शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

स्मार्टफोनचा अतीवापर वेळेआधी आणतं म्हातारपण

By admin | Updated: July 4, 2017 10:53 IST

स्मार्टफोन फक्त एक संपर्काचं साधन राहिलं नसून आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग बनला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - स्मार्टफोन फक्त एक संपर्काचं साधन राहिलं नसून आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग बनला आहे. महत्वाचं म्हणजे आपण पुर्णपणे स्मार्टफोनवर अवलंबून असतो. अगदी फोन करण्यापासून ते मोठे व्यवहार करण्यापर्यंत सर्व काही एका स्मार्टफोनवरुन करता येत. नेमकं याचमुळे स्मार्टफोन खिशात असणं म्हणजे स्मार्ट असण्याचं लक्षण समजलं जातं. मात्र याची दुसरी बाजूही आहे जी सर्वांसाठी धोकादायक आहे. स्मार्टफोन जितका उपयोगी आहे तितकाच तो आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. 
 
स्मार्टफोनचा अतिवापर आपल्याला वृद्धावस्थेकडे घेऊन जात आहे. स्मार्टफोनमुळे तरुणपणातच लोक 80 वर्षाच्या म्हाता-याप्रमाणे चालू, वागू लागतात. सोबतच शारिरीक आजारही उद्भवत आहे. यामध्ये सर्वात जास्त कंबर आणि मानेच्या वेदनेचा समावेश आहे. 
 
वैज्ञानिकांनी 21 जणांवर सर्व्हे केला. सर्व्हे करताना सर्वांवर आय ट्रॅकरच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली होती. यावेळी त्यांच्या 252 हालचालींचं निरीक्षण करण्यात आलं. सर्व्हे करत असताना 46 टक्के लोक चालताना स्मार्टफोनचा वापर करत असल्याचं लक्षात आलं. मेसेज वाचायचा असो किंवा टाईप करायचा असो, तसंच फोनवर बोलताना लोक स्मार्टफोनचा वापर करत होते. चालताना स्मार्टफोनचा वापर केल्यास चालण्याचा वेग कमी होतो, आणि एखाद्या 80 वर्षाच्या म्हाता-याप्राणे लोक चालू लागतात.  
 
संशोधक डॉ टिमिस यांनी सांगितलं की, सर्व्हे करत असताना एका व्यक्तीला पाहिलं असता ही गोष्ट माझ्या लक्षात आली. ती व्यक्ती माझ्या पुढे चालत होती तेव्ही तो दारु पिऊन चालत असावा असा मला संशय आला. मात्र मी पुढे जाऊन पाहिलं तर तो चालता चालता स्मार्टफोनचा वापर करत होता. 
 
जगभरात स्मार्टफोन युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांची आकडेवारी पाहता अनेक देशांनी स्मार्टफोन युजर्सना वेगवेगळ्या सुविधा देण्यासही सुरुवात केली आहे. म्हणजे सांगायचंच झालं तर, चीनमध्ये अशा लोकांसाठी खास वेगळा फूटपाथच तयार करण्यात आला आहे. जेणेकरुन स्मार्टफोन युजरला चालताना कोणताही त्रास होणार नाही. तर नेदरलँडमध्येही अशाच प्रकारची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. इतकंच नाही, तर प्लस वनने केलेल्या सर्व्हेत स्मार्टफोनमुळे नात्यांमध्ये दुरावा येत असल्याचं समोर आलं होतं. जास्तीत जास्त वेळ स्मार्टफोनमध्ये घालवत असल्याने अनेक नाती संपत असल्याचं सर्व्हेत सांगण्यात आलं होतं.