शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

बिहारमध्ये दोन्ही आघाड्या काठावर !

By admin | Updated: November 6, 2015 03:23 IST

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानोत्तर चाचण्यांमध्ये (एक्झिट पोल) मिश्र भाकीत वर्तविण्यात आले असून नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील महाआघाडी आणि भाजपाप्रणीत

एक्झिट पोलचा कौल : बरेच अंदाज महाआघाडीच्या निसटत्या यशाचे; चाणक्य मात्र रालोआच्या बाजूनेनवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानोत्तर चाचण्यांमध्ये (एक्झिट पोल) मिश्र भाकीत वर्तविण्यात आले असून नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील महाआघाडी आणि भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सत्तास्थापनेसाठी अटीतटीची रस्सीखेच अपेक्षित असल्याचे चित्र आहे. परंतु गेल्या लोकसभेत वास्तवाच्या सर्वाधिक जवळचे भाकीत केलेल्या टुडेज चाणक्यने रालोआला २४३ पैकी १५५ जागांवर विजयासह स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. इतर दोन मोठ्या एक्झिट पोलने महाआघाडीच पुन्हा सत्तेत येणार असल्याचे म्हटले आहे. तर आणखी काही चाचण्यांमध्ये महाआघाडीला निसटता विजय मिळेल, असा दावा करण्यात आला आहे. परंतु दोन वृत्तवाहिन्या आणि सर्वेक्षण संस्थांनी सावध पवित्रा घेत दोघांपैकी कुठलीही आघाडी बिहारमध्ये सरकार स्थापन करू शकते, असा निष्कर्ष काढला आहे. बिहारमधील पाच टप्प्यांतील मतदानाची प्रक्रिया गुरुवारी पूर्ण झाली असून, येत्या ८ नोव्हेंबरला रविवारी निकाल जाहीर होणार आहेत. सट्टेबाजांनी बिहारमध्ये भाजपा जिंकणार असे भाकीत केले होते. परंतु गेल्या आठवडाभरापासून मात्र या पक्षाचा पराभव होणार, या अंदाजाने शेअर बाजारात घसरण सुरू आहे. दुसरीकडे महाआघाडीच्या नेत्यांनी विजयोत्सव साजरा करणे सुरू केले असून, भाजपाचे नेते मात्र मतदानोत्तर चाचण्यांवर सतर्कपणे प्रतिक्रिया देत आहेत.शेवटच्या टप्प्यात ६० टक्के मतदानबिहार विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात गुरुवारी ५७ जागांसाठी झालेल्या मतदानात ६० टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यासोबतच राज्यात एकूण २४३ जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या ८ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.56.8% सरासरी मतदानएकूण पाच टप्प्यांत ५६.८ टक्के मतदान झाले असून बिहार विधानसभा निवडणुकीच्या इतिहासातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक मतदान आहे.- मागील चार टप्प्यांच्या तुलनेत अखेरच्या टप्प्यात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. सहरसा जिल्ह्यातील नक्षलग्रस्त सिमरी बख्तियारपूर आणि महिषी या दोन मतदारसंघांमध्ये सुरक्षेच्या कारणावरून दुपारी ३ वाजताच मतदान संपले. - बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात ५७ टक्के मतदान झाले होते. दुसऱ्या टप्प्यात ५४.५, तिसऱ्या टप्प्यात ५३.३२ आणि चौथ्या टप्प्यात ५७.५९ टक्के मतदान झाले.- विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ २९ नोव्हेंबरला संपतो आहे.बिहारचा एक्झिट पोलभाजपा+जदयू+इतरटुडे चाणक्य -न्यूज 24१५५८३५इंडिया टुडे ग्रुप -सिसरो१११-१२७११२-१३२४-८इंडिया टीव्ही- सीव्होटर्स१०१-१२१११२-१३२६-१४एबीपी न्यूज-नेल्सन१०८१३०५टाइम्स नाऊ- सीव्होटर्स११११२२१०न्यूजएक्स९०-१००१३०-१४०१३-२३न्यूज नेशन११७१२२४