शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टफोनचा अतीवापर वेळेआधी आणतं म्हातारपण

By admin | Updated: July 4, 2017 10:53 IST

स्मार्टफोन फक्त एक संपर्काचं साधन राहिलं नसून आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग बनला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - स्मार्टफोन फक्त एक संपर्काचं साधन राहिलं नसून आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग बनला आहे. महत्वाचं म्हणजे आपण पुर्णपणे स्मार्टफोनवर अवलंबून असतो. अगदी फोन करण्यापासून ते मोठे व्यवहार करण्यापर्यंत सर्व काही एका स्मार्टफोनवरुन करता येत. नेमकं याचमुळे स्मार्टफोन खिशात असणं म्हणजे स्मार्ट असण्याचं लक्षण समजलं जातं. मात्र याची दुसरी बाजूही आहे जी सर्वांसाठी धोकादायक आहे. स्मार्टफोन जितका उपयोगी आहे तितकाच तो आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. 
 
स्मार्टफोनचा अतिवापर आपल्याला वृद्धावस्थेकडे घेऊन जात आहे. स्मार्टफोनमुळे तरुणपणातच लोक 80 वर्षाच्या म्हाता-याप्रमाणे चालू, वागू लागतात. सोबतच शारिरीक आजारही उद्भवत आहे. यामध्ये सर्वात जास्त कंबर आणि मानेच्या वेदनेचा समावेश आहे. 
 
वैज्ञानिकांनी 21 जणांवर सर्व्हे केला. सर्व्हे करताना सर्वांवर आय ट्रॅकरच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली होती. यावेळी त्यांच्या 252 हालचालींचं निरीक्षण करण्यात आलं. सर्व्हे करत असताना 46 टक्के लोक चालताना स्मार्टफोनचा वापर करत असल्याचं लक्षात आलं. मेसेज वाचायचा असो किंवा टाईप करायचा असो, तसंच फोनवर बोलताना लोक स्मार्टफोनचा वापर करत होते. चालताना स्मार्टफोनचा वापर केल्यास चालण्याचा वेग कमी होतो, आणि एखाद्या 80 वर्षाच्या म्हाता-याप्राणे लोक चालू लागतात.  
 
संशोधक डॉ टिमिस यांनी सांगितलं की, सर्व्हे करत असताना एका व्यक्तीला पाहिलं असता ही गोष्ट माझ्या लक्षात आली. ती व्यक्ती माझ्या पुढे चालत होती तेव्ही तो दारु पिऊन चालत असावा असा मला संशय आला. मात्र मी पुढे जाऊन पाहिलं तर तो चालता चालता स्मार्टफोनचा वापर करत होता. 
 
जगभरात स्मार्टफोन युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांची आकडेवारी पाहता अनेक देशांनी स्मार्टफोन युजर्सना वेगवेगळ्या सुविधा देण्यासही सुरुवात केली आहे. म्हणजे सांगायचंच झालं तर, चीनमध्ये अशा लोकांसाठी खास वेगळा फूटपाथच तयार करण्यात आला आहे. जेणेकरुन स्मार्टफोन युजरला चालताना कोणताही त्रास होणार नाही. तर नेदरलँडमध्येही अशाच प्रकारची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. इतकंच नाही, तर प्लस वनने केलेल्या सर्व्हेत स्मार्टफोनमुळे नात्यांमध्ये दुरावा येत असल्याचं समोर आलं होतं. जास्तीत जास्त वेळ स्मार्टफोनमध्ये घालवत असल्याने अनेक नाती संपत असल्याचं सर्व्हेत सांगण्यात आलं होतं.