शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

अर्थसंकल्पातील आकडेच संशयास्पद; काँग्रेसचा आरोप

By admin | Updated: February 2, 2017 02:36 IST

यंदाचा अर्थसंकल्प दिशाहीन असून, अत्यंत निराशाजनक आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने व्यक्त केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा म्हणाले की, सरकारने अर्थसंकल्पात दिलेली

- हरिश गुप्ता, नवी दिल्ली

लोकसभेचे सदस्य ई. अहमद यांचे बुधवारी पहाटे अचानक निधन झाले. प्रथा वा संकेताप्रमाणे सभागृहाचे कामकाज स्थगित केले जाते. याच प्रथेचा आधार घेत सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करावे व अर्थसंकल्प दुसऱ्या दिवशी सादर करावा असा आग्रह करून काँग्रेसने तत्वत: राजकीय पेचप्रसंग निर्माण केला होता. सभागृह स्थगित करून अर्थसंकल्प मांडणेही स्थगित करावे अशी काँग्रेसची इच्छा होती.लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना सकाळी साडेदहा वाजता भेटले व अर्थसंकल्प उद्यापर्यंत लांबणीवर टाकावा, अशी मागणी केली. राष्ट्रपतींनी अर्थसंकल्प मांडण्यास परवानगी दिली असून तो मांडणे ही घटनात्मक गरज आहे, असे महाजन यांनी शिष्टमंडळाला सांगण्याचा प्रयत्न केला. दुसरे म्हणजे सभागृहाचे कामकाज स्थगित करणे हा संकेत आहे. परंतु कायद्यात तशी तरतूद नाही. परंतु शिष्टमंडळाने केवळ अर्थसंकल्प मांडायचा आहे म्हणून संकेत मोडला जायला नको, असा युक्तिवाद केला. अर्थसंकल्प दोन फेब्रुवारी रोजी सादर केला गेला तर काही आभाळ कोसळणार नाही, असे खरगे म्हणाले. ही बैठक सुरू असताना लोकसभा सचिवालयाचे अधिकारी महाजन यांच्याकडे धावत आले. त्यांनी त्यांच्या हे निदर्शनास आणले की लोकसभेच्या विद्यमान सदस्याचे निधन झाल्यानंतरही अर्थसंकल्प सादर करण्यात आला. दोन वेळा असे झाले व या दोन्ही वेळेस सरकार काँग्रेसचे होते.१९ एप्रिल १९५४ रोजी पॉल जे सोरेन यांचे निधन झाले होते. मात्र, लोकसभेत संध्याकाळी रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तर, ३० जुलै १९७४ रोजी उद्योग राज्य मंत्री एम. बी. राणा यांचे निधन झाले. काँग्रेस पक्षासाठी हा धक्का होता. सकाळी ११.०५ वाजता लोकसभा तहकूब करण्यात आली. पण, त्याच दिवशी रात्री कामकाज पुन्हा सुरू झाले. तत्कालिन इंदिरा गांधी सरकारने त्याच रात्री अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प पुढे ढकलण्याचा असा पायंडा नाहीहे संदर्भ बुधवारी सभागृहात देण्यात आले आणि सरकारने अर्थसंकल्प सादर करण्यासाठी पुढे पाऊल टाकण्याचे सूचित केले. त्यानंतर अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थात, गुुरुवारी लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात येईल, असे सर्वानुमते ठरले. लोकसभेतील माजी महासचिव सुभाष सी. कश्यप म्हणाले की, अर्थसंकल्प पुढे ढकलण्याचा असा कोणताही पायंडा नाही.