शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मृत व्यक्ती जिवंत होण्याच्या आशेने तीन महिने घरातच ठेवला मृतदेह

By admin | Updated: July 7, 2017 08:53 IST

एका कुटुंबाने घरातील मृत्यू झालेली व्यक्ती पुन्हा एकदा जिवंत होइल, या आशाने त्याचा मृतदेह तब्बल तीन महिने घरात ठेवल्याची घटना उघड झाली आहे

ऑनलाइन लोकमत

मल्लपूरम, दि. 7- केरळमधील मल्लपूरम भागात एका कुटुंबाने घरातील मृत्यू झालेली व्यक्ती पुन्हा एकदा जिवंत होइल, या आशाने त्याचा मृतदेह तब्बल तीन महिने घरात ठेवल्याची घटना उघड झाली आहे. विशेष म्हणजे पतीच्या मृतदेहासमोर बसून त्यांची पत्नी आणि तीन मुलं तीन महिने मंत्र पठण करत होते. मृतदेहाशेजारी बसून प्रार्थना केल्याने काही तरी चमत्कार होईल असा त्यांचा विश्वास होता. याप्रकरणाची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. वी सैय्यद असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
 
सैयद्द हे काही काळासाठी विदेशात काही काळ काम करत होते त्यानंतर ते भारतात परतले आणि धार्मिक गुरू बनले होते. या महिलेच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन महिन्यापासून त्यांच्या घराचा दरवाजा बंदच होता. या कुटुंबाने गेल्या दोन वर्षांपासून शेजाऱ्यांबरोबरचे सर्व संबंध तोडून टाकले होते. याप्रकरणी शेजाऱ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर बुधवारी पोलिसांच्या पथकाने दरवाजा तोडला. घरातील दृश्य पाहून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. घरातील जमीनीवर असलेल्या मृतदेहाचा पूर्णपणे सांगाडा झाला होता. तसंच सैयद्द यांची पत्नी, दोन  मुलं आणि एक मुलगी मृतदेहाच्या शेजारीबसून मंत्र पठण करत होते. 
आणखी वाचा
 

नऊ दिवस तो राहिला लहान भावाच्या मृतदेहासोबत

म्हैसूरमध्ये महिला लेक्चरर्सला साडी घालून येण्याचं फर्मान

परवेजने अनेक मुलींना फसविल्याचा संशय

पोलिसांसह काही स्थानिक लोकही तेथे उपस्थित होती. त्यांच्या माहितीनुसार कुटुंबातील चारही जण मृतदेहाला घेरून प्रार्थना करत होते. याप्रकरणी पोलिसांनी कुटुंबातील सगळ्या सदस्यांना ताब्यात घेऊन त्या मृतदेहाला मांजरेतील सरकारी वैद्यकीय रूग्णालयात तपासणीसाठी पाठवलं आहे. या कुटुंबातील सदस्य कुणाशीही संबंध ठेवत नाहीत तसंच नेहमी स्वतःच्याच दुनियेत असतात, असंही स्थानिकांनी सांगितलं आहे. 

 
प्राथमिक तपासणीमध्ये सैयद यांच्या मृत्यमागे कुठल्याही प्रकारचा कट असेल याचा संशय येत नाही, या व्यक्तीचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला याचा शोधा घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. जर हा नैसर्गिक मृत्यू असेल तर या प्रकरणात पुढे चौकशी करण्यासारखं काहीही नाही, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. 
दरम्यान, कुटुंबातील सदस्यांना चौकशी करून सोडून देण्यात आलं आहे.