शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा राखण्यात बसपा अपयशी?

By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीची किंमत बहुजन समाज पार्टी अर्थात बसपाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावून मोजावी लागणार आहे़ आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा वाचविण्यासाठी बसपाने दिल्ली विधानसभेच्या सर्व ७० जागांवर आपले उमेदवार उतरविले होते़ याठिकाणी दोन जागा आणि सहा टक्के मते मिळविण्याचे लक्ष्य बसपापुढे होते़ मात्र हे लक्ष्य गाठण्यात बसपा अपयशी ठरली आहे़

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीची किंमत बहुजन समाज पार्टी अर्थात बसपाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावून मोजावी लागणार आहे़ आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा वाचविण्यासाठी बसपाने दिल्ली विधानसभेच्या सर्व ७० जागांवर आपले उमेदवार उतरविले होते़ याठिकाणी दोन जागा आणि सहा टक्के मते मिळविण्याचे लक्ष्य बसपापुढे होते़ मात्र हे लक्ष्य गाठण्यात बसपा अपयशी ठरली आहे़
लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत जागा आणि मतांच्या टक्केवारीचे लक्ष्य गाठता न आल्याने बसपापुढे दिल्ली निवडणुकीच्या निमित्ताने एक संधी होती़ मात्र दिल्ली विधानसभा निवडणुकीतही पक्षाची कामगिरी या कसोटीवर कमी पडली़ दिल्लीत बसपाला केवळ १़४ टक्के मते मिळाली़अनेक मतदारसंघात बसपा उमेदवारांना १००० पेक्षाही कमी मते मिळाली़ तथापि काही उमेदवारांनी चांगली मते घेतली़ दोन जागा आणि सहा टक्के मते मिळविण्याचे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरल्यानंतर बसपाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा संपुष्टात आणण्यासंदर्भात नोटीस जारी करण्याची तयारी निवडणूक आयोगाने चालवली आहे़
बसपाने दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल येईपर्यंत पक्षाच्या राष्ट्रीय पक्षाच्या दर्जाबाबतचा निर्णय स्थगित ठेवण्याची विनंती आयोगाकडे केली होती़


बॉक्स
सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीनंतर निवडणूक आयोगाने बहुजन समाज पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीला कारणे दाखवा नोटीस जारी करून आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा का संपुष्टात येऊ नये, अशी विचारणा केली होती़

बॉक्स
लोकसभा निवडणुकीत किमान तीन राज्यांमध्ये दोन टक्के मते(११ जागा) जिंकणाऱ्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळू शकते़ तसेच लोकसभेच्या किमान चार जागा आणि कमीत कमी चार राज्यांत विधानसभा निवडणुकीत पडलेल्या वैध मतांपैकी सहा टक्के मते मिळविणारा पक्ष राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यास पात्र ठरतो़