शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

जाधव यांना लगेच भारतात परत आणा, भेटीच्या वेळी अपमान हे सरकारचे अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 04:00 IST

नवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी इस्लामाबादला गेलेल्या त्यांच्या पत्नी व आईला पाकिस्तानकडून अपमानास्पद वागणूक दिली जाणे हे भारत सरकारचे अपयश आहे, अशी टीका काँग्रेसने बुधवारी केली

नवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी इस्लामाबादला गेलेल्या त्यांच्या पत्नी व आईला पाकिस्तानकडून अपमानास्पद वागणूक दिली जाणे हे भारत सरकारचे अपयश आहे, अशी टीका काँग्रेसने बुधवारी केली व आणखी वेळ न घालवता जाधव यांना भारतात परत आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.चार दिवसांच्या सुटीनंतर संसदेचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षांनी जाधव कुटुंबियांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीचा धिक्कार केला व त्याच बरोबर सरकारलाही धारेवर धरले. लोकसभेत काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खारगे यांनी कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणण्याची मागणी केली.काँग्रेसखेरीज शिवसेना, अण्णाद्रमुक व तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनीही निषेधाची वक्तव्ये केली. शिवसेनेचे अनंत गिते यांनी हा मुद्दा उपस्थित केला व सरकारने आता अजिबात गप्प बसू नये, असा आग्रह केला. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी यावर स्वत: निवेदन करावे, अशीही सदस्यांची मागणी होती. सभागृहाबाहेर ज्येष्ठ काँग्रेस नेते एम. विरप्पा मोईली म्हणाले की, जाधव कुटुंबियांना मिळालेली वागणूक अमानवीय आहे. हे सरकार व परराष्ट्र मंत्रालयाचे अपयश आहे. जाधव यांची आई व पत्नी तेथे जाण्यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाने भेटीचा ‘प्रोटोकॉल’ ठरवून घ्यायला हवा होता.>भारताने युध्द करून पाकिस्तानचे चार तुकडे करावेत आणि डोकेदुखी कायमची मिटवून टाकावी, असे मत भाजपा नेते व राज्यसभा सदस्य डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी टिष्ट्वटरवर व्यक्त केले. सूडाने आणि कपटाने वागणाºया या शेजाºयाला धडा शिकविण्याचा हाच एकमेव मार्ग आहे व त्याची तयारी आत्तापासूनच गांभीर्याने सुरू करायला हवी, असेही स्वामी यांनी म्हटले. आज हे माझे व्यक्तिगत मत असले, तरी यापूर्वी माझी मते नंतर पक्षाचीही मते बनली आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस