शहरं
Join us  
Trending Stories
1
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
2
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
3
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
4
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!
5
Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा
6
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
7
ओरेश्निक मिसाइल म्हणजे ब्रह्मोसची कॉपी...? ज्याच्या सह्यायने रशियानं केला युक्रेनवर पलटवार, एकाच वेळी 6 ठिकाणी करू शकते हल्ला
8
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
9
Raja Raghuvanshi : "माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
10
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
11
सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
12
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
13
चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?
14
Nirjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कुंभदान केल्याने धनराशीचा भरलेला राहतो घडा!
15
वासनेनं आंधळा झाला जीजू, मेहुणीवर टाकली वाईट नजर, नकार मिळताच केलं मोठं कांड!
16
संतोष देशमुख प्रकरणी आरोपींवरील मोक्का काढू देणार नाही, जरांगे-पाटलांचा निर्धार; मुख्यमंत्र्यांवर आरोप
17
Corona Virus : धक्कादायक! ३ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, चिमुकल्यांसाठी किती घातक आहे नवा व्हेरिएंट?
18
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
19
सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात! वडिलांचा जागीच मृत्यू, तर अभिनेता गंभीर जखमी
20
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक

्रचला आला ग्रंथ मेळा; वाचक करू गोळा

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

नाशिक : कोणे एके काळी दिल्लीच्या पुस्तक मेळाच्या धर्तीवर नाशिकमध्ये गं्रथयात्रा भरविण्यात आली होती, त्याच नगरीत आता वर्षानुवर्षे व्यावसायिक स्तरावर ग्रंथप्रदर्शन भरविले जाते आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळत असताना शासकीय यंत्रणांना मात्र सूर गवसला नाही. शहराच्या एका कोपर्‍यात भरविलेल्या ग्रंथप्रदर्शनाला ना स्टॉलधारकांचा प्रतिसाद ना वाचकांचा. परिणामी ग्रंथोत्सवावर खर्च तर खूपच झाला, परंतु प्रतिसाद मिळत नसल्याने शिक्षकांपासून कर्मचार्‍यांपर्यंत सार्‍या वाचकांना (?) सक्तीने गोळा करण्यात येत आहे.

नाशिक : कोणे एके काळी दिल्लीच्या पुस्तक मेळाच्या धर्तीवर नाशिकमध्ये गं्रथयात्रा भरविण्यात आली होती, त्याच नगरीत आता वर्षानुवर्षे व्यावसायिक स्तरावर ग्रंथप्रदर्शन भरविले जाते आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळत असताना शासकीय यंत्रणांना मात्र सूर गवसला नाही. शहराच्या एका कोपर्‍यात भरविलेल्या ग्रंथप्रदर्शनाला ना स्टॉलधारकांचा प्रतिसाद ना वाचकांचा. परिणामी ग्रंथोत्सवावर खर्च तर खूपच झाला, परंतु प्रतिसाद मिळत नसल्याने शिक्षकांपासून कर्मचार्‍यांपर्यंत सार्‍या वाचकांना (?) सक्तीने गोळा करण्यात येत आहे.
नाशिक तसे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न शहर मानले जात असल्याने येथे ना रसिकांचा तोटा ना चोखंदळ वाचकांचा. त्यामुळेच पावणे दोनशे वर्षांची परंपरा असलेले सार्वजनिक वाचनालय असतानादेखील शहरात अनेक ग्रंथ मंदिरे उभी आहेत. इतकेच नव्हे तर व्यावसायिक कारणामुळे भरणार्‍या ग्रंथप्रदर्शनांनादेखील प्रतिसाद मिळत असल्याने सार्वजनिक वाचनालयाच्या इमारतीत कायमस्वरूपी भाड्याने ग्रंथप्रदर्शन सुरू असतात. त्यामुळे नाशिकमध्ये तशी वाचकांची कमतरता नसताना शासकीय पातळीवर भरविण्यात आलेल्या ग्रंथोत्सवाला अवकळा आली आणि अक्षरश: अनेक स्टॉल रिक्त झाले. गेल्या सोमवारी पंचवटीत श्रीराम विद्यालयाच्या प्रांगणात भरलेल्या या ग्रंथप्रदर्शनात १५ स्टॉल असतील असे सांगण्यात आले होते, परंतु प्रत्यक्षात सात ते आठ स्टॉल त्यातही मंगळवारी केवळ चार स्टॉल खुले ठेवण्यात आले होते. शासकीय स्टॉलवर दर्जेदार पुस्तके माफक दरात उपलब्ध असताना त्यात कोणतेही चर्चेतील पुस्तके एकतर आणलेलीच नाही अन्यथा आउट ऑफ प्रिंट. अशा स्थितीत वाचक गावाच्या एका कोपर्‍यात जाण्याचे कष्ट कसे घेणार? त्यामुळेच की काय आता सक्तीने वाचक आणि ग्रंथोत्सवातील कार्यक्रमांसाठी प्रेक्षक गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या दिवशी शिक्षक, दुसर्‍या दिवशी (मंगळवारी) मुख्याध्यापक आणि आता बुधवारी सर्व शाळांमधील ग्रंथपालांना हजर राहणे सक्तीचे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या वतीने आयोजित या प्रदर्शनाची अशी अवस्था असेल तर त्यासाठी राज्यशासनाने त्यासाठी माहिती कार्यालय आणि संबंधित विभागाला दिलेले अडीच लाख रुपये पाण्यात गेले असून, ते वाचविण्यासाठी प्रतिसाद मिळवण्याची धडपड नव्हे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.