शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

बजेटचा राजकीय फायदा उठवण्याचा विचार नाही

By admin | Updated: January 31, 2017 00:22 IST

पाच राज्यातील निवडणुकांच्या आधी अर्थसंकल्प सादर करून, केंद्रातील भाजपा सरकार राजकीय फायदा उठवू पाहत असल्याच्या आरोपाचा सरकारने इन्कार केला. अर्थसंकल्पाद्वारे

नवी दिल्ली : पाच राज्यातील निवडणुकांच्या आधी अर्थसंकल्प सादर करून, केंद्रातील भाजपा सरकार राजकीय फायदा उठवू पाहत असल्याच्या आरोपाचा सरकारने इन्कार केला. अर्थसंकल्पाद्वारे सरकार राजकीय फायदा उठवू पाहत असल्याचे आरोप खरे नाहीत, असे सरकारने म्हटले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन मंगळवारपासून सुरू होत आहे. त्याआधी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, निवडणुकीच्या काळातील मतभेद बाजूला ठेऊन सर्वांनी काम करण्याची गरज आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांच्या कामकाजावर बहिष्कार घालण्याचा निर्णय तृणमूल काँग्रेसने जाहीर केला आहे. आजच्या सर्वपक्षीय बैठकीवर सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेनेही बहिष्कार घातला होता. बैठकीनंतर काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, हा अर्थसंकल्प निवडणुकांवर प्रभाव पाडू शकतो. त्यामुळे तूर्तास अर्थसंकल्प सादर करण्यात येऊ नये. सीबीआयचा दुरुपयोग करुन आपल्या पक्षाच्या एका खासदाराला अटक केल्याचा आरोप करत हा मुद्दा आगामी अधिवेशनात मांडणार असल्याचे तृणमूलने स्पष्ट केले आहे. या बैठकीनंतर संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी सर्व पक्षांना सहकार्य मागितले आहे. निवडणूक काळात आमच्यात काही मतभेद होऊ शकतात. पण, संसद महापंचायत आहे. येथे सर्वांनी मिळूून काम करण्याची गरज आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)पुन्हा नोटाबंदीचा मुद्दानोटाबंदीचा मुद्दा पुन्हा मांडणार असल्याचे संकेत विरोधकांनी दिले आहेत. याच मुद्यावरुन गत अधिवेशनात कामकाज होऊ शकले नव्हते. काँग्रेस आणि माकपच्या नेतृत्वातील विरोधी पक्षांनी या सर्वपक्षीय बैठकीत स्पष्ट केले की, नोटाबंदीच्या मुद्यावर चर्चा व्हायला हवी. नोटाबंदीला कडाडून विरोध करणाऱ्या तृणमूल काँग्रेसने बैठकीला हजेरी लावली नाही. - बैठकीनंतर काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, हा अर्थसंकल्प निवडणुकांवर प्रभाव पाडू शकतो. त्यामुळे तूर्तास अर्थसंकल्प सादर करण्यात येऊ नये.