शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

मुस्लिमांवरील हल्ल्यामुळे भाजपा चिंतेत

By admin | Updated: June 28, 2017 00:28 IST

देशात मुस्लिमांवर होणाऱ्या हल्ल्यांबद्दल भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाने चिंता व्यक्त केली असतानाच, भाजपशी संबंधित असलेल्या विश्व हिंदू

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात मुस्लिमांवर होणाऱ्या हल्ल्यांबद्दल भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाने चिंता व्यक्त केली असतानाच, भाजपशी संबंधित असलेल्या विश्व हिंदू परिषदेने राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग व अल्पसंख्यांकासाठीचे मंत्रालय बंद करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. अल्पसंख्याक समुदायावर होत असलेल्या हल्ल्यांमुळे सारा समाज चिंतीत आहे, असे भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष अब्दुल रशीद अन्सारी यांनी बोलून दाखवले, तर अल्पसंख्याक आयोग आणि मंत्रालयामुळे फुटीरतावादी मानसिकतेला प्रोत्साहन मिळत आहे, असा आरोप विश्व हिंदू परिषदेने केला. भाजपचे नेते शहानवाझ हुसैन यांच्या निवासस्थानी ईदनिमित्त झालेल्या कार्यक्रमात मुस्लिमांवर हल्ले होत असल्याने संपूर्ण समाज अस्वस्थ व नाराज आहे, याचा उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्पसंख्यांक समाजाची काळजी घेण्याचे आवाहन केल्यानंतरही हे प्रकार सुरू आहेत, याचा अन्सारी यांंनी उल्लेख केला. हे सरकार आपले आहे, अशी भावना अल्पसंख्यांक समाजात निर्माण व्हावी, यासाठी भाजपने प्रयत्न करायला हवेत, या घटनांना भाजप जबाबदार नसला तरी हल्ले रोखण्यासाठी पक्षाने पावले उचलायला हवीत, असे अन्सारी म्हणाले.विश्व हिंदू परिषदेने मात्र मुस्लीम व ख्रिश्चन यांना पीडित समाज भासवण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. पण अल्पसंख्याक आयोग त्यांच्याविषयी तसे चित्र निर्माण करीत आहे, अशी तक्रार करून हा आयोग व मंत्रालय बंद करण्याची मागणी गुजरातमध्ये झालेल्या केंद्रीय परिषदेच्या बैठकीत केली.