शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरच्या स्थितीचे खापर भाजपाने फोडले मेहबुबांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 04:05 IST

भाजपने जम्मू-काश्मिरातील मेहबुबा मुफ्ती सरकारशी तीन वर्षांपूर्वीची आघाडी तोडताना राज्यातील बिघडत्या परिस्थितीचे खापर मुख्यमंत्री महेबुबा मुफ्ती यांच्यावर फोडले आहे.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : भाजपने जम्मू-काश्मिरातील मेहबुबा मुफ्ती सरकारशी तीन वर्षांपूर्वीची आघाडी तोडताना राज्यातील बिघडत्या परिस्थितीचे खापर मुख्यमंत्री महेबुबा मुफ्ती यांच्यावर फोडले आहे. भाजपाचे महासचिव आणि राम माधव म्हणाले की, भाजपासाठी जम्मू- काश्मीर भारताचा अभिन्न भाग आहे. मात्र, सद्यस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी येथे राज्यपाल शासन आणले जावे, असा आम्ही निर्णय घेतला आहे.सरकारच्या तीन वर्षांच्या कामकाजाबाबत सर्व एजन्सींचे मत घेण्यात आले. गृह मंत्रालयाशी चर्चा करण्यात आल्यानंतर भाजपाने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तीन वर्षांपूर्वी लोकांचा कल पाहून परिस्थितीच्या आधारे ही आघाडी झाली होती. मात्र, अशी परिस्थिती आहे की, आघाडी पुढे चालविणे शक्य नव्हते.मात्र, परिस्थितीत सुधारणा झाली नाही. राज्यात दहशतवाद वाढला आणि फुटीरवाद्यांनाही बळ मिळाले. विकासकार्यात केंद्राने मदत करुनही जम्मू व लडाखची उपेक्षा करण्यात आली. भाजपाशी भेदभाव करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. पत्रकार शुजात बुखारीयांच्या हत्येचा उल्लेख करुन ते म्हणाले की, राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आहे.राज्य सरकारमध्ये तर तुम्हीही होता? असा सवाल केला असता ते म्हणाले की, भाजपा राज्य सरकारचा एक भाग होता. मात्र, नेतृत्व पीडीपीच्या हाती होते. महत्त्वाचे निर्णय त्यांच्याकडून घेतले जात होते.>राज्याच्या विकासासाठी केंद्राचे सर्वोतोपरी प्रयत्नउधमपूरचे संसद सदस्य आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, उपमुख्यमंत्री कविंद्र गुप्ता, राज्य सरकारचे मंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र रैना यांच्या उपस्थितीत राम माधव यांनी सांगितले की, केंद्र सरकारने राज्याच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. शांततेसाठी सर्व प्रयत्न करण्यात आले. फुटीरवाद्यांशी चर्चेसाठी दिनेश्व शर्मा यांना नियुक्त केले. परिस्थितीत सुधारणा व्हावी म्हणून गृहमंत्री सातत्याने दौरा करत होते. रमजानच्या पवित्र महिन्यात शस्त्रसंधीही करण्यात आली.>कधी झाला निर्णय?भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांत झालेल्या समन्वय बैठकीत राज्याची स्थिती व आघाडीबाबत समीक्षा करण्यात आली. त्यानंतर शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अमित शहा व संघाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली.सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय त्याच रात्री झाला. परंतू, या निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची हे ठरायचे होते. काश्मिरातील पक्षाचे नेते व मंत्री यांना विश्वासात घेणे बाकी होते. त्यामुळे तेथील भाजपाच्या मंत्र्यांशी दिल्लीत अमित शहा यांनी चर्चा केली. त्यानंतर आज घोषणा करण्यात आली.पक्षाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी अमित शहा व संघ पदाधिकाºयांसोबत घेतलेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर