शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
2
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
3
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
4
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
5
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
6
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
7
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
8
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
9
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
10
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
11
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
12
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
13
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
14
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
15
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
16
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
17
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
18
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
19
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
20
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!

भाजपाच्या अश्वमेधाला यूपीत अनेक अडथळे

By admin | Updated: February 19, 2017 02:06 IST

बिहारच्या पराभवानंतर भाजपाने उत्तर प्रदेशची सत्ता मिळवण्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न चालवले आहेत. आधी ब्राह्मण समाजाला मायावतींपासून तोडले. बसपाच्या

- सुरेश भटेवरा, बाराबंकी

बिहारच्या पराभवानंतर भाजपाने उत्तर प्रदेशची सत्ता मिळवण्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न चालवले आहेत. आधी ब्राह्मण समाजाला मायावतींपासून तोडले. बसपाच्या अनेक नेत्यांना भाजपात आणले. सपात परिवारात फूट पाडण्याचे प्रयत्न केले. प्रदेशाध्यक्षपदी केशवप्रसाद मौर्यांची नियुक्ती करून ओबीसींना जवळ केले. मुझफ्फरपूर दंगलीच्या जखमा उघड्या करून, जाटव समाजाला बांधून ठेवण्याचा डाव केला.दलित जातींना आमिषे दाखवली. केंद्रात उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांची संख्या वाढवताना अपना दलाच्या अनुप्रिया पटेलांना मंत्रिपद दिले. सर्जिकल स्ट्राइकचाही प्रचार केला. त्यामुळे येथील सत्ता भाजपाला मिळेल, असे वातावरण अगदी सहा महिन्यापूर्वीपर्यंत होते. परंतु, आता चित्र पालटताना दिसत आहे. निवडणूक जाहीर होण्याआधी अगोदर पंतप्रधान मोदींनी, पक्षाचे नेते खासदार, आमदारांच्या नातेवाईकांना तिकिटे देणार नाही, अशी घोषणा केली. प्रत्यक्षात अमित शाह यांनी केलेल्या तिकीटवाटपात बड्या नेत्यांचे ८0 कुटुंबीय व नातेवाईकच आहेत. जुन्या निष्ठावानांऐवजी कालपरवा आयात केलेल्या अनेकांना तिकिटे वाटली. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी आहे. काहींनी बंड पुकारले. नोटाबंदीनंतर तर इथे भाजपाच्या भवितव्याला ग्रहणच लागले. लघु उद्योग आणि छोट्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय उद्ध्वस्त झाले. अनेक मजुरांवर बेरोजगारीची पाळी आली. हक्काचा मतदारही नाराज झाला. याचा परिणाम आता निवडणुकीच्या समरांगणात जाणवतो आहे.