शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

मोदींच्या आमंत्रणाला भाजपा खासदारांचा ‘खो’!

By admin | Updated: September 10, 2014 03:07 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याची फलनिष्पत्ती अधिकृतपणे सांगण्यासाठी बोलविण्यात आलेल्या भाजपा खासदारांच्या बैठकीला महाराष्ट्रातील २३ पैकी २० खासदारांनी ‘खो’ दिला.

रघुनाथ पांडे, नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याची फलनिष्पत्ती अधिकृतपणे सांगण्यासाठी बोलविण्यात आलेल्या भाजपा खासदारांच्या बैठकीला महाराष्ट्रातील २३ पैकी २० खासदारांनी ‘खो’ दिला. स्वत: संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनाही या गैरहजरीमुळे धक्का बसला. सूत्राने सांगितले, की नायडू यांनी बैठकीनंतर ही बाब पंतप्रधान मोदी यांच्या कानावर घातली.प्रथम ब्राझिल व नंतर जपानला गेलेल्या पंतप्रधानांनी त्या भेटींमध्ये देशासाठी काय केले, याबाबतचा सविस्तर तपशील देण्यासाठी पंतप्रधानांनी मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता संसदेच्या एका सभागृहात देशातील खासदारांची तातडीची बैठक बोलविली होती. त्याबाबतचे निमंत्रण सर्वच खासदारांना सोमवारी देण्यात आले. अनेकांनी होकार कळविले, प्रत्यक्षात मात्र महाराष्ट्रातील २३ पैकी मुंबईतून गोपाळ शेट्टी, लातूरहून सुनील गायकवाड व अहमदनगरहून दिलीप गांधी हेच पोहोचले. खा. तरूण विजय हे या बैठकीचे संयोजक होते. तर व्यंकय्या नायडू हे खासदारांनी माहिती देतील असे स्वत: पंतप्रधान मोदी यांनी ठरविले होते.खासदारांशी याविषयी संवाद साधून त्यांची मते घेण्याचीही सूचना मोदींनी दिली होती. त्यानुसार बैठकीनंतर अर्धा तास संवाद झाला.जगप्रसिध्द अजिंठा व वेरूळ येथील लेण्यांचा विकास जपान सरकार करणार असल्याचे यावेळी खासदारांना सांगण्यात आले. येण्याचे कबूल केलेल्या अनेक खासदारांनी अडचणींचा पाढा वाचला. काहींनी गणेशात्सवाची सांगता मिरवणूक, अनेकांनी निवडणुकीच्या नियोजनाबाबत कळविले तर काहींनी निरोप वेळेवर मिळाल्याने वेगळी कारणेही दिली. मंत्र्याना या बैठकीतून सूट देण्यात आली होती, पण बैठक सुरू झाल्यावर स्मृती इराणी, उमा भारती व अनंतकुमार हे मंत्री पोहोचले. उत्तरप्रदेश, गुजरात व कर्नाटकातील खासदारांची शंभरटक्के उपस्थिती होती. खा. गोपाळ शेट्टी यांनी लोकमतला सांगितले, निरोप सोमवारी दुपारी मिळाल्याने अनेकांनी येणे शक्य झाले नसावे.