शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

भाजपा सरकार देणार आणीबाणीच्या आठवणींना उजाळा

By admin | Updated: June 22, 2017 19:21 IST

आणीबाणी हे प्रजासत्ताक भारताच्या इतिहासातील एक काळे पान मानले जाते. आणीबाणी जाहीर करण्याच्या निर्णयामुळे कणखर आणि धाडसी

 ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 22 - आणीबाणी हे प्रजासत्ताक भारताच्या इतिहासातील एक काळे पान मानले जाते. आणीबाणी जाहीर करण्याच्या निर्णयामुळे कणखर आणि धाडसी निर्णयांसाठी लोकप्रिय असलेल्या इंदिरा गांधी यांच्यावर अजूनही टीका होत असते. आता आणीबाणीच्या काळातील कटू आठवणींना पुन्हा उजाळा देण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. त्यासाठी 25 जूनला आणीबाणीच्या 42 व्या वर्षपूर्ती दिवशी मोदी सरकार आपल्या मंत्र्यांना देशाच्या विविध भागात पाठवणार आहे.  आणीबाणीच्या कटू स्मृतींबाबत लोकांना माहिती देणे हा याचा हेतू असेल.1975 साली तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशभरात होत असलेल्या आंदोलनांना नियंत्रणात आणण्यासाठी अंतर्गत आणीबाणीची घोषणा केली होती. त्यानंतर आंदोलनांमध्ये सहभागी असलेल्या विरोधी पक्षामधील अनेक नेत्यांना अटक करून तुरुंगात डांबण्यात आले होते.

( देशात अघोषित आणीबाणी )

( हा निर्णय म्हणजे अघोषित आर्थिक आणीबाणी )

आता आणीबाणीच्या आठवणी पुन्हा जाग्या करण्यासाठी केंद्र सरकारकडून देशभरात  कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. या कार्यक्रमात भाजपाचे नेते आणीबाणीच्या वेळच्या परिस्थितीबाबत चर्चा करणार आहेत, ज्यामुळे आणीबाणी लागू करण्यात आली. याबाबत भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की, "आणीबाणीच्या काळात बिगर काँग्रेसी सरकारांचा सत्तापालट एका दिवसांत झाला होता. ही बाब आजच्या तरुणांच्या विस्मृतीत जाऊ नये, अशी आमची इच्छा आहे."  आता भाजपाच्या या खेळीमुळे देशातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.