शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

अंध श्रीकांतच्या कंपनीची 10 कोटींची उलाढाल

By admin | Updated: April 7, 2016 17:42 IST

श्रीकांत अपंगत्वावर मात करत यशस्वीरीत्या हैदराबादशी संलग्न असलेल्या बोलंट कंपनीचा सीईओ झाला आहे.

ऑनलाइन लोकमतआंध्र प्रदेश, दि. ७- आंध्र प्रदेशमध्ये जन्मतःच अंध असलेल्या 24 वर्षीय श्रीकांत बोल्ला यानं एक कंपनी स्थापन करून त्या कंपनीचा तो सीईओ झाला आहे. श्रीकांतनं अपंगत्वावर मात करत यशस्वीरीत्या हैदराबादमध्ये एक कंपनी स्थापन केली आणि त्या बोलंट कंपनीचा श्रीकांत आता सीईओ झाला आहे.  श्रीकांत बोल्लानं लहानपणी वडिलांच्या शेतात काम करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला आंधळेपणामुळे वडिलांना शेतात मदत करण्यात अडचणी येत होत्या. अखेर वडिलांनी श्रीकांतला शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला. घरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत श्रीकांत रोज पायी जात असे. तो शाळेतही नेहमी शेवटच्या बाकावर बसत होता. शाळेतली मुलं श्रीकांतसोबत मैत्री करण्यास टाळाटाळ करत होती. त्यावेळी जगातील आपण सर्वात गरीब विद्यार्थी असल्याची जाणीव झाली, असं श्रीकांत बोल्लानं सांगितलं. शाळेत असतानाच बुद्धिबळ आणि क्रिकेट खेळण्याची श्रीकांतला आवड निर्माण झाली. 10वीत असताना श्रीकांतनं 90 टक्के गुण मिळवून यश संपादन केलं. मात्र तो आंधळा असल्यानं त्याला सायन्सला प्रवेश देण्यात आला नाही. मी लोकांच्या नजरेत आंधळा होतो, म्हणून मला प्रवेश दिला नसल्याचं श्रीकांतनं तेव्हा सांगितलं. प्रत्येकाला त्यानं कॉमर्सला जावंसं वाटत होतं. मात्र त्याचा सायन्समध्येच करिअर निश्चय ठाम होता. माझ्या रक्तात काहीही दोष नसल्याचं सांगत मी सायन्समध्ये प्रवेश मिळवणार असं त्यावेळी बोल्लानं सांगितलं. सहा महिने न्यायासाठी कोर्टात त्यानं संघर्ष केला. न्यायालयीन लढ्यानंतर अखेर त्याला सायन्समध्ये प्रवेश देण्यात आला. मात्र चालू वर्षाच्या अर्ध्यापर्यंत बोल्लाला पुस्तक किंवा दुसरा अभ्यासक्रम देण्यात आला नव्हता. मग कॉलेजच्या मार्गदर्शकानं सर्व अभ्यासक्रम एका ऑडियो बुकमध्ये टाकून दिला. त्यावेळी बोल्लानं त्या ऑडियो अभ्यासक्रमाच्या जोरावर 98 टक्के गुण मिळवून नेत्रदीपक यश संपादन केलं. मात्र पुन्हा तो अंध असल्यानं त्याला स्पर्धात्मक परीक्षेला बसण्यास नकार दिला गेला. त्यावेळी त्यानं अमेरिकेतल्या एमआयटी या विद्यापीठात प्रवेशासाठी अर्ज केला. आणि त्याला प्रवेशही मिळाला. तेव्हा तो एमआयटीमधून आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिला अंध विद्यार्थी म्हणून उत्तीर्ण झाला. 2012ला त्यानं एमआयटीतून पदवी संपादन केली. त्यानंतर त्यानं बोलंट इंडस्ट्रीची स्थापना केली. त्याच्या कंपनीत आज जवळपास 450 लोक काम करत आहेत. आणि स्वतःच्या कंपनीत त्यानं  60 टक्क्यांहून अधिक अपंगांना सामावून घेतलं आहे. बोल्लाच्या कंपनीनं आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकमध्ये 5 कारखाने स्थापन केले आहेत. आंध्र प्रदेशमधल्या कारखान्यात जवळपास 10 ते 15 कोटींची गुंतवणूकही केली. आणि 10 ते 15 टक्के उत्पादन ते ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीला निर्यात करायला लागले. रस्त्यावर भिकारी दिसल्यास श्रीकांत त्याला पैसे न देता जगण्याची नवी आशा देत असे. त्यानं माजी पंतप्रधान एपीजे अब्दुल कलाम यांच्यासोबतही काम केलं होतं. आणि आता तो हैदराबादमध्ये स्थापन केलेल्या त्यांच्या कंपनीत सीईओ आहे. या कंपनीची उलाढाल आता जवळपास 10 कोटींच्या घरात आहे. या कंपनीत अशिक्षित आणि शारीरिक अपंगत्व आलेल्या लोकांनाच अधिक प्रमाणात सामावून घेण्यात आलं आहे. श्रीकांतची ही गगनभरारी अनेकांना थक्क करणारी आहे. .