शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

पालिकेत सेनेपुढे भाजपाचेच आव्हान

By admin | Updated: September 26, 2014 02:23 IST

शिवसेना-भाजपातील २५ वर्षांची युती संपुष्टात आल्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये सत्तांतराच्या चर्चेला आज दिवसभर उधाण आले़ तरीही सत्तेसाठी पालिकेत हे नाते आणखी अडीच वर्षे कायम राहण्याची चिन्हे

मुंबई : शिवसेना-भाजपातील २५ वर्षांची युती संपुष्टात आल्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये सत्तांतराच्या चर्चेला आज दिवसभर उधाण आले़ तरीही सत्तेसाठी पालिकेत हे नाते आणखी अडीच वर्षे कायम राहण्याची चिन्हे आहेत़ मात्र महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी मिळवणे आणि वैधानिक समित्यांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेपुढे विरोधकांपेक्षा भाजपाचेच आता कडवे आव्हान असणार आहे़महापालिकेमध्ये सत्तेत असूनही शिवसेनेने मलाईदार पदांपासून भाजपाला दूर ठेवले होते़ महापौर, स्थायी समिती अध्यक्ष अशा महत्त्वपूर्ण पदांवर दरवर्षी भाजपा मित्रासाठी पाणी सोडत होती़ महत्त्वाच्या समित्या आपल्याकडे राखून भाजपाच्या तोंडाला शिवसेनेने प्रत्येक वेळा पाने पुसली़ त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये भाजपा आणि शिवसेनेच्या पालिकेतील गटनेत्यांमध्ये खटके उडू लागले होते़ तरीही भाजपाने आपली वेगळी भूमिका मांडण्यास सुरुवात केल्यामुळे वादाची ठिणगी पडली होती़गेल्या दोन वर्षांमध्ये शिवसेना-भाजपातील मतभेद उघड होऊ लागले होते़ अनेक प्रस्तावांमध्ये भाजपाने विरोधकांची साथ देत शिवसेनेची कोंडी केल्याचेही चित्र दिसून आले आहे़ तरीही फाटलेल्या या नात्याला ठिगळे लावून युतीचा कारभार सुरू होता़ युती तुटल्यानंतरही सत्तेसाठी उभय पक्ष २०१७ पर्यंत एकत्रित राहतील़ परंतु त्याचा परिणाम निश्चितच पालिकेच्या कामकाजावर दिसून येईल, असे संकेत भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी दिले़ (प्रतिनिधी)