शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

उपसभापतीपदाच्या निवडणुकीस नवे वळण?, भाजपाचा पाठिंबा बीजेडीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 05:28 IST

राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीने नवे राजकीय वळण घेतले आहे. काँग्रेसने तृणमूलचे नेते सुखेंदु शेखर रॉय यांना आॅफर दिली आहे, तर भाजपाने बिजू जनता दलाच्या पारड्यात आपले वजन टाकले आहे.

हरीश गुप्तानवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीने नवे राजकीय वळण घेतले आहे. काँग्रेसने तृणमूलचे नेते सुखेंदु शेखर रॉय यांना आॅफर दिली आहे, तर भाजपाने बिजू जनता दलाच्या पारड्यात आपले वजन टाकले आहे.ही निवडणूक टाळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपाने २४१ सदस्य असलेल्या सभागृहात बिजू जनता दलाला आॅफर दिली आहे. शरद यादव अपात्र ठरल्यामुळे एक जागा रिक्त आहे. राष्ट्रपतींनी तीन रिक्त जागी सदस्य नेमतेले नाहीत. नियुक्त सदस्यांसह भाजपा ११२ पर्यंत पोहचू शकतो. पण शिवसेनेच्या ३ व विभाजित अद्रमुकच्या १३ सदस्यांबाबत भाजपाला खात्री नाही. मुख्यमंत्री नवीन पटनायक हे तेलुगु देसमचे ६ व तटस्थ पक्षांचे सदस्य एकत्र करण्यात यशस्वी होतील, असे भाजपाला वाटत आहे..काँग्रेसला वाटते की, तृणमूल आपला उमेदवार रिंगणात उतरवेल. सभागृहात यूपीएचे ९२ सदस्य असून, तृणमूल सहभागी झाल्यास संख्या १०५ वर जाईल. आपचे ३, आयएनएलडीचा १ व १ अपक्ष सदस्य सोबत आले तर ही संख्या ११० होते. टीडीपी, टीआरएस व वायएसआर काँग्रेस हे विरोधकांसोबत जातील असा अंदाज आहे. अहमद पटेल यांनी ममता बॅनर्जी यांच्याशी याबाबत चर्चा केल्याचे कळते. सुखेंदु शेखर रॉय यांच्या उमेदवारीला बॅनर्जी तयार झाल्यास राजकीय लढाईला वेगळे वळण मिळेल. मात्र सुखेंदु रॉय यांचे नाव निश्चित झाल्याच्या वृत्ताला तृणमूलने नकार दिला आहे. डावे पक्षही तृणमूलच्या उमेदवारास विरोध करत आहेत.सन १९९२ च्या घडामोडींकडे पाहिल्यास, तेव्हा नजमा हेपतुल्ला काँग्रेसतर्फे उपसभापतीपदाची निवडणूक लढवत होत्या. विरोधकांच्या उमेदवार रेणुका चौधरी तेव्हा पराभूत झाल्या होत्या. आता नजमा हेपतुल्ला भाजपमध्ये आहेत, तर रेणुका चौधरी यांनीही पक्षांतर केले.निरोप समारंभ महत्त्वाचाउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे उपसभापती पी. के. कुरियन यांच्यासाठी निरोप समारंभ आयोजित करणार असून, तेव्हा कदाचित राजकीय चित्र अधिक स्पष्ट होईल.