचाही उल्लेख केला. इ.स.२००२ मध्ये गोधरात साबरमती एक्स्प्रेस जळीतकांडानंतर राज्यात दंगली उसळल्या होत्या.
अयोध्येत राममंदिर निर्मिती करा -वाघेला
By admin | Updated: May 22, 2014 02:35 IST