शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

मोदींच्या रॅलीत स्फोट घडवून दहशतवाद्यांची रंगीत तालीम

By admin | Updated: March 23, 2017 12:25 IST

लखनऊत घडवण्यात आलेला हलका स्फोट सरावासाठी घडवण्यात आला होता, जेणेकरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढील रॅलीत मोठे स्फोट घडवले जावेत

ऑनलाइन लोकमत
नोएडा, दि. 23 - भोपाळ - उज्जैन ट्रेन स्फोटात पकडल्या गेलेल्या संशयित दहशतवाद्यांनी गतवर्षी 11 ऑक्टोबर रोजी दस-याला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लखनऊ रॅलीत कमी तीव्रतेचा स्फोट घडवून आणला होता. सभेच्या जागेपासून 250 मीटर अंतरावर हा स्फोट घडवून आणण्यात आला होता. मात्र रावण दहनाच्या कार्यक्रमामुळे स्फोटाचा आवाज लोकांना ऐकू गेला नाही. या स्फोटामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नव्हती. आतिफ मुजफ्फर उर्फ अल कासिम याच्यासोबत अन्य तीन संशयित दहशतवाद्यांची पोलिसांनी चौकशी केली असता ही माहिती समोर आली आहे. या संशयितांची उत्तर प्रदेश एटीएस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणाही चौकशी करत आहे.
(कानपूर रेल्वे अपघात प्रकरणी ISI एजंटला अटक)
 
रंगीत तालमीसाठी घडवला ट्रेन स्फोट - 
लखनऊत घडवण्यात आलेला हलका स्फोट सरावासाठी घडवण्यात आला होता, जेणेकरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढील रॅलीत मोठे स्फोट घडवले जावेत. भोपाळ - उज्जैन ट्रेन स्फोटही सरावासाठीच करण्यात आला होता. स्फोट घडवणारे इसीससाठी काम करणा-या सिरियामधील पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवत असतानाचे आणि स्फोट झाल्यानंतरचे फोटो पाठवण्यात आले होते. स्फोट झाल्यानंतरच्या बातम्यांच्या लिंकही पाठवण्यात आल्या होत्या. आपलं काम पाहून हँण्डलरनी आपल्याला सिरियाला बोलवावं आणि प्रशिक्षण द्यावं अशी त्यांची इच्छा होती.
 
7 मार्च रोजी झालेल्या भोपाळ - उज्जैन पॅसेंजर ट्रेन स्फोट प्रकरणी  मुजफ्फर उर्फ अल कासिम याच्यासोबत अन्य तीन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. यांच्या चौकशीच्या आधारे उत्तर प्रदेशातून अन्य सहा संशयितांना अटक करण्यात आलं होतं. तर दुसरीकडे लखनऊ चकमकीत सैफुल्लाहला उत्तर प्रदेश एटीएसने ठार केलं होतं.  
 
(भोपाळ-उज्जैन पॅसेंजर ट्रेनमध्ये स्फोट, 4 जखमी)
 
दिल्लीदेखील होती रडारवर - 
या संशयित दहशतवाद्यांनी दिल्ली हादरवण्याचा देखील कट रचला होता. गेल्या वर्षी त्यांनी दिल्लीमधील इंडिया गेटसहित सहा जागांची रेकी केली होती. फेब्रुवारीत हे सर्वजण दिल्लीहून जम्मू काश्मीरला गेले होते. तिथे दहशतवाद्यांमध्ये सामील होऊन सुरक्षा जवानांशी लढण्याचा त्यांचा प्लान होता. त्यांनी पंजाबमधील अमृतसर, राजस्थानमधील जैसलमेर आणि मुंबईतही अनेक ठिकाणांची रेकी केली होती.