शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

मृत व्यक्ती जिवंत होण्याच्या आशेने तीन महिने घरातच ठेवला मृतदेह

By admin | Updated: July 7, 2017 08:53 IST

एका कुटुंबाने घरातील मृत्यू झालेली व्यक्ती पुन्हा एकदा जिवंत होइल, या आशाने त्याचा मृतदेह तब्बल तीन महिने घरात ठेवल्याची घटना उघड झाली आहे

ऑनलाइन लोकमत

मल्लपूरम, दि. 7- केरळमधील मल्लपूरम भागात एका कुटुंबाने घरातील मृत्यू झालेली व्यक्ती पुन्हा एकदा जिवंत होइल, या आशाने त्याचा मृतदेह तब्बल तीन महिने घरात ठेवल्याची घटना उघड झाली आहे. विशेष म्हणजे पतीच्या मृतदेहासमोर बसून त्यांची पत्नी आणि तीन मुलं तीन महिने मंत्र पठण करत होते. मृतदेहाशेजारी बसून प्रार्थना केल्याने काही तरी चमत्कार होईल असा त्यांचा विश्वास होता. याप्रकरणाची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. वी सैय्यद असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
 
सैयद्द हे काही काळासाठी विदेशात काही काळ काम करत होते त्यानंतर ते भारतात परतले आणि धार्मिक गुरू बनले होते. या महिलेच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन महिन्यापासून त्यांच्या घराचा दरवाजा बंदच होता. या कुटुंबाने गेल्या दोन वर्षांपासून शेजाऱ्यांबरोबरचे सर्व संबंध तोडून टाकले होते. याप्रकरणी शेजाऱ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर बुधवारी पोलिसांच्या पथकाने दरवाजा तोडला. घरातील दृश्य पाहून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. घरातील जमीनीवर असलेल्या मृतदेहाचा पूर्णपणे सांगाडा झाला होता. तसंच सैयद्द यांची पत्नी, दोन  मुलं आणि एक मुलगी मृतदेहाच्या शेजारीबसून मंत्र पठण करत होते. 
आणखी वाचा
 

नऊ दिवस तो राहिला लहान भावाच्या मृतदेहासोबत

म्हैसूरमध्ये महिला लेक्चरर्सला साडी घालून येण्याचं फर्मान

परवेजने अनेक मुलींना फसविल्याचा संशय

पोलिसांसह काही स्थानिक लोकही तेथे उपस्थित होती. त्यांच्या माहितीनुसार कुटुंबातील चारही जण मृतदेहाला घेरून प्रार्थना करत होते. याप्रकरणी पोलिसांनी कुटुंबातील सगळ्या सदस्यांना ताब्यात घेऊन त्या मृतदेहाला मांजरेतील सरकारी वैद्यकीय रूग्णालयात तपासणीसाठी पाठवलं आहे. या कुटुंबातील सदस्य कुणाशीही संबंध ठेवत नाहीत तसंच नेहमी स्वतःच्याच दुनियेत असतात, असंही स्थानिकांनी सांगितलं आहे. 

 
प्राथमिक तपासणीमध्ये सैयद यांच्या मृत्यमागे कुठल्याही प्रकारचा कट असेल याचा संशय येत नाही, या व्यक्तीचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला याचा शोधा घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. जर हा नैसर्गिक मृत्यू असेल तर या प्रकरणात पुढे चौकशी करण्यासारखं काहीही नाही, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. 
दरम्यान, कुटुंबातील सदस्यांना चौकशी करून सोडून देण्यात आलं आहे.