शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

अर्थसंकल्प - २०१६

By admin | Updated: February 29, 2016 00:00 IST

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली त्यावेळी एका निवांतक्षणी टिपलेला त्यांचा फोटो.अर्थसंकल्पाने शेअर बाजाराला निराश केले. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १५२ अंकांच्या घसरणीसह २३००२ वर बंद झाला.तर निफ्टीतही ४३ अंकांची घसरण होऊन ६ ९८७ अंकांवर बंद झाला.प्रत्येक स्वयंपाकघर धूरमुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी गरीबातल्या ...

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली त्यावेळी एका निवांतक्षणी टिपलेला त्यांचा फोटो.

अर्थसंकल्पाने शेअर बाजाराला निराश केले. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १५२ अंकांच्या घसरणीसह २३००२ वर बंद झाला.तर निफ्टीतही ४३ अंकांची घसरण होऊन ६ ९८७ अंकांवर बंद झाला.

प्रत्येक स्वयंपाकघर धूरमुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी गरीबातल्या गरीब घरामध्ये एलपीजी सिलिंडर कनेक्शन देण्यात येणार असून सुरुवातीला २००० कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

औष्णिक विजेसारख्या पारंपरिक स्रोतांना असलेल्या मर्यादांचा विचार करून अणुऊर्जा निर्मितीसाठी पुढच्या १५ ते २० वर्षांचा विचार या अर्थसंकल्पामध्ये केला आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये संरक्षण क्षेत्रासाठी देण्यात आलेल्या निधीत केवळ ४.८ टक्के इतकीच वाढ झाल्याचे दिसते.

सरकारने गरजुंसाठी सुरु केलेल्या सुविधांचा फायदा त्यांना घेता यावा यासाठी सरकार आधार कार्डला घटनात्मक दर्जा देणार आहे.

भारतात सलग पाचव्यावर्षी सिगारेटच्या किंमती वाढणार आहेत. अर्थसंकल्पामध्ये सर्व तंबाखू उत्पादनांच्या उत्पादन शुल्क दरात १० ते १५ टक्के वाढ करण्यात आली आहे. फक्त बिडीवरील उत्पादन शुल्कात कोणतीही वाढ केलेली नाही.

कृषी क्षेत्र आणि शेतक-यांच्या कल्याणासाठी ३५९८४ कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली आहे. अर्थसंकल्पामध्ये फक्त सिंचनासाठी नाबार्ड अंतर्गत २० हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्यात येणार आहे.

जागतिक अर्थव्यवस्था संकटात आहे वित्तीय बाजारपेठेत घसरण सुरु आहे मात्र या परिस्थितीतही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आहे असे सुरुवातीलाच सांगत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी (दि.२९) २०१६-१७ चा अर्थसंकल्प संसदेत सादर केला.