शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जाधव यांना लगेच भारतात परत आणा, भेटीच्या वेळी अपमान हे सरकारचे अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 04:00 IST

नवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी इस्लामाबादला गेलेल्या त्यांच्या पत्नी व आईला पाकिस्तानकडून अपमानास्पद वागणूक दिली जाणे हे भारत सरकारचे अपयश आहे, अशी टीका काँग्रेसने बुधवारी केली

नवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी इस्लामाबादला गेलेल्या त्यांच्या पत्नी व आईला पाकिस्तानकडून अपमानास्पद वागणूक दिली जाणे हे भारत सरकारचे अपयश आहे, अशी टीका काँग्रेसने बुधवारी केली व आणखी वेळ न घालवता जाधव यांना भारतात परत आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.चार दिवसांच्या सुटीनंतर संसदेचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षांनी जाधव कुटुंबियांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीचा धिक्कार केला व त्याच बरोबर सरकारलाही धारेवर धरले. लोकसभेत काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खारगे यांनी कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणण्याची मागणी केली.काँग्रेसखेरीज शिवसेना, अण्णाद्रमुक व तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनीही निषेधाची वक्तव्ये केली. शिवसेनेचे अनंत गिते यांनी हा मुद्दा उपस्थित केला व सरकारने आता अजिबात गप्प बसू नये, असा आग्रह केला. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी यावर स्वत: निवेदन करावे, अशीही सदस्यांची मागणी होती. सभागृहाबाहेर ज्येष्ठ काँग्रेस नेते एम. विरप्पा मोईली म्हणाले की, जाधव कुटुंबियांना मिळालेली वागणूक अमानवीय आहे. हे सरकार व परराष्ट्र मंत्रालयाचे अपयश आहे. जाधव यांची आई व पत्नी तेथे जाण्यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाने भेटीचा ‘प्रोटोकॉल’ ठरवून घ्यायला हवा होता.>भारताने युध्द करून पाकिस्तानचे चार तुकडे करावेत आणि डोकेदुखी कायमची मिटवून टाकावी, असे मत भाजपा नेते व राज्यसभा सदस्य डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी टिष्ट्वटरवर व्यक्त केले. सूडाने आणि कपटाने वागणाºया या शेजाºयाला धडा शिकविण्याचा हाच एकमेव मार्ग आहे व त्याची तयारी आत्तापासूनच गांभीर्याने सुरू करायला हवी, असेही स्वामी यांनी म्हटले. आज हे माझे व्यक्तिगत मत असले, तरी यापूर्वी माझी मते नंतर पक्षाचीही मते बनली आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस