शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

नापाक गोळीबाराला BSF चे चोख प्रत्युत्तर, ७ पाकिस्तानी सैनिक ठार

By admin | Updated: October 22, 2016 07:21 IST

शस्त्रसंधीचे उल्लंघन करून, सीमेवर गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शुक्रवारी चांगलीच अद्दल घडवली. त्यांच्या गोळीबाराला भारतीय

जम्मू : शस्त्रसंधीचे उल्लंघन करून, सीमेवर गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शुक्रवारी चांगलीच अद्दल घडवली. त्यांच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने सात पाकिस्तानी रेंजर्स ठार झाले आणि सीमा पार करून भारतात घुसू पाहणाऱ्या एका दहशतवाद्याचा खात्मा केला. या गोळीबारात बीएसएफचा एक जवान गंभीररीत्या जखमी झाला आहे. पाक सीमेवरील रेंजर्सनी सकाळी साडेनऊच्या सुमारास भारतीय हद्दीत गोळीबार सुरू केला. त्यांना तशाच आक्रमक पद्धतीने उत्तर देत बीएसएफच्या जवानांनीही गोळीबार सुरू केला. मात्र शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे प्रत्युत्तर अशा पद्धतीने मिळेल, याचा पाकला अंदाजच नव्हता. त्यामुळे भारतीय जवानांच्या गोळीबारात पाकचे ७ रेंजर्स ठार झाले. कथुआ जिल्ह्यातील दोन देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर हा प्रकार घडला. (वृत्तसंस्था)पाक माध्यमं म्हणतात, दोन्हीकडून झाला गोळीबारपाक माध्यमांनीही दोन्हीकडून जोरदार गोळीबार झाल्याचे वृत्त दिले असून, त्यात ५ पाकिस्तानी रेंजर्स मरण पावल्याचे म्हटले आहे. पाक रेंजर्सनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या बीएसएफच्या जवानाचे नाव गुरनाम सिंग असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिली. याच भागातून एका पाकिस्तानी दहशतवाद्याने भारतीय सीमेवर घुसण्याचा प्रयत्न केला. त्याला रोखण्यासाठीही बीएसएफच्या जवानांना गोळीबार करावा लागला. त्यात दहशतवाद्याचा खात्मा झाला. आता महिलांनी उचलले दगडशुक्रवारच्या नमाजपूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगरमधील सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी आणि उर्वरित भागात जमावबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे १००हून अधिक दिवसांच्या अशांततेनंतर सामान्य होऊ पाहत असलेले जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले. या भागांत यापूर्वी शुक्रवारच्या नमाजनंतर अनेकदा हिंसक निदर्शने झाली. या वेळी काही महिलांनीही पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे काही भागात संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. बारामुल्लामध्ये शोधमोहीम... बारामुल्लात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराची नाकेबंदी करून शोधमोहीम सुरू केली. चार दिवसांपूर्वीही सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या संशयित अड्ड्यांवर धाडी टाकून ४४ जणांना अटक केली होती. तिथे दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांची संयुक्त पथके अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवीत आहेत. सुरक्षा दलांना अद्याप यश मिळाले नाही. तथापि, शोधमोहीम सुरूच आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितलेपाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री राजौरी जिल्ह्यात ताबा रेषेलगतच्या भारतीय चौक्यांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला होता. या भागात भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यात गेल्या ४ दिवसांपासून चकमकी झडत आहेत. पाकने गेल्या ४ दिवसांत ५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.