चौकट-- लोकमतने मांडल्या पूरग्रस्तांच्या व्यथा
By admin | Updated: August 16, 2015 23:44 IST
नागपूर : १३ ऑगस्ट रोजी नागपुरात अतिवृष्टी झाली. शहरात आणि ग्रामीण भागात हाहाकार माजला. नदीकाठावरील गावांना फटका बसला. नागपूर शहरातही काही वस्त्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यात एकूण ११ जणांचे जीव गेले. शेकडोंचे संसार उघड्यावर आले. हजारो बेघर झाले. लोकमतने पुढाकार घेऊन पुरामुळे प्रभावित झालेल्या भागाचा दौरा केला. ...
चौकट-- लोकमतने मांडल्या पूरग्रस्तांच्या व्यथा
नागपूर : १३ ऑगस्ट रोजी नागपुरात अतिवृष्टी झाली. शहरात आणि ग्रामीण भागात हाहाकार माजला. नदीकाठावरील गावांना फटका बसला. नागपूर शहरातही काही वस्त्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यात एकूण ११ जणांचे जीव गेले. शेकडोंचे संसार उघड्यावर आले. हजारो बेघर झाले. लोकमतने पुढाकार घेऊन पुरामुळे प्रभावित झालेल्या भागाचा दौरा केला. पुरामुळे झालेले नुकसान व पूरग्रस्तांच्या व्यथांकडे प्रशसानाचे लक्ष वेधले. लोकमतच्या पुढाकाराने शासन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले. पालकमंत्री, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दौरे केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: पूरपरिस्थितीची माहिती घेऊन मुंबईवरून सूचना देत होते. रविवारी त्यांनी प्रत्यक्ष पाहणीही केली.