शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

बोधगया होणार आध्यात्मिक राजधानी

By admin | Updated: September 6, 2015 04:10 IST

बोधगया ही ज्ञानार्जनाची भूमी आहे, असे सांगून केंद्र सरकारतर्फे हे स्थळ आध्यात्मिक राजधानीच्या रूपात विकसित करण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली.

बोधगया : बोधगया ही ज्ञानार्जनाची भूमी आहे, असे सांगून केंद्र सरकारतर्फे हे स्थळ आध्यात्मिक राजधानीच्या रूपात विकसित करण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली. यामुळे भारत आणि बौद्ध जगतातील सांस्कृतिक नाते अधिक दृढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.मोदी यांनी येथे महाबोधी विहाराला भेट दिल्यानंतर उपरोक्त विचार मांडले. ते म्हणाले की, जगभरातील बौद्धबांधवांसाठी बोधगया हे एक श्रद्धास्थळ आहे. त्याअनुषंगाने या स्थळाचा विकास करण्याचा सरकारचा मानस आहे. याशिवाय या पवित्रस्थळावरून गरजू बौद्ध राष्ट्रांना सर्वतोपरी सहकार्य करून त्यांच्या आध्यात्मिक गरजांची पूर्तता करण्यात येईल. भगवान बुद्ध हे भारताच्या मुकुटातील हिरा असल्याचे सांगून बुद्ध हे केवळ हिंदुवादासाठीच नव्हे, तर साऱ्या जगाच्या दृष्टीने एक महान सुधारक आहेत आणि त्यांनी जगाला दिलेला नवा दृष्टिकोन सर्वांच्याच अस्तित्वासाठी महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. भारतात पूजेची सर्व माध्यमे स्वीकारार्ह आहेत. हिंदुवादाचा हा गुण म्हणजे अनेक महान आध्यात्मिक गुरूंचीच देण असून, गौतम बुद्ध यात प्रमुख आहेत. या देशाला धर्मनिरपेक्षतेचा वसाही या गुरूंच्या शिकवणीमुळे प्राप्त झाला आहे, असे ते म्हणाले. पंडित जवाहरलाल नेहरू आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर पंतप्रधानाच्या रूपात या पवित्र स्थळाला भेट देताना आपल्याला अत्यानंद होत असल्याची भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. त्यातही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी झालेली बोधगया भेट आपल्यासाठी अधिक वैशिष्ट्यपूर्ण ठरली असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी, मोदी येथील जगविख्यात बोधिवृक्षाखाली ध्यानधारणेत सहभागी झाले.सामवेद-ग्लोबल हिंदू बुद्धिस्ट इनिशिएटिव्हद्वारे आयोजित संमेलनात बोलताना देशाने बुद्ध विचारसरणी आत्मसात केली असून, भारत हा ‘बुद्धिस्ट इंडिया’ असल्याचे त्यांनी सांगितले. समतेचा उपदेश करणारे भगवान बुद्ध महान होते, अशी भावना मोदी यांनी व्यक्त केली. या परिषदेला जपान आणि भूतानचे विदेशमंत्री, बिहारचे राज्यपाल रामनाथ कोवील, केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू तसेच श्रीलंका आणि नेपाळसह अनेक देशांचे मुत्सद्दी व खासदार उपस्थित होते. (वृत्तसंस्था)