शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

राज्यघटनेवर भाजपा सतत हल्ले करतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:30 IST

राज्यघटनेवर सातत्याने हल्ले सुरू असून, स्वायत्त व घटनात्मक संस्थांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत आहे.

रायपूर/नवी दिल्ली : राज्यघटनेवर सातत्याने हल्ले सुरू असून, स्वायत्त व घटनात्मक संस्थांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत आहे. हे प्रकार केवळ पाकिस्तान व हुकूमशाहीतच घडू शकतात, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली. छत्तीसगढच्या जाहीर सभेत त्यांनी कर्नाटकात आमदारांच्या पळवापळवीचे जे प्रयत्न सुरू आहेत, त्यावरही हल्ला चढवला.कर्नाटकमध्ये एका बाजूला आमदार व दुसरीकडे राज्यपाल अशी परिस्थिती निर्माण असल्याचे ते म्हणाले. भाजपाकडून पोकळ विजयाचा आनंद साजरा केला जात असून प्रत्यक्षात देशभरात लोकशाहीचा पराभव झाल्याबद्दल दु:ख व्यक्त केले जात आहे, असे टिष्ट्वटही त्यांनी केले. कर्नाटकातील घटनांच्या निषेधार्थ काँग्रेसने उद्या देशभर लोकशाही बचाव दिन पाळण्याचे ठरवले आहे. दिल्ली तसेच देशातील सर्व शहरांमध्ये काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते धरणे, मोर्चे व आंदोलन करून, हा दिवस पाळणार आहेत.>काँग्रेसने संधीसाधूपणा करून जनता दलास पाठिंबा दिला, तेव्हाच खरे तर लोकशाहीची हत्या झाली. काँग्रेसने कर्नाटकच्या कल्याणासाठी नव्हे, तर राजकीय फायद्यासाठी जनता दलास पाठिंबा दिला. काँग्रेस अध्यक्षांना त्यांच्या पक्षाचा इतिहास माहीत नसावा. आणीबाणी, कलम ३५६ चा दुरुपयोग, न्यायालये तसेच प्रसारमाध्यमांना दुबळे करणे हा काँग्रेसचा इतिहास आहे.- अमित शहा

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी