शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

नितीश कुमार यांना भाजपाकडून पाठिंब्याची ऑफर

By admin | Updated: July 10, 2017 20:21 IST

नितीश सरकारला संकट निर्माण झाल्यास पाठिंबा देण्याची खुली ऑफर भाजपाने दिली आहे. बिहार भाजपाचे अध्यक्ष

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांविरुद्ध सीबीआयने सुरू केलेल्या कारवाईमुळे बिहारमधील राजकीय वातावरण तापले असून, नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकार अडणीत आले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारला संकट निर्माण झाल्यास पाठिंबा देण्याची खुली ऑफर भाजपाने दिली आहे. बिहार भाजपाचे अध्यक्ष नित्यानंद राय यांनी आज हे वक्तव्य केले. त्यामुळे बिहारच्या राजकारणात नवे नाट्य सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दरम्यान, नितीश सरकारला पाठिंबा देण्याचा अंतिम निर्णय दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाकडूनच घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 
सीबीआयने निनावी मालमत्तेप्रकरणी सुरू केलेली लालू परिवाराविरुद्धची कारवाई आणि त्याचे राज्यातील महाआघाडी सरकारवरील परिणाम यावर चर्चा करण्यासाठी नितीश कुमार यांनी मंगळवारी संयुक्त जनता दलाच्या कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. मात्र त्याच बैठकीपूर्वीच भाजपाने नितीश कुमार यांना पाठिंबा देण्याचा डाव टाकला आहे. भाजपाचे बिहार अध्यक्ष नित्यानंद राय नितीश कुमार यांना पाठिंब्याची ऑफर देताना म्हणाले,"नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर कुठल्याही प्रकारचे संकट आले तर भाजपा त्यांना बाहेरून पाठिंबा देण्यास तयार आहे." भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकलेले तेजस्वी यादव यांना पदावरून हटवण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली. "तेजस्वी यादव जर राजीनामा देत नसतील तर त्यांना पदावरून हटवण्यात यावे. तेजस्वी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तसेच कुठलाही कायदा निनावी मालमत्ता बाळगण्याची परवानगी देत नाही." 
 राय पुढे म्हणाले, "बिहारचा विकास होणे आवश्यक आहे. आता महाआघाडीत राहायचे की नाही याचा निर्णय नितीश कुमार यांच्यावर आहे. जर नितीश कुमार यांनी महाआघाडी सोडली आणि राज्य सरकार अडचणीत आले तर आम्ही बाहेरून समर्थन देण्यास तयार आहोत. जर केंद्रीय नेतृत्वाचा आदेश आला तर आम्ही राज्य सरकारला कोसळू देणार नाही.अधिक वाचा  (लालूंची कन्या मिसा भारती अडचणीत, ईडीनं सीएला ठोकल्या बेड्या)
(लालूंच्या कन्या मीसा भारती यांची मालमत्ता जप्त)
(बेहिशेबी मालमत्ता प्रकरण : मिसा भारतींची 12 जूनला होणार चौकशी)
राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात प्राप्तिकर विभागाने मोठी कारवाई केली होती. नवी दिल्ली, गुडगावमध्ये लालू प्रसाद यादव यांच्याशी संबंधित असलेली लोकं व कंपनी अशा जवळपास 22 ठिकाणांवर आयकर विभागाने कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी प्राप्तिकर विभागानं ही कारवाई केली आहे. 1 हजार कोटी रुपयांच्या बेनामी जमिनीचा व्यवहार केल्याचा लालू प्रसाद यादव यांच्यावर आरोप आहे.