शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
5
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
6
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
7
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
8
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
9
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
10
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
11
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
13
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
14
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
15
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
16
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
17
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
18
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
19
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
20
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा

शेती फुलवणाऱ्यांच्या चेह-यावर आनंद फुलला !

By admin | Updated: December 8, 2014 02:18 IST

सरकारी नोकरीसाठी निवड होऊनही प्रशिक्षणाठी निवड करणाऱ्या समितीची बैठकच रखडल्यामुळे काही युवक वर्षाहून अधिक काळ नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते.

नवी दिल्ली : सरकारी नोकरीसाठी निवड होऊनही प्रशिक्षणाठी निवड करणाऱ्या समितीची बैठकच रखडल्यामुळे काही युवक वर्षाहून अधिक काळ नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका फोनने मेटाकुटीस आलेल्या या युवकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला.कृषी संशोधक भरती मंडळाच्या शिफारशीनंतर केंद्राच्या कृषी अनुसंधान परिषदेने ‘कृषी वैज्ञानिक’ या पदासाठी देशभरातील अनेक विद्यार्थ्यांची निवड केली. यानंतर या उमेदवारांना हैदराबादच्या राष्ट्रीय कृषी मनुष्यबळ व्यवस्थापन अकादमीत प्रशिक्षण व नंतर पोस्टिंग दिली जाते. जानेवारी व जून या दोन टप्प्यांत प्रशिक्षण होते. या वेळी जरा वेगळेच चित्र पाहायला मिळाले. निवड झालेल्या उमेदवारांना दिल्लीत बोलविण्यात आले, पण प्रशिक्षण समितीची बैठकच होत नव्हती.आठ - १० दिवसांपासून हे उमेदवार बड्या अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत होते, पण ठोस निर्णय होत नव्हता. प्रशिक्षण समितीची बैठक रखडल्याने २०० उमेदवारांचे प्रशिक्षण मात्र विलंबाने होणार होते. यापैकी महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेशातील काही युवक नितीन गडकरी यांना भेटायला त्यांच्या बंगल्यावर आले. त्यांनी या युवकांचे म्हणणे ऐकले आणि एक फोन लावला अन् १२ तासांत या युवकांसह देशातील २०० जणांची तुकडी हैदराबादला प्रशिक्षणासाठी रवाना होईल, असा आदेश कृषी मंत्रालयातून जारी झाला़प्रशिक्षणाचा आदेश जारी होताच ते सारे युवक गडकरींना भेटले, तेव्हा त्यांच्याजवळ शब्दच नव्हते. त्यांनी पुष्पगुच्छ दिला तेव्हा गडकरी म्हणाले, ‘तुम्ही कृषी संशोेधक आहात. देशाच्या मातीला बहरून टाका!’ गडकरींनी फोन कोणाला केला होता, ते गुलदस्त्यातच आहे. (विशेष प्रतिनिधी)