शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

अण्णाद्रमुक हा भाजपचा गुलाम पक्ष; द्रमुकची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 04:34 IST

तामिळनाडूचे सरकार सर्वात भ्रष्ट असून अण्णाद्रमुक हा भाजपचा गुलाम वा मांडलिक बनलेला पक्ष आहे, अशी बोचरी टीका द्रमुकने लोकसभेत केली आहे.

नवी दिल्ली  - तामिळनाडूचे सरकार सर्वात भ्रष्ट असून अण्णाद्रमुक हा भाजपचा गुलाम वा मांडलिक बनलेला पक्ष आहे, अशी बोचरी टीका द्रमुकने लोकसभेत केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलेल्या अभिभाषणासंदर्भात अभिनंदनाच्या ठरावावरील चर्चेत द्रमुकचे नेते दयानिधी मारन यांनी हे शरसंधान केले.ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकांमध्ये तामिळनाडूतील जनतेने आपल्याला का नाकारले याचे भाजपने आत्मपरीक्षण केले पाहिजे. देशातील विरोधी पक्ष दुर्बळ असल्यानेच भाजपचे फावले आहे.तामिळनाडूमध्ये लोकसभा निवडणुकीत अण्णाद्रमुकचा फक्त एकच खासदार निवडून आला होता. मारन यांनी केलेल्या घणाघाती टीकेला लोकसभेत भाजप सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. तामिळनाडूतील राज्य सरकारविरोधात दयानिधी मारन यांनी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप भाजपने केला.भाजप-अण्णाद्रमुक यांची युती असून त्या अनुषंगाने मारन म्हणाले की, गुलामांची (अण्णाद्रमुक) काळजी घेणे हे मालकाचे (भाजप) कर्तव्य असते. या उद्गारांना संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी आक्षेप घेतला. तपास यंत्रणा तसेच निवडणूक आयोगाचा भाजपकडून गैरवापर सुरूआहे, असा आरोप द्रमुकने केला आहे. अण्णाद्रमुक भाजपच्या वळचणीला गेला होता, तर द्रमुकने काँग्रेसशी युती करून लोकसभा निवडणुका लढविल्या.बेपर्वा राज्य सरकारद्रमुकने आरोप केला की, तामिळनाडूमध्ये विशेषत: चेन्नई शहरामध्ये सध्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. या संकटकाळात अण्णाद्रमुक सरकार अत्यंत बेपर्वाईने वागत आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी सरकारने फारसे हातपाय हलविलेले नाहीत.भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई करणार असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात सांगितले होते. त्याची आठवण देऊन दयानिधी मारन म्हणाले की, तामिळनाडूचे सरकार सर्वात भ्रष्ट आहे.

टॅग्स :All India Anna Dravida Munnetra Kazhagamआॅल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कझगमDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागमTamilnaduतामिळनाडू