शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

"ती" चे लग्न दुस-याबरोबर झाले म्हणून दोघांनी केली आत्महत्या

By admin | Updated: May 10, 2017 13:12 IST

प्रेमाचे सूर जुळल्यानंतर प्रियकर-प्रेयसी आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतात. पण काहीवेळा काही कारणांमुळे प्रेमामध्ये दिलेला शब्द अखेरपर्यंत पाळता येत नाही.

 ऑनलाइन लोकमत 

रायपूर, दि. 10 - प्रेमाचे सूर जुळल्यानंतर प्रियकर-प्रेयसी आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतात. पण काहीवेळा काही कारणांमुळे प्रेमामध्ये दिलेला शब्द अखेरपर्यंत पाळता येत नाही. अशावेळी एकाने अचानक लग्नाला नकार दिल्यास तो धक्का दुस-याला सहन होत नाही. प्रेमात आपली फसवणूक झाली किंवा ती कोणा दुस-याची होणार हे दु:ख पचवता न आल्याने माणूस कोलमडून पडतो. त्यातून काहीवेळा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाते. 
 
रायपूरच्या बालोदा बाजारमध्ये दोन युवकांनी अशाच प्रेमविरहाच्या दुखातून गळफास घेऊन जीवन संपवले. अजय कनवर (18) आणि मुरीद साहू (19) अशी या दोन मुलांची नावे आहेत. अजय आणि मुरीदचे ज्या मुलींवर प्रेम होते. त्या मुलींचे रविवारी दुस-या मुलांबरोबर लग्न झाले. ज्या मुलींवर आपण जीवापाड प्रेम केले त्यांनीच आपल्याला दगा दिला अशी या दोन मुलांची भावना झाली होती. 
 
प्रेमात आपली फसवणूक झालीय. आता सर्व काही संपले आहे. आयुष्यात करण्यासारखे आता काही राहिलेले नाही असा टोकाचा विचार त्यांच्या मनात सुरु होता. त्यातूनच त्यांनी शेतातील आंब्याच्या झाडाला लटकून आत्महत्या केली. दोघांनी आत्महत्येसाठी एकाच रशीचा वापर केला. सोमवारी एका लग्न सोहळयामध्ये या दोघांना शेवटचे एकत्र पाहण्यात आले होते.