शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

कर्ज नाही मदत मागितली होती, विजय माल्याच्या उलट्या बोंबा

By admin | Updated: January 28, 2017 15:12 IST

बँकांचे जवळपास 9000 कोटी रुपयांचे कर्ज बुडवून देशाबाहेर पसार झालेला फरार उद्योगपती विजय माल्याने किंगफिशर एअरलाइन्सच्या अधोगतीचे खापर केंद्र सरकारवर फोडले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 28 - बँकांचे जवळपास 9000 कोटी रुपयांचे कर्ज बुडवून देशाबाहेर पसार झालेला फरार उद्योगपती विजय माल्याने किंगफिशर एअरलाइन्सच्या अधोगतीचे खापर केंद्र सरकारवर फोडले आहे. सरकारची धोरणे आणि आर्थिक परिस्थितींमुळे किंगफिशर एअरलाइन्स रसातळाला गेली, असा आरोप माल्याने केला आहे. 
 
सरकारकडे कर्ज देण्यासाठी नाही तर  मदत करत करण्यासाठी विनंती केली होती, अशा उलट्या बोंबाच विजय माल्याने मारल्या आहेत.  सरकारी कंपनी 'एअर इंडिया'ला आर्थिक संकटातून उभारी मिळावी यासाठी जनतेचा पैसा वापरण्यात आला, मात्र सर्वात मोठ्या स्थानिक एअरलाइन कंपनीच्या बाबतीत हेच धोरण अंमलात आणले गेले नाही, असा कांगवा माल्याने केला आहे. 
 
ट्विट करत विजय माल्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी सरकारी धोरणांवर टीका केली आहे. 'कर्जाऐवजी सरकारने आपल्या धोरणांमध्ये बदल करुन मदत करावी', अशी मागणी केल्याचा दावा त्याने केला आहे.  शिवाय एअर इंडियाला देण्यात आलेल्या निधीवरही त्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, 'किंगफिशर एअरलाईन्स ज्यावेळी डबघाईला आली तेव्हा तेलाची किंमत 140 डॉलर प्रति बॅरेल एवढी होती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाली होती. यामुळे अर्थव्यवस्थेची स्थिती गंभीर झाली', असे सांगत त्याने स्वतःचा बचाव करण्याचा पुरेपुर प्रयत्न केला आहे. 
 
या कालावधीत किंगफिशर कंपनीवर याची मोठ्या प्रमाणात झळ सहन करावी लागली. यावेळी सरकारने एअर इंडियाला आर्थिक नुकसानीतून बाहेर काढले मात्र किंगफिशरला मदत केली नाही, असा आरोप माल्याने केला आहे. 
 
माल्याने असाही दावा केला आहे की,  किंगफिशर एअरलाइन्स भारतातील सर्वात मोठी आणि चांगली एअरलाइन्स कंपनी होती, जी दुर्देवाने आर्थिक आणि सरकारी धोरणांमुळे अयशस्वी ठरली.  त्याने कंपनीतील कर्मचारी आणि भागधारकांची माफीही मागितली. किंगफिशरवर कर्ज स्वरुपात सार्वजनिक निधी लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे, मात्र एअर इंडियालाही निधी पुरवण्यात आला होता, त्याचा काय?, असा उलट प्रश्नच माल्याने सरकारसमोर उपस्थित करत बँकांना हजारो कोटी रुपयांना लुटल्याच्या प्रकरणातून पळ काढण्यात प्रयत्न केला आहे.