शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

भाजपा नेत्यांची शाहरूखवर आगपाखड

By admin | Updated: November 5, 2015 02:57 IST

अभिनेता शाहरुख खान याच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर देशभरातून टीका करण्यात आल्यानंतर भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी अखेर आपले वादग्रस्त

नवी दिल्ली : अभिनेता शाहरुख खान याच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर देशभरातून टीका करण्यात आल्यानंतर भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी अखेर आपले वादग्रस्त टिष्ट्वट मागे घेतले. तथापि भाजपाचे दुसरे नेते खासदार योगी आदित्यनाथ यांनी मात्र शाहरुखवर टीकेची झोड उठवत त्याची पाकिस्तानचा दहशतवादी हाफिज सईद याच्याशी तुलना केली. दरम्यान, विजयवर्गीय यांचे मत हे पक्षाचे अधिकृत मत नाही, असे सांगत भाजपने हात झटकले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शाहरुखची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी केली. दुसरीकडे हाफिज सईदने शाहरुख खानला पाकिस्तानात येण्याचे निमंत्रण दिले आहे.विजयवर्गीय यांनी आपले शाहरुखविरोधी टिष्ट्वट मागे घेतले असले तरी टोमणा मारण्याची संधी मात्र सोडली नाही. ‘भारतात असहिष्णुता असती तर अमिताभ बच्चनच्या खालोखाल शाहरुख खान सर्वांत लोकप्रिय अभिनेता झालाच नसता. कुणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मी कालचे टिष्ट्वट मागे घेतो,’ असे विजयवर्गीय यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे.देशातील असहिष्णुता वाढली असल्याचे शाहरुखने म्हटले होते आणि त्यावरून विजयवर्गीय यांनी शाहरुखला देशद्रोही संबोधून तो भारतात राहात असला तरी त्याचे हृदय पाकिस्तानात आहे, असे म्हटले होते. दरम्यान, विजयवर्गीय यांच्या वादग्रस्त टिष्ट्वटपासून भाजपाने हात झटकले आहेत. ‘ते भाजपाचे मत नव्हे. शाहरुखशी आमची नाराजी नाही. तो महान अभिनेता आहे,’ असे भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्यांना भाजपा श्रेष्ठींनी तंबी दिली असली तरी भाजपाचे वादग्रस्त खासदार योगी आदित्यनाथ यांनी आपली बेताल वक्तव्ये सुरूच ठेवली आहेत. त्यांनी बुधवारी शाहरुख खानची तुलना पाकिस्तानी दहशतवादी आणि मुंबई बॉम्बस्फोटांचा सूत्रधार हाफिज सईद याच्याशी करून नव्या वादाला तोंड फोडले. आदित्यनाथ म्हणाले, ‘भारतात असहिष्णुता वाढली असे वाटणाऱ्या शाहरुखने पाकिस्तानात जावे. या देशातील लोकांनी त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार घातला तर त्यालाही सामान्य मुस्लिमाप्रमाणे रस्त्यावर भटकावे लागेल. हे लोक दहशतवाद्यांची भाषा बोलत आहेत. शाहरुख आणि हाफिज सईद यांच्या भाषेत कसलाही फरक नाही. धर्मनिरपेक्षतेच्या नावावर काही कलावंत व लेखकांनी देशद्रोह्यांसारखे बोलायला सुरुवात केली आहे आणि शाहरुखनेही त्यांच्या सुरात सूर मिसळत आपला पाठिंबा दिला आहे.’भाजपाच्या नेत्या साध्वी प्राची यांनीही शाहरुखला पाकिस्तानचा हस्तक म्हटले आहे, हे येथे उल्लेखनीय. (लोकमत न्यूज नेटवर्क)हाफिज सईद : तर शाहरुख खानने पाकिस्तानात यावेशाहरुख खान याच्याप्रमाणे भारतात मुस्लिम नागरिकांना केवळ आपल्या धर्मामुळे अडचणींचा सामना करावा लागत असेल तर त्यांनी भारत सोडून पाकिस्तानमध्ये यावे, असे विधान करून पाकिस्तानमधील दहशतवादी आणि लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद याने आगीत तेल ओतले आहे.भाजपा नेत्यांनी शाहरुखवर केलेल्या टीकेची दखल घेत हाफिजने टिष्ट्वटरवरून हे निमंत्रण दिले. ‘कला, क्र ीडा व संस्कृती क्षेत्रात जगभरात आपले नाव कमावणाऱ्या भारतीय मुस्लिमांना आपली ओळख टिकविण्यासाठी रोज संघर्ष करावा लागत आहे. या भारतीय मुस्लिमांमध्ये शाहरुख खानही आहे. त्याला आपल्या धर्मामुळे भेदभाव सहन करावा लागत असेल, तर त्याने पाकमध्ये यावे.’शिवसेना शाहरुखच्या पाठीशीभाजपा नेते हल्ला करीत असले तरी शिवसेनेने मात्र शाहरुखला पाठिंबा दिला आहे. शाहरुख केवळ मुस्लिम आहे म्हणून त्याला लक्ष्य करण्यात येऊ नये. भारतातील अल्पसंख्याक समाज सहिष्णू आहे. हा देश सहिष्णू आहे आणि मुस्लिमही सहिष्णूच आहेत, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.शाहरुखचा पुतळा जाळलाइंदूर : असहिष्णुतेबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बुधवारी इंदूर येथे भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या समर्थकांनी शाहरुख खान याच्या पुतळ्याचे दहन केले. भाजपा नेते विजयवर्गीय यांनी शाहरुखबद्दल ‘बीभत्स’ टिष्ट्वट केले आहे. -डेरेक ओब्रायन, तृणमूल काँग्रेसचे प्रवक्तेशाहरुख तुझ्या वक्तव्यामुळे अखंड भारत बनायला मदत मिळेल.- अरविंद केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्रीभाजप नेत्याचे शाहरुखविरोधी वक्तव्य खरे असेल तर ते निषेधार्ह आहे. वक्तव्याला पक्षाचा पाठिंबा नाही. -वेंकय्या नायडू, केंद्रीय मंत्रीभाजपाच्या काही नेत्यांनी खरोखरच जिभेला लगाम लावण्याची आणि शाहरुखविरुद्ध निरर्थक बडबड करणे थांबविण्याची गरज आहे. -अनुपम खेर, ज्येष्ठ अभिनेतेभाजपा नेत्यांनी शाहरुख खानविरुद्ध केलेल्या वादग्रस्त व प्रक्षोभक वक्तव्याची जबाबदारी घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी. -दिग्विजयसिंग, काँग्रेस नेतेदेशातील वातावरण पार बिघडले आहे. आता शाहरुखने भारतात राहावे की पाकिस्तानात जावे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सांगितले पाहिजे.-मनीष तिवारी, काँग्रेस नेते