शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भाजप कार्यकर्त्याच्या घरावर गावठी बॉम्बने हल्ला करत हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 16:50 IST

भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील राजकीय युद्ध लोकसभा निवडणुकीनंतर ही सुरूच आहे.

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत सुरु झालेला राजकीय युद्ध अजूनही थांबायचे नाव घेत नाही. पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. दलू शेख नावाच्या भाजप कार्यकर्त्याच्या घरावर गावठी बॉम्बने हल्ला करण्यात आला असून, त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. तर हा हल्ला तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे.

भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील राजकीय युद्ध लोकसभा निवडणुकीनंतर ही सुरूच आहे. शनिवारी पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात दलू शेख या भाजप कार्यकर्त्याच्या घरावर हल्लेखोरांनी गावठी बॉम्बने हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या दलू शेख याचा मृत्यु झाला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असून तपासानंतरह त्याच्या मृत्युचं नेमकं कारण समोर येईल.

तृणमूल काँग्रेस पक्षाकडून भाजपच्या कार्यकर्त्यांना नेहमीच टार्गेट केलं जात आहे. या आधी सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे दोषींना सोडून देता कामा नये, असे प्रदेश भाजपचे महासचिव सायंतन बसू यांनी म्हंटले आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये पुन्हा राजकीय वातावरण तापताना दिसत आहे.