शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

भाजपाची बुधवारी दिल्लीत बैठक : नाराजी वाढू न देण्यावर मंथन, २०१९च्या निवडणुकीची पूर्वतयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 23:52 IST

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी आणि खास करून केंद्रातील व भाजपाशासित राज्यांमधील जनतेमध्ये सरकारविषयी जाणवू लागलेली रोष व भ्रमनिरासाची भावना दूर करण्यास काय करावे यावर विचारमंथन करण्यासाठी

नवी दिल्ली : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी आणि खास करून केंद्रातील व भाजपाशासित राज्यांमधील जनतेमध्ये सरकारविषयी जाणवू लागलेली रोष व भ्रमनिरासाची भावना दूर करण्यास काय करावे यावर विचारमंथन करण्यासाठी भाजपाच्या नेतृत्वाने येत्या बुधवारी, २८ फेब्रुवारी रोजी दिल्लीत एक बैठक बोलाविली आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा बैठकीच्या सुरुवातीस मार्गदर्शन करतील व पंतप्रधान नरेंद्र मोदी समारोप करतील, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना व उपमुख्यमंत्र्यांना बैठकीसाठी बोलाविण्यात आले आहे. भाजपाचे १४ राज्यांमध्ये मुख्यमंत्री आहेत तर बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात आणि जम्मू-काश्मीरमध्ये पक्षाचे उपमुख्यमंत्रीही आहेत. ही बैठक दिवसभर चालेल.मोदी सरकार सन २०१४ मध्ये केंद्रात सत्तेवर आल्यापासून दरवर्षी अशी बैठक घेण्याचा पायंडा पडला असला तरी येत्या वर्षभरात अनेक राज्यांमध्ये होणाºया विधानसभा निवडणुका व २०१९ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर यंदाच्या बैठकीस विशेष महत्वाचे मानले जात आहे. म्हणूनच पक्षनेतृत्वाकडून एक पाच मुद्द्यांचे टिपण पाठविण्यात आले असून त्या अनुषंगाने पूर्ण तयारी करून बैठकीस येण्यास सांगण्यात आले आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाने नव्याने सत्ता काबिज केली किंवा सत्ता कायम राखली. असे असले तरी प्रस्थापित सत्ताधाºयांविषयी कालांतराने दिसून येणारी नाराजी दिसू लागली आहे. ती दूर करणे व निदान वाढू न देणे हे भावी यशासाठी आवश्यक असणार आहे, याची जाणीव ठेवूनच या बैठकीत त्यादृष्टीने विशेष विचारमंथन होणे अपेक्षित आहे. केंद्राने राबविलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत प्रभावीपणे नेणे, या योजनांची अमलबजावणी अधिक जोरकसपणे करणे, १० कोटी कुटुंबांना आरोग्य विमा देण्याची महत्वाकांक्षी योजना, लोकसभा-विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेला विचार या सर्व मुद्द्यांवर या एकदिवसीय बैठकीमध्ये चर्चा होणार आहे.योजनांचा अहवाला मागविला-समाजातील गरीब व दुर्बल घटकांसाठी केंद्राने जन-धन, मुद्रा, उज्ज्वला, तसेच गृहनिर्माणाशी संबंधित योजना राबविल्या आहेत त्यांची राज्यात अमलबजावणी कशा प्रकारे करण्यात आली याबद्दलचाही अहवाल भाजपाने आपल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून मागविला आहे. निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या मुद्द्याबाबत मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी समित्या स्थापन कराव्यात व त्यांच्यामार्फत या मुद्द्याची जनतेत अधिकाधिक चर्चा कशी होईल हे पाहावे.न जिंकता आलेल्या ‘त्या' १२० जागांवर अधिक भरभाजपाने स्वबळावर बहुमत मिळविले असले तरी लोकसभेच्या पक्षाला कधीही जिंकता आल्या नाहीत अशा १२० जागा आहेत. या जागा जिंकण्यासाठी नेमकी कोणती रणनीती अवलंबावी यावरही या बैठकीत चर्चा होईल.