शहरं
Join us  
Trending Stories
1
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
2
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
3
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
4
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
5
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग्ज बदलून राहा सेफ
6
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
7
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
8
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
9
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
10
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
11
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
12
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
13
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
14
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
15
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
16
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
17
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
18
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
19
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
20
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

गुरमेहर कौर प्रकरणी भाजपा बॅकफूटवर

By admin | Updated: March 2, 2017 10:39 IST

दिल्ली युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी गुरमेहर कौर प्रकरणी सुरु असलेल्या वादात भाजपाने नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसत आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - दिल्ली युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी गुरमेहर कौर प्रकरणी सुरु असलेल्या वादात भाजपाने नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसत आहे. बुधवारचा घटनाक्रम पाहता भाजपाने बॅकफूटवर जाण्याचा निर्णय घेतल्याचं लक्षात येत आहे. भाजपाच्या काही नेत्यांनी खासगीत बोलताना गुरमेहर कौरला एकटी सोडलं पाहिजे असं मान्य केलं आहे. या संपुर्ण प्रकरणाला चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात आलं असं पक्षाला वाटत आहेत.
 
(ABVP च्या दोन सदस्यांचं निलंबन, सेहवागकडूनही खुलासा)
(गुरमेहरच्या समर्थकांना देशाबाहेर हाकलून द्या - भाजपा मंत्री)
(असहिष्णू गँगचे पुनरागमन - अनुपम खेर)
 
गुरमेहर कौरवर निशाणा साधणारा क्रिकेटर विरेंद्र सेहवाग आणि अभिनेता अनुपम खेरदेखील बॅकफूटवर जाताना दिसले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनातून माघार घेत पुन्हा जालंधरला जाण्याचा निर्णय गुरमेहरने घेतल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी समर्थनार्थ उतरले होते. याआधी गुरमेहर कौरला ऑनलाइन ट्रोल केलं जात असताना बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. 
 
(सेहवाग भारताचा नाही तर BCCI चा प्रतिनिधी - उमर खालिद)
(देशभक्ती पुस्तकातून येत नाही - जावेद अख्तर यांना बबिता फोगाटचे प्रत्युत्तर)
(हाच तो व्हिडीओ ज्यामुळे गुरमेहर कौरवर होतेय टीका)
 
केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनीदेखील बुधवारी बोलताना 'शहीदाच्या मुलीला आपलं म्हणणं मांडण्याचा हक्क असून तिला ट्रोल करणं चूक असल्याचं', सांगितलं. रवीशंकर प्रसाद यांच्या या वक्तव्यामुळे भाजपा कॅम्पमध्ये वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत याचा अंदाज लावला जाऊ शकतो. 'प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण काश्मीर स्वतंत्र झाला पाहिजे असं म्हणणं चुकीचं आहे', असंही रवीशंकर बोलले आहेत.
 
दुसरीकडे याच मुद्द्यावर ट्विट करुन वादात भर घालणारे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनीदेखील आपली भूमिका बदलली आहे. 26 फेब्रुवारी रोजी ट्विट कर त्यांनी विचारलं होतं की, 'माहित नाही या मुलीचं डोकं कोण प्रदुषित रत आहे ?'. गुरमेहरला मिळालेल्या धमकींबाबत विचारलं असता आपल्याला याबद्दल माहित नसल्याचं ते बोलले होते. 'मी प्रचारसभांमुळे मणिपूरमध्ये व्यस्त होतो, मला सर्व गोष्टींची माहिती नाही. मी त्या मुलीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करतो', असं किरेन रिजिजू बोलले.
 
विरेंद्र सेहवागनेही ट्विट करत, 'प्रत्येकाला न घाबरता आपलं म्हणणं मांडण्याचा हक्क आहे. मग ती गुरमेहर कौर असो किंवा फोगट भगिनी', सांगितलं आहे. अनुपम खेर यांनीदेखील गुरमेहरची बाजू योग्य असल्याचं सांगितलं. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर यांनी सांगितलं की, 'युद्ध होऊ नये असं तिचं म्हणणं योग्य आहे. सीमेवर तैनात सैनिक देशाच्या सुरक्षेसाठी असून गोळी खाण्यासाठी नाही'. क्रिकेटर गौतम गंभीर आणि विद्या बालन यांनीही गुरमेहरचं समर्थन केलं आहे. 
 
संपुर्ण वादानंतर एबीव्हीपीनेदेखील डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला. कॅम्पस परिसरात झालेल्या हिंसाचारात तसंच राजकीय नेते आणि सेलिब्रेटींच्या शाब्दिक चकमकीत सहभागी झालेल्या दोन सदस्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निलंबित केलं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या समर्थकांवर हल्ला केल्याप्रकरणी यांना अटक करण्यात आली होती. बेशिस्तपणाचा ठप्पा ठेवत त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दोषी आढळल्यास सक्त कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.