शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
4
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
5
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
6
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
7
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
8
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
9
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
10
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
11
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
12
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
13
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
14
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
15
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
16
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
17
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
18
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
19
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
20
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 

भाजपाला संघाचा अहेर!

By admin | Updated: February 4, 2015 03:21 IST

भाजपाने किरण बेदींना पक्षप्रवेश देत थेट मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार बनविले, अशी सडेतोड व खरमरीत टीका करणारी मीमांसा रा.स्व. संघाने ‘आॅर्गनायझर’ या इंग्रजी मुखपत्रातून केली आहे.

मुखपत्रातून सडेतोड टीका : बेदींना पक्षात आणणे का भाग पडले?नवी दिल्ली : दिल्लीतील राजकीय हवा अनुकूल नसल्यामुळे आणि जनतेकडून मिळणारा प्रतिकूल प्रतिसाद लक्षात घेऊनच भाजपाने किरण बेदींना पक्षप्रवेश देत थेट मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार बनविले, अशी सडेतोड व खरमरीत टीका करणारी मीमांसा रा.स्व. संघाने ‘आॅर्गनायझर’ या इंग्रजी मुखपत्रातून केली आहे. प्रतिकूल परिस्थितीतही आम आदमी पार्टीने जनतेचा विश्वास परत मिळवण्यात यश मिळविल्याचा दावाही त्यात केला आहे. दिल्लीत विधानसभा निवडणुकीची हवा तापलेली असून, सर्वच पक्ष मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यास रस्त्यांवर उतरले आहेत. अशा स्थितीत भाजपाला हा घरचा अहेर मिळाला आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान बेदींचा चेहरा पुढे घेऊन चाललेल्या भाजपासमोर ऐन मतदानाच्या तोंडावर अडचणी वाढण्याची शक्यता आहे.अनुकूल बदल, पण नकारात्मक प्रतिक्रियांची काळजी घेण्याचा सल्लाअवघ्या ४९ दिवसांत अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे ‘आप’च्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. या पक्षाला सत्तेवर आणून फसवणूक झाल्याची भावना मध्यमवर्गीयांमध्ये निर्माण झाली. अशा परिस्थितीत नव्याने लोकांना सामोरे जाण्याचे आव्हान आपच्या समोर निर्माण झाले असतानाच भाजपालाही स्थिती अनुकूल नव्हती. भाजपाच्या नेतृत्वाने राजधानीतून मिळत असलेला विपरीत प्रतिसाद बघून किरण बेदींना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून समोर आणले, असे ‘आॅर्गनायझर’मधील लेखात नमूद आहे.च्आॅर्गनायझरच्या दिल्ली ब्युरोने हा लेख लिहिला असून, बेदींचा पक्षप्रवेश आणि मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून निवडीने प्रारंभी भाजपामध्ये असंतोष उफाळल्याचे मात्र नंतर परिस्थितीत सुधारणा घडवून आणल्याचा दावाही त्यात केला आहे. बेदींचा पक्षप्रवेश हे भाजपाचे निश्चितच सकारात्मक पाऊल असल्याचे राजकीय विश्लेषकांचे भाष्यही त्यात दिले आहे. च्प्रचारात स्टार प्रचारक आणि मनुष्यबळाचा वापर करताना पक्षनेत्यांकडून होत असलेल्या नकारात्मक प्रतिक्रियांबाबत सावधगिरीचा सल्लाही त्यात दिला आहे. मोदींनी सोशल मीडियाच्या वापरावर अधिक भर दिला असला तरी नकारात्मक प्रतिक्रियांबाबत काळजी घेतली जावी, असे लेखात म्हटले आहे. आपचे सामर्थ्य कशात?आपने सातत्याने जनतेशी संपर्क राखला. प्रस्थापितांविरोधी भावनेमुळे या पक्षाला बऱ्याच प्रमाणात गमावलेला जनाधार परत मिळविण्यात यश आले. सार्वत्रिक निवडणुकीत मोठा फटका बसूनही दिल्ली कॅन्टोनमेंट बोर्डाच्या निवडणुकीत या पक्षाला कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात जमवाजमव करता आली. त्यामुळेच या पक्षाने बूथ स्तरावर पकड मजबूत केली असल्याची बाबही या लेखात स्पष्ट केलेली आहे.ओबामांची भेट फलदायी...मोदींची जादू प्रत्यक्षात येण्याबद्दलची दिल्लीवासीयांना उत्सुकता आहे यात शंका नाही. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या तीन दिवसीय भारतभेटीनंतर व्यापार आघाडीवर घडवून आलेला बदल भाजपाला अनुकूल ठरला असल्याचा दावाही लेखात केला आहे.