शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

भाजपाच्या अश्वमेधाला यूपीत अनेक अडथळे

By admin | Updated: February 19, 2017 02:06 IST

बिहारच्या पराभवानंतर भाजपाने उत्तर प्रदेशची सत्ता मिळवण्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न चालवले आहेत. आधी ब्राह्मण समाजाला मायावतींपासून तोडले. बसपाच्या

- सुरेश भटेवरा, बाराबंकी

बिहारच्या पराभवानंतर भाजपाने उत्तर प्रदेशची सत्ता मिळवण्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न चालवले आहेत. आधी ब्राह्मण समाजाला मायावतींपासून तोडले. बसपाच्या अनेक नेत्यांना भाजपात आणले. सपात परिवारात फूट पाडण्याचे प्रयत्न केले. प्रदेशाध्यक्षपदी केशवप्रसाद मौर्यांची नियुक्ती करून ओबीसींना जवळ केले. मुझफ्फरपूर दंगलीच्या जखमा उघड्या करून, जाटव समाजाला बांधून ठेवण्याचा डाव केला.दलित जातींना आमिषे दाखवली. केंद्रात उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांची संख्या वाढवताना अपना दलाच्या अनुप्रिया पटेलांना मंत्रिपद दिले. सर्जिकल स्ट्राइकचाही प्रचार केला. त्यामुळे येथील सत्ता भाजपाला मिळेल, असे वातावरण अगदी सहा महिन्यापूर्वीपर्यंत होते. परंतु, आता चित्र पालटताना दिसत आहे. निवडणूक जाहीर होण्याआधी अगोदर पंतप्रधान मोदींनी, पक्षाचे नेते खासदार, आमदारांच्या नातेवाईकांना तिकिटे देणार नाही, अशी घोषणा केली. प्रत्यक्षात अमित शाह यांनी केलेल्या तिकीटवाटपात बड्या नेत्यांचे ८0 कुटुंबीय व नातेवाईकच आहेत. जुन्या निष्ठावानांऐवजी कालपरवा आयात केलेल्या अनेकांना तिकिटे वाटली. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी आहे. काहींनी बंड पुकारले. नोटाबंदीनंतर तर इथे भाजपाच्या भवितव्याला ग्रहणच लागले. लघु उद्योग आणि छोट्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय उद्ध्वस्त झाले. अनेक मजुरांवर बेरोजगारीची पाळी आली. हक्काचा मतदारही नाराज झाला. याचा परिणाम आता निवडणुकीच्या समरांगणात जाणवतो आहे.