शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
7
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
8
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
9
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
10
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
11
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
12
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
13
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
14
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
15
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
16
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
17
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
19
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
20
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...

भाजप-पीडीपीत पुन्हा ठिणगी

By admin | Updated: April 10, 2015 09:08 IST

सरकार स्थापनेपासूनच वेगवेगळ्या कारणांवरून मतभेदांमुळे चर्चेत आलेल्या जम्मू-काश्मिरातील सत्ताधारी युतीतील सहकारी भारतीय जनता पक्ष (

जम्मू/नवी दिल्ली : सरकार स्थापनेपासूनच वेगवेगळ्या कारणांवरून मतभेदांमुळे चर्चेत आलेल्या जम्मू-काश्मिरातील सत्ताधारी युतीतील सहकारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टी (पीडीपी)यांच्यात काही मुद्यांवर मतैक्य नसल्याचे गुरुवारी पुन्हा उघड झाले. काश्मिरी विस्थापित पंडितांसाठी स्वतंत्र वसाहत स्थापन केली जाणार नाही,असे राज्याचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांनी स्पष्ट केले, तर या मुद्यावर केंद्राच्या भूमिकेत कुठलाही बदल झाला नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी ठासून सांगितले. त्यामुळे युतीत आणखी एक वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत.काश्मिरातून विस्थापित झालेल्या हिंदू पंडितांनी खोऱ्यात परत यावे, अशी आमची मनापासून इच्छा आहे; परंतु त्यांच्यासाठी स्वतंत्र वसाहती वसविण्याची आपल्या सरकारची कुठलीही योजना नाही, असे सईद यांनी गुरुवारी विधानसभेत स्पष्ट केले.सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी काश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र वसाहत स्थापन करण्यासाठी राज्य सरकारतर्फे उचलण्यात येत असलेल्या पावलांना कडाडून विरोध केला. तेव्हा विरोधकांच्या गदारोळातच सईद यांनी उपरोक्त ग्वाही दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री राजनाथसिंग यांची भेट घेतल्यानंतर दोन दिवसांनी सईद यांनी हे वक्तव्य केले आहे. या बैठकीनंतर गृहमंत्रालयातर्फे जारी निवेदनात राज्य सरकार विस्थापित काश्मिरी पंडितांच्या स्वतंत्र वसाहतीसाठी भूसंपादन करून त्यांना जमीन उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याचे सांगण्यात आले होते.जम्मू-काश्मिरातील मुख्य विरोधी पक्ष आणि फुटीरवादी गटांनी यावर कडाडून टीका केली होती. राज्यातील जनतेत फूट पाडण्याचा हा कट असल्याचा आरोप नॅशनल कॉन्फरन्सने केला होता, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खोऱ्यात गाझासारखी परिस्थिती निर्माण करण्यासाठी इस्रायलचे अनुकरण करीत असल्याचा दावा फुटीरवाद्यांनी केला होता. मुख्यमंत्री सईद यांनी मात्र आपण असे कुठलेही आश्वासन दिले नसल्याचा दावा केला आहे. काश्मिरी पंडितांच्या परतीसाठी अनुकूल वातावरण तयार करण्याचे सरकारचे प्रयत्न असून, अशा प्रकारचे वाद निर्माण झाल्यास ते कसे परततील? घाईगर्दीत कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही. सर्व पक्षांना सोबत घेतले जाईल. काश्मिरात धर्मनिरपेक्षतेचे फुल फुलावे अशी आमची इच्छा आहे. या मुद्याचे राजकारण करू नका. त्यामुळे काश्मीरची बदनामी होते, असे आवाहन सईद यांनी फुटीरवाद्यांना केले. (वृत्तसंस्था)