शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

कर्ज नाही मदत मागितली होती, विजय माल्याच्या उलट्या बोंबा

By admin | Updated: January 28, 2017 15:12 IST

बँकांचे जवळपास 9000 कोटी रुपयांचे कर्ज बुडवून देशाबाहेर पसार झालेला फरार उद्योगपती विजय माल्याने किंगफिशर एअरलाइन्सच्या अधोगतीचे खापर केंद्र सरकारवर फोडले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 28 - बँकांचे जवळपास 9000 कोटी रुपयांचे कर्ज बुडवून देशाबाहेर पसार झालेला फरार उद्योगपती विजय माल्याने किंगफिशर एअरलाइन्सच्या अधोगतीचे खापर केंद्र सरकारवर फोडले आहे. सरकारची धोरणे आणि आर्थिक परिस्थितींमुळे किंगफिशर एअरलाइन्स रसातळाला गेली, असा आरोप माल्याने केला आहे. 
 
सरकारकडे कर्ज देण्यासाठी नाही तर  मदत करत करण्यासाठी विनंती केली होती, अशा उलट्या बोंबाच विजय माल्याने मारल्या आहेत.  सरकारी कंपनी 'एअर इंडिया'ला आर्थिक संकटातून उभारी मिळावी यासाठी जनतेचा पैसा वापरण्यात आला, मात्र सर्वात मोठ्या स्थानिक एअरलाइन कंपनीच्या बाबतीत हेच धोरण अंमलात आणले गेले नाही, असा कांगवा माल्याने केला आहे. 
 
ट्विट करत विजय माल्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी सरकारी धोरणांवर टीका केली आहे. 'कर्जाऐवजी सरकारने आपल्या धोरणांमध्ये बदल करुन मदत करावी', अशी मागणी केल्याचा दावा त्याने केला आहे.  शिवाय एअर इंडियाला देण्यात आलेल्या निधीवरही त्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, 'किंगफिशर एअरलाईन्स ज्यावेळी डबघाईला आली तेव्हा तेलाची किंमत 140 डॉलर प्रति बॅरेल एवढी होती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाली होती. यामुळे अर्थव्यवस्थेची स्थिती गंभीर झाली', असे सांगत त्याने स्वतःचा बचाव करण्याचा पुरेपुर प्रयत्न केला आहे. 
 
या कालावधीत किंगफिशर कंपनीवर याची मोठ्या प्रमाणात झळ सहन करावी लागली. यावेळी सरकारने एअर इंडियाला आर्थिक नुकसानीतून बाहेर काढले मात्र किंगफिशरला मदत केली नाही, असा आरोप माल्याने केला आहे. 
 
माल्याने असाही दावा केला आहे की,  किंगफिशर एअरलाइन्स भारतातील सर्वात मोठी आणि चांगली एअरलाइन्स कंपनी होती, जी दुर्देवाने आर्थिक आणि सरकारी धोरणांमुळे अयशस्वी ठरली.  त्याने कंपनीतील कर्मचारी आणि भागधारकांची माफीही मागितली. किंगफिशरवर कर्ज स्वरुपात सार्वजनिक निधी लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे, मात्र एअर इंडियालाही निधी पुरवण्यात आला होता, त्याचा काय?, असा उलट प्रश्नच माल्याने सरकारसमोर उपस्थित करत बँकांना हजारो कोटी रुपयांना लुटल्याच्या प्रकरणातून पळ काढण्यात प्रयत्न केला आहे.