शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

मनसेचा आराखडा भाजपा राबवतेय

By admin | Updated: June 29, 2015 00:38 IST

राज ठाकरे : राज्य सरकार केवळ घोषणाबाज

राज ठाकरे : राज्य सरकार केवळ घोषणाबाज
सावंतवाडी : मी मांडलेला विकास आराखडाच भाजपा सरकार राबवत आहेत. काँग्रेसप्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकारही घोषणाबाज असल्याची टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केली.
कोकण दौर्‍यावर आलेल्या ठाकरे यांनी रविवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री घोषणाबाज आहेत. ते कोकण नंबर वन करणार म्हणजे नेमके काय करणार? त्यांच्याकडे काय आहे? माझ्या हातात जर सत्ता दिली असती, तर या सुजलाम सुफलाम कोकणचे सोने केले असते. कोकणसारखा प्रदेश असणे हे आपले भाग्य आहे, पण त्याला योग्य दिशा मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
माझा टोलला विरोध नाही, पण तो घेताना १० कोटींच्या आतील रस्त्यावर आकारू नका. त्याची एक प्रक्रिया राबवा. बाहेरील देशात टोल आहेत. तेथे एटीएम सिस्टीम असून तेथे रस्त्यावर टोल भरावा लागत नाही. त्याची थेट पावती मिळते, असे माझे म्हणणे आहे. पण सरकारला पारदर्शकता नको आहे, असेही ते म्हणाले.
मी निवडणुकीत मांडलेला आराखडा भाजपा सरकार राबवत आहे. अनेक चांगल्या गोष्टी त्यांनी उचलल्या आहेत, असाही दावा त्यांनी केला. सिंधुदुर्गमध्ये होणार्‍या चिपी विमानतळाबाबत माझ्या मनात संशय आहे. प्रकल्पाला योग्य दिशा दिलेली नाही. लोकांना फसवण्याचे काम सरकार करत असून विमानतळाला जोडणारे रस्ते नाहीत. विमान कुठे उतरणार, हे माहीत नाही. फक्त ठेकेदारी वाटण्याचेच काम सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. (प्रतिनिधी)