शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

भाजप त्रिपुरात सत्तेत येईल- शहा

By admin | Updated: May 7, 2017 01:05 IST

आपला पक्ष त्रिपुरातील प्रदीर्घ मार्क्सवादी कुशासनाचा एकमेव पर्याय असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी

लोकमत न्यूज नेटवर्कआगरतळा : आपला पक्ष त्रिपुरातील प्रदीर्घ मार्क्सवादी कुशासनाचा एकमेव पर्याय असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी येथे म्हटले. आपला पक्ष त्रिपुरात स्वबळावर सत्तेवर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, गेल्या २५ वर्षांपासून त्रिपुरात भ्रष्टाचार बोकाळला आहे. कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून, महिलांना अजिबात सुरक्षित वाटत नाही. त्यांनी इतर बिगर डाव्या पक्षांशी युतीची शक्यता फेटाळली नाही; मात्र पक्षाचा भर स्वत:चा जनाधार बळकट करण्यावर असल्याचे स्पष्ट केले. शहा परिवर्तन यात्रेसाठी दोन दिवसांच्या त्रिपुरा दौऱ्यावर आले आहेत. राज्याची लोकसंख्या ३७ लाख आहे. येथील ६५ टक्के लोक दारिद्र्यरेषेच्या खाली जीवन जगत असून, २५ टक्के लोकांना पेयजलही उपलब्ध नाही, असा दावा त्यांनी केला.मार्क्सवादी हिंसाचार आणि सुडाची भावना राज्यात भाजपचा उदय रोखू शकत नाही. सत्ताधारी पक्षाने दहशत निर्माण करणे सुरू ठेवले तर भाजपला आणखी बळकटी मिळेल, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)भाजप चिटफंड घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीची मागणी करणार का, असा प्रश्न विचारला असता शहा म्हणाले की, कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा, असे म्हणावे लागण्याचे कारण नाही. यात गरीब लोकांची लूट झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माणिक सरकार स्वत: नैतिक आधारे सीबीआय चौकशी करण्यास सांगू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास यात्रेत सहभागी व्हा, असे आवाहन त्यांनी लोकांना केले. भाजपच त्रिपुरात पुढील सरकार बनवेल. ही लढाई कठीण असणार नाही. कारण, कम्युनिस्ट संपूर्ण जगात क्षीण झाले आहेत, तर काँग्रेस आता छोटा पक्ष बनला आहे, असेही ते म्हणाले.