शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

गुरमेहर कौर प्रकरणी भाजपा बॅकफूटवर

By admin | Updated: March 2, 2017 10:39 IST

दिल्ली युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी गुरमेहर कौर प्रकरणी सुरु असलेल्या वादात भाजपाने नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसत आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - दिल्ली युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी गुरमेहर कौर प्रकरणी सुरु असलेल्या वादात भाजपाने नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसत आहे. बुधवारचा घटनाक्रम पाहता भाजपाने बॅकफूटवर जाण्याचा निर्णय घेतल्याचं लक्षात येत आहे. भाजपाच्या काही नेत्यांनी खासगीत बोलताना गुरमेहर कौरला एकटी सोडलं पाहिजे असं मान्य केलं आहे. या संपुर्ण प्रकरणाला चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात आलं असं पक्षाला वाटत आहेत.
 
(ABVP च्या दोन सदस्यांचं निलंबन, सेहवागकडूनही खुलासा)
(गुरमेहरच्या समर्थकांना देशाबाहेर हाकलून द्या - भाजपा मंत्री)
(असहिष्णू गँगचे पुनरागमन - अनुपम खेर)
 
गुरमेहर कौरवर निशाणा साधणारा क्रिकेटर विरेंद्र सेहवाग आणि अभिनेता अनुपम खेरदेखील बॅकफूटवर जाताना दिसले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनातून माघार घेत पुन्हा जालंधरला जाण्याचा निर्णय गुरमेहरने घेतल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी समर्थनार्थ उतरले होते. याआधी गुरमेहर कौरला ऑनलाइन ट्रोल केलं जात असताना बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. 
 
(सेहवाग भारताचा नाही तर BCCI चा प्रतिनिधी - उमर खालिद)
(देशभक्ती पुस्तकातून येत नाही - जावेद अख्तर यांना बबिता फोगाटचे प्रत्युत्तर)
(हाच तो व्हिडीओ ज्यामुळे गुरमेहर कौरवर होतेय टीका)
 
केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनीदेखील बुधवारी बोलताना 'शहीदाच्या मुलीला आपलं म्हणणं मांडण्याचा हक्क असून तिला ट्रोल करणं चूक असल्याचं', सांगितलं. रवीशंकर प्रसाद यांच्या या वक्तव्यामुळे भाजपा कॅम्पमध्ये वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत याचा अंदाज लावला जाऊ शकतो. 'प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण काश्मीर स्वतंत्र झाला पाहिजे असं म्हणणं चुकीचं आहे', असंही रवीशंकर बोलले आहेत.
 
दुसरीकडे याच मुद्द्यावर ट्विट करुन वादात भर घालणारे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनीदेखील आपली भूमिका बदलली आहे. 26 फेब्रुवारी रोजी ट्विट कर त्यांनी विचारलं होतं की, 'माहित नाही या मुलीचं डोकं कोण प्रदुषित रत आहे ?'. गुरमेहरला मिळालेल्या धमकींबाबत विचारलं असता आपल्याला याबद्दल माहित नसल्याचं ते बोलले होते. 'मी प्रचारसभांमुळे मणिपूरमध्ये व्यस्त होतो, मला सर्व गोष्टींची माहिती नाही. मी त्या मुलीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करतो', असं किरेन रिजिजू बोलले.
 
विरेंद्र सेहवागनेही ट्विट करत, 'प्रत्येकाला न घाबरता आपलं म्हणणं मांडण्याचा हक्क आहे. मग ती गुरमेहर कौर असो किंवा फोगट भगिनी', सांगितलं आहे. अनुपम खेर यांनीदेखील गुरमेहरची बाजू योग्य असल्याचं सांगितलं. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर यांनी सांगितलं की, 'युद्ध होऊ नये असं तिचं म्हणणं योग्य आहे. सीमेवर तैनात सैनिक देशाच्या सुरक्षेसाठी असून गोळी खाण्यासाठी नाही'. क्रिकेटर गौतम गंभीर आणि विद्या बालन यांनीही गुरमेहरचं समर्थन केलं आहे. 
 
संपुर्ण वादानंतर एबीव्हीपीनेदेखील डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला. कॅम्पस परिसरात झालेल्या हिंसाचारात तसंच राजकीय नेते आणि सेलिब्रेटींच्या शाब्दिक चकमकीत सहभागी झालेल्या दोन सदस्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निलंबित केलं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या समर्थकांवर हल्ला केल्याप्रकरणी यांना अटक करण्यात आली होती. बेशिस्तपणाचा ठप्पा ठेवत त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दोषी आढळल्यास सक्त कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.